नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी सौरभ त्याच्या घरातून बाहेर आलेला असतो आणि पाड्याच्या जवळच फेऱ्या मारत असतो... तेव्हा त्याचं लक्ष पाड्या पासून काही अंतरावर असलेल्या त्या घनदाट जंगलामध्ये जाते आणि तिकडे काहीतरी वेगळीच हालचाल त्याला जाणवते...
आत्ता पुढें,
सौरभ आपल्या फेऱ्या मारतच निरखून त्या ठिकाणी पाहू लागतो... त्याला तिकडे झाडांमध्ये लपून बसलेली दोन माणसं दिसतात.... पाण्यामधून बाहेर पडणाऱ्या रस्त्याच्या काही अंतरावरच ती माणसं झाड झुडपामध्ये लपून बसली होती... सौरभ ला त्यांना तिकडे असे पाहून थोडा विचित्र वाटते परंतु तो आपले लक्ष नसल्यासारखे दाखवत त्याच्या नादात फेऱ्या मारत असतो... थोड्या वेळानंतर तो आपल्या घराकडे निघून जातो...
सौरभ आपल्या फेऱ्या मारतच निरखून त्या ठिकाणी पाहू लागतो... त्याला तिकडे झाडांमध्ये लपून बसलेली दोन माणसं दिसतात.... पाण्यामधून बाहेर पडणाऱ्या रस्त्याच्या काही अंतरावरच ती माणसं झाड झुडपामध्ये लपून बसली होती... सौरभ ला त्यांना तिकडे असे पाहून थोडा विचित्र वाटते परंतु तो आपले लक्ष नसल्यासारखे दाखवत त्याच्या नादात फेऱ्या मारत असतो... थोड्या वेळानंतर तो आपल्या घराकडे निघून जातो...
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सौरभ आणि दीक्षा आपापले काम पूर्ण करून पाड्याच्या गेटच्या जवळच उभे असतात... दीक्षा नेहमीप्रमाणे तिच्या घरचं सगळं काम आटवून भार्गवीसाठी काही सामान घेऊन घरातून निघालेली असते... तिला वाटते रोजच्यासारखं सौरभ बाईक घेऊन तिची वाट बघत असेल, पण सौरभ मात्र गेटचे जवळ असंच फिरत असताना तिला दिसतो....
" सौरभ अरे तू असा का टाइमपास करत आहे.... जा तुझी बाईक घेऊन ये... आपल्याला जायला पाहिजे ना... भार्गवी ताई आपली वाट बघत असेल... " सौरभ ला अशा फेऱ्या मारताना पाहून दीक्षा आश्चर्याने त्याच्याकडे पाहून त्याला सांगते....
" दीक्षा मी काय बोलतो ते नीट ऐक आणि लगेच रिऍक्ट करून तिकडे त्या दिशेला पाहू नकोस.... " सौरभ आपल्या चेहऱ्यावर नॉर्मल भाव ठेवा तिच्याकडे पाहून तिला बोलतो... तशी ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागते....
" तुला नक्की काय बोलायचं आहे ? " दीक्षा न समजून विचारते....
" दीक्षा काल रात्री जेवण झाल्यानंतर मी जेव्हा शत पावली करण्यासाठी बाहेर फेऱ्या मारत होतो ना, तेव्हा मला त्या गेटच्या जवळ असलेल्या झाडाझुडपांमध्ये दोन माणसं आपल्या पाड्यावरच नजर ठेवताना दिसले होते... मी आता सकाळपासून असंच उगाचच इकडून तिकडे फिरत आहे... अजूनही ती माणसं त्या झाडाझुडपात मध्येच लपून नजर ठेवत आहेत...
मला असे वाटते की, त्यांना भार्गवी इकडेच कुठेतरी असेल असा डाउट आला असेल आणि त्यामुळे ते इकडे पाड्यामधून बाहेर पडणाऱ्या माणसांवर नजर ठेवत असेल.... " सौरभ नॉर्मल चेहरा ठेवूनच बोलत असतो....
" काय? " दीक्षा आश्चर्याने थोड्या मोठ्या आवाजात बोलतच असते की सौरभ तिला आडवतो....
" शांत हो, मी तुला आधीच सांगितले ना की काही रिऍक्ट करू नको... तू जर असा गोंधळल्यासारखा चेहरा केला असता त्यांना नक्कीच आपल्यावर डाऊट येईल... मला तरी असे वाटते की , आज आपल्याला भार्गवी ताईला भेटायला जायला नको... ती माणसं जर का आपला पाठलागकरत तिथपर्यंत पोहोचले उगाच प्रॉब्लेम क्रिएट होईल.... " सौरभ शांत स्वरात तिला सांगतो...
