सायलीच्या हातात एक डायरी होती… तिच्या आईची शेवटची आठवण...
खिडकीबाहेरून ट्रेन मागे सरकत होती, पण तिच्या मनात आठवणींचा गोंधळ सुरू होता... तिच्या आईने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना तिच्या हातात दिलेली ती डायरी... आईच्या मृत्यूनंतर तिने ती वाचली...
खिडकीबाहेरून ट्रेन मागे सरकत होती, पण तिच्या मनात आठवणींचा गोंधळ सुरू होता... तिच्या आईने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना तिच्या हातात दिलेली ती डायरी... आईच्या मृत्यूनंतर तिने ती वाचली...
> “सायली, तू माझी खरी मुलगी नाहीस… पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस... तू या जगात आलीस ते एक भयंकर निर्णय होतं… पण मी तुझं प्रारब्ध बनले… ही माझी सर्वोच्च भूमिका होती... मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला नवीन अर्थ मिळाला होता... ”
आपल्या आईच्या डायरीत आपल्यासाठी लिहिलेला तो मजकूर वाचून सायलीच्या डोळ्यांत पाणी आलं.....
“आई… तू इतकी वर्षं हे सगळं एकटीच उराशी बाळगलं… आणि मला कधीच जाणवू दिलं नाही?” सायली अजूनही ट्रेनच्या बाहेर बघत डोळ्यातून अश्रू काळात मनातूनच आपल्या आईला विचारत होती...
ती पुण्याहून नाशिकला आईच्या एकमेव जवळच्या मैत्रिणीकडे निघाली होती—शेवंतीबाईंकडे....
नाशिक स्टेशनवर उतरताच गार वाऱ्याची झुळूक तिच्या शरीराला स्पर्श करून गेली त्याचबरोबर आईच्या डायरेक्ट लिहिलेल्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर फिरू लागल्या... ती थेट शेवंतीबाईंच्या जुन्या वाड्याकडे पोहोचली....
" कोण? " मलुल झालेल्या चेहऱ्याने दाराच्या दिशेला पाहून आवाज दिला....
" मी सायली... अंजली परांजपे यांची मुलगी... " सायली ने शांत स्वरात उत्तर दिलं...
" सायली बाळा तू... " त्यांनी भरल्या डोळ्यांनी पुढे येऊन तिला मिठी मारली.... सायलीलाही काही क्षण आपल्या आईने जवळ घेतल्यासारखे वाटू लागले...
“तू… तू आलीस, सायली… अगदी अंजलीसारखीच दिसतेस. बस, थकली असशील...”
सायली शांतपणे बसली आणि ती डायरी त्यांच्यापुढे ठेवली.
सायली शांतपणे बसली आणि ती डायरी त्यांच्यापुढे ठेवली.
“आईने लिहिलं होतं… मी तिची मुलगी नाही…”
शेवंतीबाईंचं हसू क्षणात विरलं...
शेवंतीबाईंचं हसू क्षणात विरलं...
“हो गं… पण तू तुझ्या आईचं ‘सर्वस्व’ होती... तुला ती लहान असताना घेऊन आली होती.... मला म्हणाली होती—‘मी या मुलीचं प्रारब्ध बदलणार आहे…’”
सायलीच्या मनात वेदनेचा स्फोट झाला...
“माझा जन्म... कोणाकडे झाला होता, शेवंतीबाई? त्यांनी मला का सोडलं?” सायलीने थरथर त्या शब्दात त्यांना विचारले...
शेवंतीबाई थोडा वेळ गप्प राहिल्या....
“तुझ्या आईने काही पत्ते ठेवले होते, तुझ्या खऱ्या जन्मदात्यांचे... पण एकदा विचार कर—तुला हे खरंच जाणून घ्यायचं आहे का?” शेवंती बाईंनी पण गंभीर स्वरात तिला विचारले...
सायलीच्या डोळ्यांत स्पष्टता होती....
“हो. मी माझं संपूर्ण आयुष्य एक सत्य समजून जगले... आता मला दुसरं सत्य समजून घ्यायचं आहे...” तिच्या शब्दातही स्पष्ट भाव उमटले...
शेवंती बाई ने त्यांच्याजवळ असलेला जुना कागद तिला दिला....
त्या पत्त्यांवरून सायली त्या गावापासून तासभराच्या अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या गावात पोहोचली... तिथे एक मोठं, पण मोडकळीस आलेलं घर होतं—श्यामराव वाडा....
त्या पत्त्यांवरून सायली त्या गावापासून तासभराच्या अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या गावात पोहोचली... तिथे एक मोठं, पण मोडकळीस आलेलं घर होतं—श्यामराव वाडा....
तिने दरवाज्यावर टकटक केली....
" पोरी कोण ग तू ? " एक वृद्ध स्त्री दरवाज्याशी आल्या...
“ही जागा वसुधा देशमुखांची आहे का?” सायलीने शांतपणे त्यांच्याकडे पाहून त्यांना उत्तर दिलं..
" हो आहे , पण ती आता हयात नाही... मी तिची मावस बहीण... " त्या वृद्ध स्त्रीने सायलीचे निरीक्षण करत उत्तर दिले.... सायलीने त्यांना तिचे तिकडे येण्याचे कारण सांगितले... ते ऐकून मात्र त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली...
“तू… तू त्यांची मुलगी?” त्यांनी आशेने तिच्याकडे पाहून तिला विचारले...
सायली गप्प....
“मी… त्यांच्या बाबतीत शोध घेत आहे... जर त्यांना माझा सांभाळ करायचाच नव्हता तर त्यांनी मला जन्म का दिला ? " सायलीने थोड्या रागीट आवाजातच प्रश्न विचारला...
त्या स्त्रीने सायलीला आत नेलं.... सायली त्या वाड्याचे निरीक्षण करतच आत जाऊन बसली...
“माझं नाव जानकी... मी वसुधाची मावसबहिण... कधी कधी माणूस आपल्या आयुष्यात भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतो.... त्याला असे वाटते की कदाचित तू काहीतरी चांगले करत आहे परंतु या निर्णयामुळे पुढे जाऊन काय होऊ शकते याचा अंदाज त्याला तेव्हा नसतो... असेच काहीसे तुझ्या आईच्या बाबतीत ही झाले... तुला आपल्या आईच्या भूतकाळात काय काय झाले होते हे जाणून घ्यायचे आहे का ? ” जानकी शांत स्वरात सायली कडे पाहून सांगत होती...
सायली मनाने सज्ज होती.... हे सगळं ऐकण्यासाठी इतक्या लांबचा प्रवास करून इथपर्यंत आली होती...
“रामदास आणि वसुधा एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते...पण समाज, जात, कुटुंब… सगळ्याचा विरोध... त्यांनी गुपचूप लग्न केलं.. . वसुधा गरोदर राहिली… पण दोन्ही कुटुंबांनी त्यांना नाकारलं.. . त्यांनी तुझा जन्म दिला, पण… समाजाच्या भीतीने तुला स्वीकारलं नाही.... एका हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला तुला सोडून दिलं.... तेव्हा अंजली तिथे नर्स होती… वसुधा असे करत असताना अंजलीने येऊन तिला पाहिले... अंजलीने खाली ठेवलेल्या तुला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतले आणि आपल्या हृदया कवटाळले... ”
सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले....
“त्यांनी मला… टाकलं? ” सायलीचे मन भरून आले... तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले....
जानकी बाईंचा चेहरा उतरला....
“कधी कधी प्रेमात घाबरट निर्णय घेतले जातात, सायली. पण अंजली… ती असामान्य होती... तिने तुला फक्त उचललं नाही, तर जगवली... तुझ्या आई मध्ये समाजाच्या विरोधात जाऊन लढण्याची हिंमत नव्हती, पण अंजलीने तुला सांभाळण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन लढली ही आणि स्वतः बिना लग्नाची राहिली... ”
सायली मनातून कोसळली... पण डोळ्यात नवा प्रकाश होता...
