Login

लग्न – एक छलावा भाग ५२

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" भार्गवी आता मी तुला सोडणार नाही..... " त्या व्यक्तीला हे सगळं ऐकून इतका राग आला होता की , त्याने रागानेच आपल्या हातात असलेला मोबाईल समोरच्या आरशावर फेकून मारला......

आत्ता पुढें,

" आता आपण काय करायचं , त्या भार्गवीला कस शोधायचं ? " अरुण त्याचा राग पाहून थोडा घाबरतच त्याला विचारतो...

" जेव्हा तो फोन चालू झाला तेव्हापासूनच मला तिच्यावर थोडा डाऊट येत होता... त्या मुलीला या सगळ्या गोष्टीचे उत्तम नॉलेज असताना पण ती असं फोन चालू कशी काय ठेवू शकते, असे सतत माझ्या मनाला वाटत होते... तिने हा सगळा सापळा रचला होता आपले लक्ष भटकवण्यासाठी...

तिने प्लान तर खूप छान केला पण अजून तिने मलाही व्यवस्थित ओळखले नाही.... आता तर पहिलं आपल्या सगळ्या माणसांना इकडे बोलाव.... त्यातले अर्धी माणसं या जंगलामध्ये सगळीकडे पसरव, जंगलाचा एक एक काना कोपरा शोधून काढायला सांग.... मला असे वाटते की, ती अजूनही इकडेच कुठेतरी असेल कारण इकडे नेटवर्क पकडत नाही त्यामुळे आपण या जंगलामध्ये तिचा शोध कधीच घेऊ शकणार नाही....

मला त्या पाड्यातील आदिवासी लोकांवरही डाऊट घेत आहे त्यामुळे आपल्या काही माणसांना त्या पाड्या च्या आजूबाजूला राहून निगराणी करायला सांग... पाड्यांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर डाऊट आला की लगेच आपल्याला इन्फॉर्मेशन पाठवायला सांग...

आपली शहरात असलेली माणसं त्यांची एक मीटिंग बोलो आणि त्या लोकांना त्या विश्वास च्या घराच्या आजूबाजूला पहारा द्यायला सांग कारण ज्या प्रकारे ती पोलीस स्टेशनमध्ये असताना तो माणूस तिची मदत करत होता त्या प्रकारे तो अजूनही तिची मदत करेल असे मला वाटत आहे..... " ती व्यक्ती आपल्या डोक्याने विचार करत आपल्या माणसांना एकावर एक ऑर्डर देऊ लागते....

" ठीक आहे मी आत्ताच आपल्या सगळ्या माणसांना इकडे यायला सांगतो... आपण त्यांच्यासोबत एक मीटिंग घेऊया आणि मग कोणाला कुठे पाठवायचंय हे ठरवूया... " अरुण त्याच्याकडे पाहून उत्तर देतो....

" मी आपल्या शहरात असलेल्या माणसांना विश्वास याचा पत्ता शोधून काढायला सांगून त्याच्या घरावर नजर ठेवायला सांगतो..." योगेश लगेच पुढे जाऊन बोलतो ते दोघेपण त्याचं बोलणं ऐकून त्यांचं काम करण्यासाठी तिकडून निघून जातात....

' अजून किती दिवस तू अशी माझ्यापासून लांब फिरत , लपत राहणार आहेस कधीतरी तुला माझ्यासमोर यावे लागेलच.... तेव्हा या सगळ्या गोष्टीचा बदला तुझ्याकडून घेतला जाईल... ' तो माणूस रागाने भार्गवी चा विचार करत बोलू लागतो...

**************************

बराच वेळ मिस्टर विश्वास यांच्यासोबत बोलून झाल्यानंतर मेघा आणि रोहन दोघे पण त्यांच्या घरातून बाहेर पडतात...

" रोहन मला भार्गवीसाठी खरच खूप वाईट वाटत आहे रे बिचारीचे आयुष्य क्षणात बदलून गेले... " मेघा भार्गवीसाठी हळहळ करत बोलू लागते...

" तुझं बरोबर आहे मेघा... त्या माणसासोबत लग्न करून भार्गवीने आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे... त्याचे परिणाम ते आता भोगत आहे, पण आपण आहोत ना तिच्यासोबत..... आता काहीही झाले तरी आपण आपल्या मैत्रिणीला एकटीला सोडायचे नाही...

त्यावेळी नक्कीच तिला धर्मेश च्या वागण्यामध्ये काहीतरी डाउट आला असेल म्हणून तर तिने आपल्याला तिच्यापासून दुरावा घ्यायला सांगितला होता.... जेणेकरून कोणाला आपल्यावर डाऊट येणार नाही... याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला त्याची मदत करायची आहे.... " रोहन मेघाला समजवण्याच्या स्वरात बोलतो...

" तिला किडनॅप करणारी माणसं नक्की कोण असतील आणि तिचा तो नवरा धर्मेश इतका निर्दयी कसा काय असू शकतो ? त्याला भार्गवीच्या आजीचा ऍड्रेस त्या माणसाला द्यायला लाज कशी वाटली नाही.... " मेघा रागाने धर्मेश चा विचार करत बोलते....

" मेघा जर तो माणूस स्वतःच्या बायकोचा विचार करू शकत नाही तर मग तिच्या आजीचा विचार करावा, अशी आपण त्याच्याकडून अपेक्षा करू शकत नाही ना... " रोहन ला ही वाईट वाटू लागते...

" रोहन मी असे ऐकले होते की भार्गवी कडून काही पैसे दंड बसून करण्यासाठी पोलिसांनी तिच्या त्या घरावर जप्ती आणली आहे, आता तिचे घर तिचे राहिले नाही...." मध्येच मेघाला आठवण होते तशी ती रोहन कडे पाहून त्याला विचारते...

" हो, ज्या दिवशी तुला न्यायाधीशाने शिक्षा सुनावली होती त्याच्या नत्र लगेच तिच्यावर लावलेल्या दंडाची रक्कम मिळवण्यासाठी पोलिसांनी तिच्या घराची नीलामी केली.... त्या निलामी मध्ये तिचे घर कोणी खरेदी केली हे मात्र मलाही माहित नाही.... " रोहन ही हळव्या स्वरात बोलू लागतो...

" आपल्या ऑफिसमध्ये लागल्यानंतरच एक वर्षानंतर भार्गवीने किती आनंदाने ते घर विकत घेतले होते.... त्या घराची पूजा केली तेव्हा ती किती खुश होती... तिच्या स्वप्नप्रमाणे तिने आपले घर सजवले होते आणि आज तेच घर तिथे राहिले नाही... खरंच ! एखाद्या माणसाच्या आयुष्याची वेळ कधी पालटेल हे कोणालाही सांगता येत नाही... " मेघा रडतच बोलू लागते....

" मी स्वतः तिच ते घर विकत घेण्याचा विचार केला होता... जेणेकरून पुढे जाऊन भार्गवीला तिचे घर परत देता येईल , पण पोलिसांनी मात्र त्यांच्याच काही माणसांना तिकडे बोलावले होते..... त्यावेळी धर्मेशही तिकडे असल्यामुळे मला तिकडे जाऊन पोलिसांसोबत काही बोलता ही आले नाही.... " रोहन ही तिला सांगू लागतो त्यांचं बोलणं चालू असतानाच त्यांची गाडी मेघाच्या घराजवळ येऊन थांबते....

" रोहन... " मेघा इतकी अस्वस्थ झालेली असते की तिला गाडीतून खाली उतरायचे ही भान नसते....

" मेघा जे घडायचं होतं ते घडून गेलं आता त्याचा विचार करून काही उपयोग नाही... पुढे काय करता येईल आपल्या मैत्रिणीला या सगळ्या संकटांमधून कसं सोडवता येईल आपण आता याचा विचार करूया... राहिला प्रश्न घराचा तर भार्गवी इतकी हुशार आहे की , एकदा का ती या सगळ्या संकटातून बाहेर पडली की पुन्हा ती तिचा नवीन घर घेऊ शकते.... " रोहन मेघाकडे पाहून तिला समजावण्याच्या स्वरात बोलतो.... मेघा त्याला बाय करून आपल्या घराच्या दिशेने निघून जाते.... तिला घरात व्यवस्थित पोहोचलेले पाहून रोहन आपली गाडी चालू करतो आणि त्याच्या घराचा रस्ता गाठतो....

****************************

जेवण केल्यानंतरही दीक्षा आणि सौरभ बराच वेळ भार्गवी सोबत गप्पा मारत तिकडे बसलेले असतात....

" ताई मी येतानाच काही सामान घेऊन आले होते आणि ते सगळं सामान्य किचनमध्ये व्यवस्थित ठेवून दिले आहे.... आज रात्रीचे जेवणही मी आत्ताच बनवले आहे त्यामुळे तुम्हाला काय करायची गरज नाही....

उद्या सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला इकडे भेटायला येऊ , पण तरीही माझ्या मनाला वाटले म्हणून मी जास्तीत जास्त सामान घेऊन आले त्याच्यासोबत काही फळही आहेत.... किचनमध्येच एक मातीचा घडा मी स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेला आहे ते पाणी तुम्हाला पिण्यासाठी उपयोगी येईल.... " दीक्षा भार्गवी कडे पाहून तिला सगळं सांगू लागते....

" दीक्षा खरंच तू माझ्यासाठी खूप करत आहेस अगं एवढं तर आपली सखी बहिणही करत नाही... " भार्गवी तिच्याकडे पाहून हळव्या स्वरात बोलते....

" एवढा पण काही नाही केलं ताई... तुम्ही पण तर त्या माणसांच्या काळ्याधंद्यापासून इतर माणसांना वाचवण्यासाठी इतके प्रयत्न करत आहात.... त्यांचं सत्य जगासमोर आणण्यासाठी इतक झटत आहात.... ज्यावेळी हे सत्य पोलिसांना समजेल तेव्हा आपल्या देशाचं किती मोठं नुकसान होण्यापासून वाचेल... ज्या दिवशी तुम्ही या सगळ्या संकटातून व्यवस्थितपणे बाहेर पडाल तेव्हाच मला छान वाटेल.... मी देवाकडे प्रार्थना करेल की, त्याने तुम्हाला इतकी शक्ती द्यावी की तुम्ही सगळ्या संकटावर मात करून त्याचा सामना करावा... " दीक्षा तिच्याकडे पाहून बोलू लागले...

" दीक्षा आता आपल्याला निघायला पाहिजे.... आपण सकाळी लवकरच कामाचं निमित्त घेऊन घरातून बाहेर पडलो आहे, पण अजून जास्त वेळ आपण इकडेच थांबलो तर आपल्या घरच्यांना आपल्यावर संशय येईल आणि ते आपल्याला शोधण्यासाठी इकडे येतील..." मध्येच सौरभ त्या दोघींकडे पाहून दीक्षाला बोलू लागतो.....

"हो दीक्षा तुम्ही दोघेही आता तुमच्या घरी जावा... तोपर्यंत आपलं हे काम पूर्ण होत नाही कोणालाही आपल्या संशय यायला नको... आज माझे पण एक महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे... मी त्या माणसांबद्दल काही डिटेल्स मिस्टर विश्वास यांच्याकडे पाठवून दिले आहे त्यामुळे ते आता आपले काम पूर्ण करतील.... ते पोलिसांनी जवळ जाऊन त्या माणसांच्या विरोधात अरेस्ट वॉरंट नक्की काढायला सांगतील.... मग मला जास्त वेळ अशी लपून बसण्याची गरज पडणार नाही... " भार्गवी खुश होऊन त्या दोघांकडे पाहून बोलू लागते.....

" ठीक आहे ताई ... आम्ही आता निघतो पण उद्या सकाळी लवकरच तुम्हाला भेटायला इकडे येऊ... तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि या घरातून बाहेर पडू नका.... " दीक्षा काळजीने तिच्याकडे पाहून तिला सांगू लागते....

" तुम्ही दोघं पण स्वतःची काळजी घ्या... ती माणसं खूप विचित्र आहेत त्यामुळे ते कधी पण तुमच्या पाड्यांमध्ये पुन्हा येऊ शकतात.... तुमच्या दोघांनाही त्या माणसांपासून सावध राहायला पाहिजे... " भार्गवी त्या दोघांकडे पाहून त्यांनाही प्रेमाने सांगू लागते....