" सौरभ ही माणसं जंगलामध्ये तिला शोधत असतील तर... भार्गवी ताईला तर माहितही नसेल की माणसं परत तिला शोधत आहेत आणि ती जर घरातून बाहेर पडली तर.... " दीक्षाला आता तिची काळजी वाटू लागते....
" तू नको काळजी करूस दीक्षा.... मला नाही वाटत की, ती घरातून बाहेर पडेल.... तसे पण तू सगळे सामान तर घरातच आणून ठेवलेले आहेस ना त्यामुळे तिला बाहेर जाण्याची गरज तर पडणार नाही... " सौरभ तिला धीर देत बोलतो...
" या जंगलात नेटवर्कही पकडत नाही त्यामुळे आपण भार्गवी ताईला फोन करूनही सांगू शकत नाही.... " दीक्षा वैतागलेल्या स्वरात बोलू लागते....
" शांत हो दीक्षा आणि आपला चेहरा नॉर्मल ठेव... आपल्या बोलण्यावरूनही त्या माणसांना आपल्यावर काही डाउट आला नाही पाहिजे कारण त्यांची नजर सर्वत्र फिरत आहे.... " सौरभ तिला नजरेने शांत राहायला सांगत बोलतो..... ते दोघे एकमेकांसोबत बोलत असतात की सौरभच्या मोबाईलची रिंग वाजते.... अननोन नंबर पाहून सौरभ एक नजर दीक्षा कडे पाहून फोन उचलून कानाला लावतो...
" हॅलो... " सौरभ
" हॅलो सौरभ मी मिस्टर विश्वास बोलत आहे.... काल भार्गवीने तुझा नंबर दिला होता... " मिस्टर विश्वास
" हो सर बोला ना.... " सौरभ ला कालचं भार्गवीच बोलणं आठवते तसा तो पटकन त्यांना ओळख दाखवतो...
" मला भार्गवी सोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं.... मी कधीपासून तिचा फोन ट्राय करत होतो पण तिचा फोन नेटवर्कमध्ये नाही... काल तिने मला तसेही सांगितले होते की, ती जिकडे आहे तिकडे नेटवर्क पकडत नाही त्यामुळे मग मी तुला फोन केला... तू तिच्यापर्यंत माझा निरोप पोहोचवू शकतोस का ? " मिस्टर विश्वास काळजीने बोलतात...
" सर आता आम्ही तयारी करून भार्गवी ताईकडे जाणार होतो परंतु थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला नाही वाटत की, मला आज त्यांच्याकडे जाता येईल.... " सौरभ शांत स्वरात एक नजर समोर असलेल्या दीक्षा कडे पाहून उत्तर देतो...
" प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय झाले आहे ? " मिस्टर विश्वास यांना त्याचं बोलणं ऐकून मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात....
" सरकार रात्रीपासून दोन माणसं आमच्या पाड्याच्या मेन गेटच्या जवळ असलेल्या झाडाझुडपामध्ये लपवून नजर ठेवत आहे... मला असं डाउट आहे की , ते भार्गवी ताईचा शोध लावण्यासाठीच नजर ठेवत असेल .... जर का त्यांनी आम्हाला पाड्यातून बाहेर जाताना पाहिले आणि आमचा पाठलाग केला तर भार्गवी ताई प्रॉब्लेम मध्ये येईल म्हणून मग आम्ही आज त्यांना भेटायला जायचे टाळले आहे..... " सौरभ त्याच्या मनात असलेली शंका बोलून दाखवतो...
" तुझा बरोबर आहे सोबत तुम्ही आज तिला भेटायला जाऊ नका ते नक्कीच भार्गवीसाठीच तुमच्यावर पाळत ठेवून आहेत कारण त्यांची काही माणसं इकडे माझ्या घराच्या बाहेरही माझ्यावर नजर ठेवून आहे..... मी जिथे कुठे जात आहे ते तिकडे माझा पाठलाग करत माझ्या पाठी येत आहे..... " मिस्टर विश्वास
" सर मग आता आपण काय करायचं... हे लोक किती दिवस आपल्यावर अशी नजर ठेवणार आहे ते आपल्याला काही माहित आणि तेवढा वेळ भार्गवीताई तिच्याजवळ कोण असेल.... मला तर वेगळीच भीती वाटत आहे.... " सौरभच्या मनामध्ये आता काळजी निर्माण होते....
" कसली भीती? " मिस्टर विश्वास पण काळजीच्या स्वरात विचारतात....
" जसे त्यांनी आपल्यावर नजर ठेवण्यासाठी माणसे पाठवले आहे... तशी त्यांनी जंगलामध्येही काही माणसं भार्गवी ताईला शोधायला पाठवले असतील तर.. भार्गवी ताई जोपर्यंत जंगलामध्ये असलेल्या त्या घरात आहे तोपर्यंत सुखरूप आहे, पण त्यांनी त्या घरातून बाहेर पडायला नको... त्यांना तर ही गोष्ट पण माहित नाही की , त्या लोकांची माणसं आपल्या सगळ्यांवर नजर ठेवत आहेत.... काहीही करून आपल्याला ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवावी लागेल, पण ते जिकडे राहतात तिकडे नेटवर्क पकडत नाही त्यामुळे आपल्यापैकी कोणाला तरी त्यांच्याकडे जावं लागेल आणि त्यांच्या माणसांमुळे आम्ही दोघे तर या पाड्या मधून बाहेर पडू शकत नाही.... " सौरभ
" सौरव तुम्ही जिकडे राहता तिकडे जवळच असलेल्या जंगलामध्ये भार्गवी राहत आहे ना... " मिस्टर विश्वास काहीतरी विचार करत त्याला प्रश्न विचारतात...
" हो सर, आमच्यापासून अर्धा तासाच्या अंतरावरच त्या राहतात... " सौरभ
" ठीक आहे, मग आता या माणसांचा खेळ यांच्यावरच उलटवला पाहिजे त्यामुळे आपण कोणीही घरातून बाहेर पडणार नाही त्यामुळे ते लोक आपल्यावर नजर ठेवत तसेच बसून राहतील , पण त्यांची ही गोष्ट भार्गवीपर्यंत ही पोहोचायला पाहिजे त्यामुळे मी काहीतरी विचार करत आहे... सौरभ तू माझा एक काम करशील का ? " मिस्टर विश्वास गुढ विचार करत असतात...
" बोला ना सर , मी जमेल ती मदत करायला तयार आहे... " सौरभ पण त्याची लगेच तयारी दाखवतो...
" ठीक आहे.... तुला काय करायचं आहे ते मी वेळ आल्यावर सांगितलं तुला, तोपर्यंत तुम्हाला तुझे लोकेशन पाठवून ठेव.... " मिस्टर विश्वास त्याला सांगून थोडा वेळ त्याच्यासोबत बोलून फोन ठेवून देतात... सौरभ ही लगेच त्यांना त्यांच्या मोबाईलवर स्वतःची लोकेशन पाठवतो....
सौरभने लोकेशन पाठवल्या बरोबर मिस्टर विश्वास चे लोकेशन सर्च करू लागतात तेव्हा त्यांना त्या जंगलाचा अंदाज येतो.... त्यांच्याकडून त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तास लागणार होते... मिस्टर विश्वास या सगळ्याचा विचार करता शेवटी त्यांना एक युक्ती सुचते... आपला फोन उचलतात आणि एका नंबर वर फोन करतात.... त्यांचा बराच वेळ त्या फोनवर बोलणं चालू असते.... समोरच्या व्यक्तीला व्यवस्थितपणे सगळं समजावल्यानंतर ते फायनली फोन ठेवून देतात....
मिस्टर विश्वास आपल्या घरात काम करणाऱ्या माणसाला एका कॉफी स्वतःसाठी बनवून घेऊन यायला सांगतात... कॉफीचा कप घेऊन ते मुद्दामून त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या बाल्कनी मध्ये जाऊन बाहेर पाहत असतात.... त्यांची नजर त्यांच्या बाल्कनी पासून तीरक्या अंतरावर खाली असलेल्या एका चहाच्या टपरीवर जाते.... तिकडे दोन माणसांच्या चहा पीत बसलेले त्यांना दिसतात....
" तुम्हाला माझ्यावर किती नजर ठेवायची आहे ती ठेवा.... मी तुमच्या नजरेसमोरून कुठे हलणारही नाही आणि माझं काम ही पूर्ण करेल.... " अशा अविर्भावातच हे मुद्दामून बाल्कनी मध्ये उभे राहूनच कॉफी पिऊ लागतात....
.
..
...
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा