आयुष्याच्या या वळणावर - भाग 22
(माझ्या स्टोरी ला प्रेम बद्दल खूप खूप धन्यवाद... माझ्या काही पर्सनल कारणामुळे मी काही दिवस स्टोरी लिहू शकत नव्हते त्यासाठी मी तुमची माफी मागते. आपली पुढील स्टोरीत न चुकता सुरू राहील.)
अखेर तो दिवस उजाडला. दुपारी 3 नंन्तर चा मुहूर्त ठरला होता. त्या दिवशी सकाळीच सगळे जण लवकर उठले. सगळे जण आपआपली काम चोख पणे पार पाडत होते.
मधूला रिंग आवडली नाही ही गोष्ट त्याच्या मनाला फारच लागली होती. काय कराव त्याला कळतं नव्हतं. कारण ती रिंग आईला पसंत आहे म्हणून ती हो बोली.
त्याला मधुशी बोलायचं होत. सकाळी लवकर नाष्टा झाला होता. आशुतोष ने मधूला भेटीयाल ये म्हणून निरोप दिला होता. त्याला मधुशी बोलायचं होत. तिच्या आयुष्यातिला हा खूप मोठा क्षण होता आणि तिची रिंग तिच्या पसंतीची नव्हती. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली होती.
मधू तिकडून भेटायला निघणार तोच मीना मावशी आली.
मीना : अग मधू इथे काय करतेस... चल पार्लरचे लोक आले आहेत. तुलाच शोधतेय आम्ही केव्हा पासून... चल पटकन...
मधू : अग हो मावशी आलेच.... 5 मिनिट मधें..
मीना : ते काही सांगू नकोस तू चल आधी...
मीना मधूला घेऊन गेली. आशुतोष हे सगळ लांबून बघतच होता.
आशुतोष चा चेहरा बगत बगत मधू तिकडून गेली
तिलाही वाईट वाटलं होते.
आशुतोष तिकडून निघून गेला. त्यालाही बाकीच आवरायचं होत.
जसं जसं टाईम जवळ आल होत... तेव्हा तरं बाहेरचे लोक पण यायला लागले. आता तर मधूला भेटायचा काही चान्सच नव्हता.
सगळे पाहुणे वगैरे आले होतेच. मधू आणि आशुतोष सुद्धा स्टेज वर आले.
साखरपुड्यचे विधीला पण सुरुवात झाली. आता त्याला बोलन तर शक्यच नव्हतं. पण मधुच्या चेहऱ्यावर या गोष्टीची कसलीच झलक नव्हती.
याचंच त्याला आश्चर्य वाटतं होत.
साखरपुड्यचे विधी झाले. आता दोघेही एकमेकांना अंगठी घालणार होते.
मधुने त्याला अंगठी घातली.
आता आशुतोषची वेळ होती. त्यानं तिच्याकडे बघितल. मधूला कुठेतरी जाणवलं कि आशुतोष ला गिल्टी वाटत आहे.
तिने त्याच्याकडे बगुन डोळयांनीच इशारा केला आणि सुंदर स्माईल दिली आणि नजरेनेच होकार दिला. आशुतोष ला थोड बर वाटलं. त्याने तील अंगठी घातली.
बाहेरचे सगळे पाहुणे आले. दोघांना विश करुन गेले. आता बऱयापैकी घरचेच लोक राहिले होते.
आजच्या दिवशी तिकडेच राहून दुसऱ्या दिवशी सगळे निघणार होते.
सगळे पाहुणे गेल्यानन्तर घरचे सगळे एकत्रित आले. सगळ्यनी मिळून जेवण केले.
आजच्या कार्यक्रमामुळे सगळेच खूप दमले होते. सगळे जण आपआपल्या रूम मधें गेले. दोघेही फ्रेश झाले. आशुतोष ने मधूला फोन केला.
आशुतोष : हॅलो मधू.... आवरलं का तुझं
मधू : होत आतच झाला.... बोल ना काही अर्जेन्ट काम आहे का.... असा लगेच फोन केलंस म्हणून म्हणलं.
आशुतोष : होत तस अर्जेन्ट च आहे.... 10 मिनिट नंतर मला लॉन मधें भेट....
मधू: अरे पण नेमक काय...
आशुतोष : सांगेन नंन्तर... 10 मिनिटात लॉन वर ये... बाय....
बोलून त्याने फोन कट केला....
इकडे मधू खूप विचारात पडली. नेमक काय बोलायचं असेल त्याला... आवाजही तसंच वाटलं. नक्की काय झाला.....
मधूने पटकन आवरून जयाची तयारी केली.
बघुयात काय घडलंय... पुढच्या भागात