“माझं आयुष्य कोणीतरी ठरवलं… पण आता मी माझं प्रारब्ध स्वतः लिहिणार आहे....” सायलीने तिकडेच आपल्या मनाची काहीतरी ठाम निर्णय घेतला होता...
पुण्यात परतल्यावर सायलीनं आपला घेतलेला निर्णय अमलात आणण्याच ठरवले... तिने तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं ठरवलं....
“प्रारब्ध – एक शोध स्वतःचा”
त्या पुस्तकात तिने तिचं पूर्ण प्रवास उघड केला... एक नाकारलेलं अपत्य, एक स्वीकारलेली माता, आणि स्वतःची ओळख गवसलेली स्त्री....
सायलीने लिहिलेलं ते पुस्तक खूपच प्रसिद्ध झाले... त्या पुस्तकाला सगळीकडूनच खूप मागणी येऊ लागली... त्या पुस्तकाच्या निमित्ताने प्रेस कॉन्फरन्स, न्यूज, बातम्या या सगळ्या स्वरूपाने प्रत्येक घराघरात सायली प्रसिद्ध झाली...
आपल्या जन्माचे कारण जाणून देखील तिसरी खचून बसली नाही तर तिने नव्याने सुरुवात केली आपल्या अस्तित्वाचा शोध घेतला त्यामुळे सगळ्यांनाच सायलीचा अभिमान वाटू लागला... तिच्या जीवन कथेचा संबंध ते स्वतःच्या कथेशी जोडू लागले...
काही महिन्यांनी तिचं पुस्तक एका चर्चासत्रात चर्चेचं केंद्र बनलं....
तिकडे सायलीच्या पुस्तकाला सन्मान देण्यात आले तसेच तिलाही सन्मान देण्यासाठी स्टेजवर बोलवण्यात आले... सायली स्टेजवर बोलत होती…
“कधी कधी आपल्याला असं वाटतं की , आपलं प्रारब्ध ठरलेलं असतं.. . पण खरंतर प्रारब्ध म्हणजे संधी… कोण स्वीकारतो, कोण नाकारतो… हाच खरा निर्णय असतो...” सायली ने तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे पाहून मोजक्या भाषेतच तिच्या मनातली गोष्ट समजावून सांगितली...
तेवढ्यात एक पुरुष उभा राहिला....
“मी… मी रामदास देशमुख. मी तुझा जन्मदाता आहे…हे पुस्तक वाचल्यापासून तुला भेटण्याची इच्छा मनामध्ये घर करून गेली त्यामुळे तुझ्या शोधातच आज मी इकडे उपस्थित आहे... ”
त्यांच्या आवाजाने पूर्ण हॉल शांत झाला... सायली क्षणभर स्तब्ध झाली... मग हळूहळू ती माईकजवळ आली....
“ मला कोणी जन्म दिला आणि कोणी सांभाळलं हा जरी माझा भूतकाळ असला तरीही माझी ओळख नेहमी हीच राहील की , मी अंजली परांजपे यांची मुलगी सायली परांजपे आहे.. हेच माझं प्रारब्ध आहे आणि यातच मी खूप खुश आहे... " सायलीने त्या व्यक्तीकडे पाहून अगदी सहजपणे आपल्या मनातले भाव स्पष्ट केले... तिच्या बोलण्यात असलेली सहजता त्याला तेवढ्या शब्दात भरपूर काही सांगून गेली आणि तो तसाच शांत खाली बसला... पूर्ण हॉल टाळ्यांच्या गडगडाटीने गुंजला... सायलीने चेहऱ्यावर मंदस्मित ठेवून सगळ्यांचे आभार मानत स्टेजवरून बाहेर पडली.... बाहेर जाताना तिने एकदाही वळून मागे पाहिले नाही... आपल्या भविष्याकडे पहात मोकळ्या हवेमध्ये मोकळा श्वास घेऊन तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान पसरला होता...
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा