भैरवी फक्त शांत ऊभी राहून विक्रमांशूचं बोलणं ऐकत होती.
डोळे पाण्याने भरलेले.
त्याने एकवार तिच्यावर नजर टाकली आणि पुन्हा समोर मान वळवत बोलायला सुरूवात केली.
" भैरवी, संसार हा एक रथ आहे.त्याला पेलण्यासाठी पती-पत्नी या दोन्ही चाकांची तेवढीच आवश्यकता भासते.एका चाकावर पुर्ण संसाराचा गाडा हाकायचा म्हंटलं तर ती निव्वळ अशक्य गोष्ट आहे गं. "
तो एकदम काकुळतीला येऊन बोलत होता.
" पण, आतापर्यंत मी तो काहीही न बोलता रेटला ही.पण शेवटपर्यंत नाही शक्य भैरवी.तूला तूझा वेळ देऊन पहीला पण परिस्थिती सुधारण्याऐवजी जास्तचं बिघडतं चालली आहे..."
"तूला माहीतं आहे.लहानपणापासूनचं सर्वांच्या मनात \"लग्न\" या विषयाबद्दल खूप कुतूहल असतं.प्रत्येक व्यक्तीला माहीती असतं कधी ना कधी आपल्या आयुष्यात तो दिवस येणार आहे आणि आपण त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य आपल्या जोडीदाराबरोबर असंख्य वचनात बांधले जाणार आहोत.लहान वयात याबद्दल जास्त काही समजून घेण्याची इच्छा नसते. पण जस जसे आपण मोठे होत जातो.आणि जेव्हा आपण आपल्या तारुण्यावस्थेत प्रवेश करतो तेव्हा नकळत आपण आपल्या मनात आपल्या भावी जोडीदाराबद्दल प्रतीमा तयार करतो.तो असा असावा किंवा ती अशी असावी?आपण स्वप्नातचं आपल्या भावी जोडीदाराकडून अपेक्षा करायला सुरूवात करतो. आणि एकदा का आपण कोणासोबत लग्न बंधनात बांधले गेलो की,मगं आपण त्यांना आपल्या मनात तयार केलेल्या जोडीदाराच्या प्रतीमेसोबत तोलत राहतो.तूला ही असा अनुभव आला असेल.माहीत आहे मला." त्याने बोलता बोलताचं भैरवीकडे पाहिलं .
ती विक्रमांशूकडेच पाहत होती. जसं त्याने तिच्यावर नजर टाकली तसं तीने पटकन नजर चोरली.
तो मनातचं स्वतःवर उपहासाने हसला .अजूनही मोकळेपणाने नाही बोलू शकत ती.
" मानवी स्वभावाचं आहे तो. सर्वांचेच असे होते. तू ही त्याला अपवाद नाहीसं.आणि मी सुद्धा नाही.सर्वांच्या प्रमाणेचं मी ही खूप काही स्वप्न पाहिली होती माझ्या होणार्या पत्नीकडून.पण मी हे ही जाणून आहे की स्वप्न आणि प्रत्यक्ष जीवन यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. सगळेचं मनाजोगते भेटेलचं असं नाही.थोडेफार अॅडजस्ट तर सगळ्याच दांपत्यांना करावं लागत.त्याशिवाय त्याला संसार तरी कस म्हणायचं?"
भैरवीने फक्त हळूच वरखाली मान डोलावली. म्हणजे थोडक्यात सहमत आहे असेच दर्शवले फक्त शब्दांचा आधार न घेता कृतीतून.
