सूनबाईने माहेरी मदत करते
आजच येणार होत्या लेकीच्या सासूबाई तर इकडे सगळे जण त्यांची आतुरतेने वाट बघत होते ,घरात आवरा आवर सुरू होती ,सगळे त्यांना आवडेल तसेच जेवण होते...सगळे सात्विक होते...सगळे घाई करत होते आणि जेवणासाठी थांबून होते ,आजीची जेवणाची वेळ टळून गेली होती ,वडील ही bp च्या गोळ्या घेत असतात पण आज ते ही उशीर करत होते...
"जेवून घ्या हो बाबा आणि आजी तुम्ही अशी वेळ असते का कुठे यायची ,ते ही अचानक.." संजय म्हणाला
संजय लहान मुलगा लेकीच्या पाठचा....आई वडील ह्यांची ताई गेल्यावर काळजी घेणारा ,तालुक्यात बदली करून आलेला...म्हणजे आई वडील आणि नौकरी ह्यांच्यातील तोल सांभाळून घेत जाणारा..
"संजय त्या आपल्याला सांगू येत आहेत म्हणजे नक्कीच खास काही असेल रे...ताई ही येणार आहे..तर बघू काय खास कारण आहे.." बाबा
"ताई कशी येईल बाबा ?? आज परीक्षा आहे ना तिची शाळेत...तिचा पसारा बघेल की इकडे येईल..? "
संजय लगेच आजीला कडे ताट वाढून आणत म्हणाला आणि त्याने बाबाला ही ताट आणून ठेवले होते..
"ताई येते तर म्हणाली !! पण बघू काय वेळीच ठरते ते.."
"अहो ह्या सासूबाई म्हणजे कटकट आहे असे ऐकले मी ,शालीन ही वैतागतो त्यांच्या वागणुकीला ,नुसत्या संशय घेतात...सुनांवर कधी लेकावर कधी तरी जावयाला ही सोडत नाहीत, नुसती पैश्याची हाव हाव करते..."
"संजय असे बोलू नये बाबा ,आपल्याला तर कधी काही बोलल्या नाही त्या ,मग उगाच कश्याला नको ती दुखणे मागे लावून घ्यायची...आली ये ,जाते जा..पाहुणचार करा..साडी घेऊन हसत पाठवून देऊ..हे आपण आपल्या लेकीसाठी करत आहेत.."
संजयला बाबा कळत होते कसे आहेत ,साधेपणा ओतप्रोत भरला आहे म्हणून लोक नको तितका फायदा घेतात ,पण दुसरा जावई गुणी ,त्यांची आई वडील साधे आणि चांगले ,त्यांनी कधी त्रास दिला नाही की त्यांचे नको ते प्रकार ऐकू आले नाहीत..
तितक्यात सासूबाई येतात ,त्यांना गाडीतून घरात येईपर्यंत बाबा आणि आई घ्यायला जातात ,सोबत स्कुटीवर ताई येतेच...ती गडबडून गाडी लावते आणि सासूबाईची बॅग घेते...तिने सोबत खाऊ फळ आणलेले असतात ते घरात हळूच ठेवते...सासूबाई लगेच तिच्या त्या फळांच्या पिशव्या बघतात ,तिरकी नजर तिकडेच असते...
"आले जरा उशिराच पण अगदी वेळ साधिली मी..तुमची ताई आणि मी यायला एकच वेळ...पण ताईला फळ अनायला तुम्ही नसते सांगितले तर माझ्या आधी आली असती..."
वडील आणि संजय बघत होते ह्या असे का म्हणत आहेत ,फळ आणण्याचा आणि ताई लवकर किंवा सोबत येण्याचा काय प्रकार म्हणावा..?
"तुम्हाला त्रास तर नाही झाला ना कसला येतांना ,मुलं खेळत असतात तिथे..मग थोडावेळ गाडी थांबवावी लागली नाही ना.?" बाबा
"हम्म ,नाही तसा तुमचे घर अडचणीत आहेच ..पण यायचं हे ठरवलं होतच मग काय यावं लागलं..बाकी मी फक्त ताईने आणलेले फळ घेईल ,मी जेवण करून निघाले म्हणून उशीर झाला..."
बाबा आणि आई लगेच एकमेकांना बघू लागले ,चार वाजून गेले आपण ह्यांच्या साठी थांबलो ,आजी जेवत नव्हती आत्ता जेवली ,तर ह्यांनी आधीच कळवायचे तरी की जेवण करून घ्या म्हणून ,हे काय वागणे आहे.?
"आम्ही तुमची वाट बघत होतो ,जेवण कराल म्हणून सांगितले होते तुम्ही मग .."
"मग काय जेवण आले ना मी ,तुम्ही जेवण घ्याल वाटले होते..कश्याला तसदी घेतली ..मला हल्ली काय सांगितले ते ही लक्षात रहात नाही .."
झालं सगळे गप्प होते ,त्यांचे वागणे खटकले होते संजय तर रागात होता ,त्याला माहित होते तेच झाले.
"बरं घर तर भारी आहे..हे कपाट छान आहे ,सूनबाईने घेतलं होतं असंच... कुठे आता माहीत नाही..हे तेच तर नाही ना ?? ते शोकेस ही सून बाईने कुठे तरी बुक केले होते ,पण नेमके कुठे गेले कळले नाही ?? ती फ्रेम ही बघितली आहे वाटत सूनबाईच्या हॉल मध्ये एकदा ही ती तर नाही ना ??? "
सासूबाई हळूहळू एक एक वस्तू अश्या बघत होत्या जणू तिच्या माहेरी त्यांच्या नकळत ती आई वडिलांना वस्तू देत असते की काय...ताईला ही त्यांचा हा स्वभाव माहीत होता ,त्या मोठ्या जावेच्या माहेरी जाऊन ही अश्याच बोलल्या होत्या ,पण तेव्हा जावेने खरंच वस्तू दिल्या होत्याच पण आता मी वस्तू न देता ही सासूबाई असे बोलत होत्या की मी ह्या वस्तू घेऊन देत असते ,तेव्हा जाऊ बाईने स्वतःच्या पैश्यातून वस्तू घेऊन दिल्या होत्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या घरी येऊन जो अपमान केला त्याच्या बदल्यात जाऊ बाईने तेव्हा सासूबाईंना जे केले ते योग्यच होते..
"आई हे फळ ह्या वस्तू मी तर त्यांना दिल्या नाहीत ,पण तुम्हाला त्याबद्दल बोलायचा कोणता ही हक्क नाही...आणि मी दिल्या जरी तरी त्या माझ्या हक्काच्या कमाईतून तुमच्या लेकाच्या कमाईतून नाही...मला तोंड उघडणे आणि जाऊ बाईसारखे आल्या पाऊली माघारी पाठवणे चांगलेच जमते...पण मान राखून आणि सन्मानाने मी तुम्हाला हेच सांगेन की हे तुमचे घर नाही की तुम्ही इथे माझी चौकशी कराल आणि मी करून देईल...तिथे मी ऐकते कारण तुमचा मुलगा तुमची इज्जत ठेवणार नाही...तुमचा मान माझ्या घरी फक्त माझ्या मुळे आहे ,तुमची तुमच्या घरी समाजात काय प्रतिष्ठा आहे त्याची ओळख ह्यांना आणि मला चांगलीच आहे...तुम्ही स्वतः तुमच्या माहेरी किती दिले आहेत हे बेहिशोब आहे..त्याची गिणती मला करण्यात रस नाही...माझे जर विनाकारण उकरून काढले तर तुमचे ही निघेल.."
ताईने न राहून नवऱ्याला फोन केला ,तेव्हा तो म्हणाला मी म्हणत होता कश्याला घेऊन जायचे आईला..? तिने उरली सुरली इज्जत ही ठेवली नाही..ती तुझ्या घरी तरी कशी शांत बसेल ?? तू आता आईला घरी पाठवून दे ,किंवा मी सांगतो तिला..
सासूबाई आता तोंड पाडत निघाल्या होत्या ,पण जे लोक आज इज्जत करत होते त्यांच्या मनातून कायमचा मान घालवून बसल्या होत्या... सुनेचा सन्मान न ठेवणाऱ्या स्त्रीला सुनेंच्या घरी ही मान मिळत नसतो...इथे फक्त सासूची इज्जत कमी होत नसते तर संपूर्ण घराची इज्जत कमी झालेली असते...आणि जर सुनेने माहेरी काही दिलेले सहन होत नसेल तर तेच आपण ही करू नये...नाहीतर तुम्ही ही दिले होते तर तिला ही देऊ द्या...
©®अनुराधा आंधळे पालवे
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा