देशपांडेची फॅमिली कधी गावी वगैरे गेल्यावर सगळं शांत असायच. शेजारी कुणीतरी या मांजरांना , कुत्र्याला खायला देत. ही मंडळी इतकी गुणी होती की त्याच्याच घरात नव्हे तर इतरांच्या घरात देखील कधी चोरून दूध पिणं वगैरे प्रकार त्यांनी कधी केले नाहीत.
देशपांडेसाहेब गावावरून आले की पहिले आपल्या कुत्री मांजराशी बोलणं सुरु होई...बोलण सुरु झाले की मग सगळ्यांनाकळे की देशपांडे फॅमिली गावावरून आली.
तेव्हा चाळीत चार चाकी गाडी कुणाकडे ही नव्हती ना कुणाकडे मोबाईल पवार काकांनकडे मालवाहतूक एक लहान ट्रक होती. तिही काहीतरी भव्य दिव्य वाटायचं त्यावेळेस. देशपांडे दर सोमवारी दुपारी स्वाद्याय घेत असायचे आणि ठरल्या प्रमाणे महिन्याच्या एका रविवारी सेनेमा बघायला तर कधी समुद्र किनारी...
एक वेगळंच जिव्हाळ्याचं विश्व होतं ते. काळाच्या ओघात वाहून गेले होते ते सारे...मतलबी दुनिया आता नशिबी आली होती तिच्या. उरले सुरले बाकीची ज्येष्ठ मंडळी पैलतीरी नजर लावून बसली होती आता त्या जुन्या चाळीत.
********
शुभा आणि तिचे आईबाबा असं एक लहान कुटुंब एकदा कुठे गावी जात असतांना त्यांच्या बसचा अपघात झाला त्यात तिचे आईबाबा गेले. पण तिला साधं खरचटलं सुद्धा नाही. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी... काळ आला होता पण वेळ नव्हती आलेली. नंतर मग तिच्या काकांनीच तिचे पालणपोषण केले. ते एका कंपनीचे मालक होते, भव्य त्यांचे घर होते पण काकूच्या अंगी माणुसकी बिलकुल नव्हती. शुभाच्या बाबांनी त्यांची प्रॉपर्टी अगोदर आपल्या तिच्या नावी केली होती.
शुभा खूप प्रेमळ आणि समंजस मुलगी होती. स्वतःच्या हिमतीवर तिला काहीतरी करून दाखवायचे होते. पण आत्ता मात्र सार उलट झालं होत. बाबा गेले आणि डोक्यावरलं छत गेलं. काकांना दोन मुले होती राज आणि सुयोग दोघीही मोठी होती तिच्या पेक्षा. काकां ही थोड्या वर्षांनी देवाघरी गेले. दोघी भाऊ तिच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन होते म्हणून त्यांनी तिचे शिक्षण अपूर्ण सोडून तिचे लग्न लावून टाकले. तिची सर्व प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या नवी करून घेतली. लग्न करून मात्र शुभा त्या बंधनाच्या बेळीत अडकली.
तिला ज्या घरात दिले होते ते घर म्हणजे आलिशान बंगला होता. लग्नाच्या दिवशी बंगला फुलांनी आणि लाइटिंगने सजवलेला अगदी राजवड्यासारखा. बाहेरून इतका सुंदर आणि शांत दिसणारा तो बंगला मात्र बंगल्याच्या आत मध्ये खूप काही सुरू होत. बंगल्यात एक मोठा रूम होता पूर्ण रूम अस्वस्थ झाला होता. आरश्याच्या काचा फुटलेल्या होत्या. त्याचा राग बघवत नव्हता. शुभा एका कोपऱ्याला शांत डोळ्यात पाणी आणून उभी होती. त्याने परत एकदा तिच्या जवळ येऊन तिचा हात जोरात मुरगळला तशी ती वेदनेने कडवळली.
" आहsss मला त्रास होतो आहे प्लिज सोडा मला...!! मी तुमच्या पाया पडते."
"तोंड बंद आणि डोळ्याची नजर एकदम खाली ठेवायची समजलं ना की आणखी काही नवीन सांगावं लागेल..!" असं तो बोलला.
कथा क्रमशः पुढील भागात.