" पणं मगं जे सगळ्याचं नवदांपत्यातं किंवा अगदी वयाची सत्तरी गाठत आलेल्या सर्व नवरा बायकोतं पाहायला मिळतात ,ज्या गोष्टींमूळे पती -पत्नीतील एक अनोळखीपणाची दरी संपून पूर्णपणे ओळख होते अशा गोष्टींचीही अपेक्षा करू नये का मी? बाकी माझ्या मनामध्ये तुझ्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा सोड, पण ज्या अगदींच शुल्लक असतात पण त्यांमुळे ते नात घट्ट वीणलं जातं, एकमेकांप्रती प्रेमभाव आपुलकी वाढते अशा अपेक्षा ही नाही का करायच्या मी तुझ्याकडून? खूप छोट्या छोट्या अपेक्षा आहेत गं माझ्या तुझ्याकडून ज्या सगळ्याचं नवरा-बायकोच्या एकमेकांकडून असतात...वाटलं होतं लग्न झाल्यावर तरी मनमोकळी बोलशील, मला समजून घेण्याचा प्रयत्न करशील...प्रेमाने डोक्यावर हात फिरवून सकाळी गोड अशी हाक देऊन मला साखरझोपेतून उठवशील.आॅफीसमध्ये गेलो तरी दुपारी फोन करून फार काही नाही पण \"जेवलात का?\"फक्त एवढा तरी प्रश्न विचारशील...काही कारणास्तव मला बाहेरून यायला उशीर झाला तर हक्काने फोन करून "कुठे आहात? कधी येणार? किंवा मगं तगमग जाणवून थोडफार तोंडसुख घेशील...कधी कधी हक्काने संध्याकाळी येताना\" मला हे घेऊन या.. ते घेऊन या."असं हक्काने लाडीगोडी लावत सांगशील.कधी नवीन साडी नेसलीस तर "मी कॉम्पलीमेंट द्यावी म्हणून माझ्यासमोरून सारखी ये -जा करशील...पण यामधील एकपण गोष्ट अनुभवायला मिळाली नाही भैरवी मला."
एव्हाना सायंकाळ होऊन पक्षी स्वगृही परतत होते.आभाळ दाटून आलं होतं.केव्हाही धो धो पाऊस कोसण्याची चिन्ह दिसत होती पण हे दोन जीव ,यांना कशाचीच पर्वा नव्हती .
एक आतापर्यंत मनात साचलेलं मन तिच्यासमोर रितं करतं होता...आणि एक फक्त शांत राहून त्याला बोलू देत होता.
"आठवं कधी केलास फोन मला? विचारलं कधी आपुलकीने जेवलात का? उशीर झाल्यावर त्याबद्दल विचारणा केलीस कधी? काही हक्काने मागितलंस मला ?कधी आपला हक्काचा नवरा आहे म्हणून कशासाठी हट्ट केलासं? कधी स्वतःहून माझ्याजवळ बोलायला आलीस?का नाही भैरवी का? माझा बर्थडे होऊन गेला दोन महिन्यांपूर्वी...मला वाटलं होतं लग्नानंतर पहीलाचं वाढदिवस आहे तर काहीतरी सरप्राईज देणार असशील किंवा अगदींच हे नाही तर रात्री बारा वाजता साधं विश तरी करशील, पण नाही भैरवी हे ही नाही.साधं पहिलं वीश अॅक्सेप्ट केलं होतं तुझ्याकडून पण ते ही माझ्या नशीबात नव्हतं. पण तरीही तूला कसं माहीती असेल?आपलं तर आत्ताचं लग्न झालं. लक्षात आलं नसेल तूझ्या.असं ही लग्न झाल्यावर त्या मुलीवर खूप जबाबदार्या पडतात ,तीचं पूर्ण जगचं बदलून जातं.रोजच्या धावपळीत विसरली असशील, म्हणून माझ्या हताश मनाला मी तेव्हा समजावलं.पण लग्न झाल्यावर आपणं आपल्या जोडीदाराच्या आवडी -निवडी, काय आवडतं काय नाही हे विचारून घेतो. मी ही तूझ्या प्रत्येक आवडी -निवडी विचारुन घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतोय, पण भैरवी तुझ्याकडून मला अस कधीचं जाणवलं नाही. ना ही तू मला कधी विचारलंसं ना ही दोन शब्द माझ्याशी बोलायला आलीसं.याचा अर्थ मी म्हणतं नाही की, तू तूझ्या कोणत्याचं जबाबदार्या योग्य रितीने पार पाडत नाही.तू घरातील सूनेच्या सगळ्या जबाबदार्या व्यवस्थित सांभाळतेस.मला ही कधी बोलायला संधी देत नाहीस. सगळी कामं अगदी मूकपणे करतेस.नवरा म्हणून मला ही काही हवं नको ते पाहतेस पण यामध्ये ही तूझी शांतता असतेच कायम."
