Login

लग्न – एक छलावा भाग ४५

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
कालपर्यंत मी फक्त तुमच्या सोबत येऊन उभा होतो,  पण आज मनापासून सांगतो की , मी तुमच्या सगळ्या कामांमध्ये मनापासून तुमची मदत करेल....माझ्याकडून जे काही शक्य असेल ते सगळं करायला मी तयार आहे, पण फक्त तू मला एकदा माफ कर.... " सौरभ हात जोडून भार्गवीची माफी मागू लागतो....

आत्ता पुढें,

" नाही सौरभ, तू अशी माझी माफी मागू नकोस... अरे प्रत्येक व्यक्तीच हे असंच असतं... आजकाल सगळ्यांना पैसा इतका महत्त्वाचा वाटत आहे की त्याच्यापुढे सगळी नाती, आपली माणसं, या गोष्टीचा कोणी विचार करत नाही , पण तू केलास....

भले तुझ्या मनामध्ये थोड्या वेळासाठी लालच आला होता परंतु आपल्या माणसाचा विचार करून मात्र तू आपल्या त्या विचारांवर मात केलीस... अरे प्रत्येक माणसाचं मन हे दोन्ही बाजूने विचार करत असते.... प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात सगळं काही मिळवण्याचा ध्यास असतो आणि त्याच्यासाठी त्याच्यासमोर दोन रस्तेही असतात....

एक रस्ता हा प्रामाणिकपणे सत्याच्या बाजूने असल्यामुळे तो थोडा खडतर असतो , त्याच्यावर चालत असताना सुरुवातीला खूप कष्ट करावी लागतात, अनेक संकटांना सामोरे जावे लागते , परंतु त्यानंतर त्या रस्त्यावर चालून शेवटी मिळणारा आनंद पण अनमोल असतो.... पण आज या जगात कोणालाही एवढे कष्ट करायचे नसतात त्यामुळे मग ते लोक दुसऱ्यांना रस्ता निवडतात त्यात सुरुवातीला तर सगळं काही सोपे वाटते पण नंतर जाऊन खूपच अवघड होऊन बसते... प्रत्येकाला आपल्या केलेल्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते म्हणून कधीही चांगलं काम करावे....

सौरभ तुझे मन खरंच खूप चांगले आहे म्हणून तर तू मनात लालच आलेला असून देखील पहिला आपल्या माणसाचा विचार केला आणि माझी मदत करण्यासाठी तयार झाला यावरून समजतेकी, तुझे दीक्षावर किती प्रेम आहे...

दीक्षा तुझ्यावर एवढा प्रेम करणारा व्यक्ती तुझ्या आयुष्यात आहे त्यामुळे त्याच्या प्रेमाला समजून घे आणि त्याला तपासून कधी दूर जाऊ नकोस.... " भार्गवी प्रेमाने दीक्षा कडे पाहून तिला समजावू लागते... दीक्षा पण प्रेमाने सौरभ कडे पाहू लागते...

" थँक्यू ताई, खरंच दीक्षाला गमावण्याच्या भीतीने मी आजपर्यंत तिला ही गोष्ट सांगू शकलो नाही पण आज तुमच्यामुळे हे शक्य झाले ... " सौरभ खुश होऊन भार्गवी कडे पाहून बोलतो....

" आता माझ्या आयुष्यात आलाच आहेस तर इतक्या सहजासहजी तुझी माझ्याकडून सुटका होणार नाही.... सौरभ माझी मनापासून अशी इच्छा आहे की भार्गवीताई व्यवस्थित तिच्या घरी पोहोचली पाहिजे आणि तिच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आपण कसेही करून त्या पोलिसांपर्यंत पोहोचवले पाहिजे जेणेकरून त्या माणसांना शिक्षा होईल आणि आपल्या देशाला त्रास देणारे काही माणसे तरी कमी होतील.... " दीक्षा सौरभ कडे पाहून काकुळीने बोलते....