सलग बोलून त्याला दमायला झालं होतं. थोडं शांत ऊभ राहून उरभरून श्वास घेत तो पूढे बोलू लागला.
ती काहीचं न बोलता शांत ऊभी होती. पण तो भरभर बोलताना त्याला झालेला त्रास पाहून तीच्या चेहर्यावरचे बदललेले हावभाव बरचं काही सांगून गेले त्याच्या तिच्यावर क्षणभर खिळलेल्या नजरेला.
\"काळजी तर आहे माझी! \"मनामध्ये चिमूटमर सूखावून गेला तो.
" आपण लहान असतो ना भैरवी, तेव्हा आपल्याला शाळा नको असते. फक्त बाहेर पडून मनसोक्त खेळायला, बागडायला आवडतं असतं.पण शिक्षण ही तीतकचं मस्ट आहे ,म्हणून नावीलाजाने का होईना त्या चार भिंतीच्या आत बसून, समोर चाललेल्या शीकवणूकीत भाग घ्यावा लागतो. आपली मर्जी असो वा नसो.शाळेत जायचं आणि शिक्षक जे सांगतील जसं सांगतील त्याप्रमाणे अनूकरणं करायचं.तूझ ही तसचं झालं आहे भैरवी.घरच्यांच्या इच्छेखातर की कसं, पण तू या संसाररूपी शाळेत प्रवेश घेतलास.रोज ते घोकू ही लागलीस पण ते ही फक्त एक कर्तव्य म्हणून. हे आपल्याला करायचेच आहे. असं समजून.मला मान्य आहे तू सगळ्या जबाबदार्या अगदी चोख पार पाडतेस.मगं ते एक सून म्हणून असो किंवा एक बायको म्हणून. पण त्यात जिवंतपणा नसतो गं.यांत्रीकता असते प्रत्येक गोष्टीमध्ये.आता आपण लग्न केलंच आहे तर,हे आपल्याला आयुष्यभर करायचेचं आहे अशा अर्थाने तू ते पार पाडतेस.एका नवरा बायको मध्ये जी ओढ असते ना ती जाणवतचं नाही मला कधी आपल्या दोघांत.आणि मगं माझं असं सारखं विचारात गूरफटण,आईचा आणि दीदींचा तूझ्याप्रती संशयीपणा निर्माण होणं हे सगळे तूझ्या अश्या निराळ्या स्वभावाचेचं तर परिणाम आहेत."
त्याने बोलता बोलताचं तिच्यावर नजर टाकली. वार्याचा वेग वाढला होता त्यामुळे थंडी वाजून तिचं अंग थरथरत होतं.अंगावर काटा आला होता तीच्या. पण तरीही ती तशीचं आहे त्या जागी शांत ऊभी राहून, त्याच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करून होती.आधीचं आजारी आणि आताचं वातावरणं, चेहरा अगदी कोमेजून गेला होता.
त्याने पटकन पलटी होत,गाडीचा दरवाजा उघडून बॅक सीटवरील शॉल बाहेर काढत तीच्या अंगाभोवती लपेटली.ती फक्त स्तब्धपणे त्याला पाहत ऊभी होती.
"हेच भैरवी हेच, आता ही तू आजारी आहेस. अशक्तपणा आहे तूला,थंडीने अक्षरशः अंगावर काटा उभा राहीला आहे, तरी तू मला आवाज देऊन थांबऊ शकत नाहीस की, काही तक्रार करत नाहीस.नाही हा शब्द तूझ्या मुखातून कधी बाहेर पडलाचं नाही.आता ही एवढी वीक असून माझ्यासोबत यायला नकार दिला नाहीस.हा आपला नवरा आहे आणि तो म्हणेल ते सगळं ऐकायचं, त्याला विरोध करायचा नाही, किंवा कधी स्वतःची बाजू मांडायची नाही.याला संसार म्हणत नाहीत माझ्यामते भैरवी.मी कोणीतरी मोठा महात्मा आहे आणि तू माझी दासी हे असं वागणं आहे तूझं.तूला स्वतःच्या अशा फिलींग्स, काही इच्छा, आकांक्षा नाहीत का?का अशी यंत्रवत पूतळ्यासारखी वावरत असतेस नेहमी?आपण आतापर्यंत बहूतांश वेळा शरीराने जवळ आलो भैरवी. किती अनमोल क्षण असतात ते एका पती-पत्नीचे.नात्याची वीण घट्ट विणली जाते मनाच्या जवळीकी सोबतचं शरीराने.ते अनोळखी दोन जीव पूर्णपणे एकरूप होऊन पूर्णत्वास येतात.तनाने आणि मनानेही.त्यांच्यामध्ये ह्याचं तिचं जाऊन "आपलं "ही नवीन संकल्पना तयार होते.खूप अविस्मरणीय क्षण असतात गं ते.दोन जीवांच मीलन.पण इथेही माझी निराशाचं भैरवी, इथेही निराशाचं! "
त्याने बोलता बोलताच हताशपणे आपल्या चेहर्यावरून हात फिरवला. तीच्याकडे पाहिले तर ती चेहर्यावर भलं मोठ प्रश्नचिन्ह आणि गोंधळलेली मुद्रा घेऊन ऊभी होती.
जसं ती म्हणतं होती त्याला किंवा सुचवू पाहतं होती.
मी तर आजपर्यंत तूम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्याशी समरस झाले.तोंडातून कधी ब्र शब्द ही काढला नाही.किंवा कधी नकार दिला नाही कशालाचं.मगं तरीही मी कमी पडले?काय चूकं झाली माझ्याकडून? मी नाही का एक चांगली पत्नी म्हणून तुमच्याशी एकरूप होऊ शकले?माझं सर्वस्व अर्पण करताना मी नाही का तूम्हाला योग्य तो न्याय देऊ शकले?
मी तर आजपर्यंत तूम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्याशी समरस झाले.तोंडातून कधी ब्र शब्द ही काढला नाही.किंवा कधी नकार दिला नाही कशालाचं.मगं तरीही मी कमी पडले?काय चूकं झाली माझ्याकडून? मी नाही का एक चांगली पत्नी म्हणून तुमच्याशी एकरूप होऊ शकले?माझं सर्वस्व अर्पण करताना मी नाही का तूम्हाला योग्य तो न्याय देऊ शकले?
खूप सारे प्रश्न होते तीच्या डोळ्यांमध्ये.
" तो ही एक विधी असल्यासारखी सामोरी जातेस तू नेहमी.जीथे दोन जीव उत्कटपणे एकमेकांना सामोरे जातात तीथे फक्त मीचं अग्रभागी असतो गं आणि तू फक्त शांत पडून जे काही होत आहे ते होऊ देतेस.जीथे दोघांचा सहभाग असावा तिथेही तू निश्चलपणे डोळे मिटून असतेस.मला तर असं वाटतं की,तूझ्या मनावीरूद्ध तुझं शरीर ओरबडतोय.तूझ्यावर रेप..."
"अहोsss"तीचे डोळे त्याचं असं बोलणं ऐकून क्षणात मोठे झाले.तोंडाचा आ वासून ती एकटक त्याच्याकडे पाहत होती.मान नकारार्थी हलवत, डोळ्यांत पाणी आणून ती असं काहीचं नाही हे त्याला सांगू पाहत होती जणू.
हे असा विचार कसा..??? मनातचं त्याच्या त्या व्यक्तव्यावर भैरवी गोंधळून प्रश्न करत होती.सून्न झाली होती त्याचं बोलण ऐकून.
रेप???हे माझ्यावर जबरदस्ती... नाही!!!!असं काहीचं नाही.तीचं मन तीला ओरडून ओरडून वीक्रमांशू जसा विचार करतो तसं अजीबात नाही याची जाणीव करून देत होतं.पण नेहमीप्रमाणे ते ही मनातचं,ओठांवर न येता फक्त कृतीद्वारे ती त्याच्यासमोर तीचं मत मांडत होती.
पण ,तो तर तीचे शब्दरूपी उत्तर ऐकायला आतूर होता.आणि ती आज ही निशब्दपणे गप्प ऊभी होती.तीचे डोळे, तीचे अश्रू भलेही तीचं मत मांडत होते पण ती बंद ओठांमागची शांतता त्याचा जीव घेत होती.
" हो भैरवी,समाजमान्य बलात्कार करतोय मी तुझ्यावर असं वाटतं मला नेहमी.एका नवऱ्याने त्याच्या बायकोवर केलेला अत्याचार!!! "तो फुटून बरसत होता आज शब्दांद्वारे ,आणि ती ही बरसत होतीच...
फक्त बोलत होते तीचे नयनाश्रू!!!
"सतत एक गील्ट असतं मनातं.आतापर्यंत मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला भैरवी, पण यापुढे मला मला जमणार नाही हे गील्ट मनात ठेऊन तुझ्यासोबत संसार पूढे न्यायला.आतल्या आत कूढतोय मी यासाठी रोज...तू म्हणतेस तुझ्यावर जबरदस्ती नाही केली कोणी या लग्नासाठी,तूझं कोणावर प्रेम नाही, तूझा कोणी बॉयफ्रेंड ही नाही,मी ही तूला आवडत नाही असंही काहीचं नाही, मगं कारण काय आहे नक्की तूझ्या अशा वागण्याचं ?का खटकतयं तूझं वागण मला सर्वोतोपरी?एक...एक मिनीट...तूला मुलांमध्ये इंटरेस्टचं नाही असं काही..."
"अहो, असं काहीचं नाही "तीने झटकन नाही अशी मान हलवत नकार दर्शवला.
"अगं मगं का वागतेस अशी तू ? हे बघं भैरवी, तूला जर हे नात जबाबदारी किंवा ओझ वाटत असेल ना तर आपण सांमजस्याने घटस्फोट घेऊ..." विक्रमांशू बोलत बोलतच तिच्याकडे न पाहता समोर जाऊन टेकडीच्या टोकाशी ऊभा राहीला.
तो खूपचं हतबल झाला होता.
"डिव्होर्स " साधा त्याबद्दल विचार करूनसुद्धा त्याच्या हृदयातून एक कळ जात होती.
तीच्या पासून कायमचं वेगळं व्हायचं.मन आतून खूप आक्रंदत होतं.कसा राहू शकेन मी तीच्याशीवाय?
"डिव्होर्स " साधा त्याबद्दल विचार करूनसुद्धा त्याच्या हृदयातून एक कळ जात होती.
तीच्या पासून कायमचं वेगळं व्हायचं.मन आतून खूप आक्रंदत होतं.कसा राहू शकेन मी तीच्याशीवाय?
खूप सवय झाली आहे तिच्या असण्याची.या सहा महीन्यात, तीने माहिती नाही पण मी तरी तीला मनापासून आपलं मानलं आहे.माझ्यासाठी ती माझी अर्धांगिनी, माझाच एक भाग आहे.
मी मोठ्या तोंडाने, मनावर दगड ठेऊन घटस्फोट घेऊ बोललो तीला पण ती जर तयार झाली तर???
तिचं उत्तर "हो "आलं तर???
माझं काय???
त्याचं "आपण घटस्फोट घेऊ "हे ऐकून ती जागीचं हडबडली.
काही क्षण तीला समजलचं नाही तो काय बोलला.
आणि समजलं तेव्हा,
नाही!!! घ...घटस्पोट??? मी जे होऊ नये म्हणून आजपर्यंत अशी वागत आले ,तेचं शेवटी माझ्या पुढ्यात येऊन ठाकले.
मी विक्रमांशूंना सोडून...नाही... नाही राहू शकत मी त्यांच्याशिवाय.
मी...मी प्रेम करते त्यांच्यावर.
आज तीला तीची चुप्पी तोडावीचं लागणार होती.त्यांच्या तुटण्याच्या मार्गावर आलेल्या नात्याचा प्रश्न होता शेवटी... तीने अविरतपणे वाहणारे आपले डोळे उलट्या हाताने पुसले.आणि एक एक पाऊल त्याच्या दिशेने टाकत ती विक्रमांशूशेजारी जाऊन ऊभी राहीली.
एक खोल श्वास घेत तीने बोलायला सुरुवात केली.
" डिग्रीच्या दुसर्या वर्षाला होते मी...
क्रमश:
©️ मनमंजिरी ?
पुढील भागात आपण भैरवीची बाजू जाणून घेऊ.भाग कसा वाटला नक्की सांगा.कमेंट्स करत जा वाचकवर्ग.लिहीण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
Keep reading....