" दीक्षा तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.... समोर किती मोठ्या संकट येऊ दे, तरीही मी हार मानणार नाही.... भार्गवी ताई तुम्ही फक्त सांगा मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकतो मी तुमची सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे...." सौरभ आत्मविश्वासाने त्या दोघींकडे पाहून उत्तर देतो....

" ताई हे नवीन सिम कार्ड आम्ही घेऊन आलो आहे... हे फरशी नावावर बनवले आहे त्यामुळे त्या लोकांना सहजा सहज आपली माहिती मिळणार नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो दुसरा फोन आम्ही पंजाबला जाणार आहे का ट्रक मध्ये लपवून ठेवला आहे...." दीक्षा भार्गवीला सांगू लागते....

" चला एक काम तर पूर्ण झाले , आता दुसरं काम म्हणजे हे सिम मला या मोबाईल मध्ये टाकून चालू करावे लागेल, पण या जंगलात नेटवर्क पकडत नाही त्यामुळे माझ्या ओळखीचे एक मित्र आहेत त्यांना जी माहिती पोहोचवायची आहे ती पोहोचण्यासाठी मला या जंगलातून बाहेर पडावे लागेल..... " भार्गवी ते सिम कार्ड आपल्या हातात घेऊन बोलू लागते....

" ताई तुमची हरकत नसेल तर आपण असे करूया का , मी माझी गाडी सोबत घेऊन आलो आहे तर तुम्ही आता माझ्यासोबत चला..... मी तुम्हाला आता रोडच्या दिशेने घेऊन जातो तिकडे व्यवस्थित नेटवर्क मिळेल... तिकडून तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीला जे काही मेसेज पाठवायचे असेल ते पाठवा, मग परत तुम्हाला इकडे सोडतो तोपर्यंत दीक्षा आपली या घरात वाट पाहत बसेल.... इकडे आल्यावर मग मी दीक्षा ला घेऊन घरी जातो..... " सौरभ एक नजर भार्गवी कडे पाहून दीक्षा कडे बघत बोलतो.....

" हो चालेल ना... ही खूप चांगली आयडी आहे... ताई तुम्ही सौरभ सोबत जावा आणि तुम्हाला जे काही महत्त्वाचे मेसेज करायचे असेल ते करा... तोपर्यंत मी इकडेच बसून तुमच्या दोघांची वाट पाहते.... " दीक्षा खुश होऊन भार्गवी कडे पाहून बोलते... भार्गवी ला पण ही आयडिया चांगली वाटते त्यामुळे ती तू मोबाईल ते सिम कार्ड घेते आणि सौरभ कडे देते सौरभ त्या दोन्ही गोष्टी आपल्या त्यांच्या खिशात टाकतो.... भार्गवी एक ओढणी घेऊन त्यांनी आपला चेहरा व्यवस्थित कव्हर करते.....

" दीक्षा आम्हाला यायला कदाचित थोडा वेळ होईल तोपर्यंत तू इकडे बसशील ना ? " भार्गवी तिच्या काळजीने तिला विचारते....

" हो ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका .. हे ट्री हाऊस बनवल्यापासून आम्ही खूप वेळा इकडे एकटे राहिलो पण आहे.... सध्या तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या ते खूप महत्त्वाचे आहे.... " दीक्षा त्याच्याकडे पाहून समजावते....

सौरभ भार्गवीला घेऊन त्या घरातून बाहेर पडतो.... भार्गवी सौरभच्या गाडीवर त्याच्या मागे जाऊन बसते.... सौरभ दीक्षा कडे पाहून तिला नजरेनेच इशारा करतो.... दीक्षा पण हसून त्याला स्माईल देते... तसा तो गाडी चालू करून भार्गवीला घेऊन रोडच्या दिशेने निघून जातो.....

' चला ते दोघे तर त्यांच्या कामाला गेले... मी भार्गवी ताई साठी काही सामान घेऊन आले आहे. . ते दोघं इकडे येईपर्यंत मी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करते... ' असा विचार करतच दीक्षा तिने आपल्या सोबत आणलेले सामान घेऊन त्या ट्री हाऊस मध्ये असलेल्या छोट्या किचनमध्ये जाते आणि ते सामान वापरून त्या तिघांसाठी जेवण बनवायला घेते.....

तासाभरात ते लोक त्या जंगलातून बाहेर रोडच्या दिशेने पोहोचतात..... भार्गवी त्या फोनमध्ये नवीन सिम कार्ड टाकून फोन चालू करते.... त्या फोनमध्ये नेट वगैरे सगळं ऑन करून भार्गवी मिस्टर विश्वास यांचं एफ बी अकाउंट शोधू लागते... तिला ते सापडते... अशी ती त्यांच्या त्या अकाउंटवर आपला मेसेज सेंड करते आणि नंबर सेंड करून त्यांच्या कॉल ची वाट पाहू लागते....

कोणालाही ते दिसू नये म्हणून सौरभ त्याची बाईक जंगलामध्येच काही अंतरावर एका झाडाच्या आडोशाला पार्क करून येतो.... ते दोघेपण रोड जवळ असलेल्या एका झाडाचे आडोशाला लपून बसलेले असतात.... बराच वेळ भार्गवी मिस्टर विश्वास यांच्या उत्तराची वाट पाहत तिकडे बसलेली असते पण अजून पर्यंत त्यांनी तो मेसेज बघितलेला नसतो.... सौरभ मात्र त्या झाडाच्या आडोशाला उभा राहून सगळ्या रोडवर नजर फिरवत असतो, जेणेकरून कोणी आले की त्यांना पटकन लपता यावे......

************************************
रात्रभर त्या व्यक्तीची माणसं जंगलामध्ये भार्गवीला शोधत असतात , पण कोणीही त्यात ट्री हाऊस पर्यंत पोहोचलेले नसते... सकाळी सौरभने फोन ऑन करून ट्रॅक्टर मध्ये टाकलेला असतो त्याच्या काही वेळातच इकडे अरुण ला त्यांच्या लॅपटॉप वर मोबाईल फोन ऑन झाल्याचा मेसेज मिळतो.... योगेश आणि ती व्यक्ती दोघेपण तिकडेच थोड्या वेळापूर्वी येऊन बसलेले असतात....

" हे बघा तिने आत्ताच थोड्या वेळापूर्वी तो मोबाईल फोन केला आहे... त्या मोबाईल फोनचा सिग्नल येत आहे.... " अरुण लॅपटॉप कडे पाहून त्या दोघांना सांगतो.... कसे ते दोघे पण पटकन पुढे येऊन पाहू लागतात....

" म्हणजे कालची पूर्ण रात्र ती जंगलामधून या रोडच्या दिशेनेच जात होती आणि आता सकाळी या रोडवर गेल्याबरोबर तिने मोबाईल फोन ऑन केला..... आता ती नक्कीच शहराच्या दिशेने जाण्याचा विचार करणार, आपल्याला आपली माणसे या दिशेला पाठवायला पाहिजे.... " योगेश लॅपटॉप कडे पाहून आनंदाने बोलू लागतो...

" अरुण तू फोन करून तिला शोधत असलेले आपल्या सगळ्या माणसांना इकडे बोलावून घे आणि हो शहरात जी काही आपली माणस आहेत त्यांना पण आधीच इन्फॉर्मेशन देऊन ठेव म्हणजे ते लोक तिला शहरांमध्ये येण्याआधीच पकडतील.... तो तिच्या आजीला सोडायला जो गेला होता तो तिच्या आजीला परत घेऊन आला की नाही.... " ती व्यक्ती शांत चेहऱ्याने बघून विचारू लागते.....

भार्गवीला रात्रभर शोधत असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे वैतागलेले भाव अचानकपणे नष्ट होऊन पुन्हा एकदा राक्षसी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले असतात.... यावेळी ती आपल्या तावडीत आल्यावर मात्र तिला खूप त्रास द्यायचा, तिच्यासाठी आपण जेवढा त्रास सहन केला आहे त्याचा सगळ्याचा बदला घ्यायचा असे विचार त्याच्या मनात सध्या चालू असतात..... तरीही कुठे काहीतरी गडबड आहे असे त्याचे मन त्याला सतत सांगू लागते.....