वैखरी एक प्रेमकथा भाग-१४

A Lovestory Of A Girl

वैखरी एक प्रेमकथा भाग-१४
विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .



पूर्वांध : आपण भाग -१३ मध्ये बघीतलय की, वैखरी वसंत आतूचा मुलगा आहे की नाही हे कसे कळेल ? या विचारात असते . वसंत आतूचा मुलगा असावा असे बरेच परिस्थितीजन्य पुरावे तिला सांगतात पण तो अंदाज खरा की नाही ह्या विचारात ती वसंतचे स्वप्न बघते . कॉलेजमध्येही तिचं बेचैन मन लागत नाही पण सेमीस्टर तोंडावर असतं त्यामुळं स्वराकडून तातडीने नोट्स घेवून येते…

आता पुढे भाग - १४

आई : "आलीस बाळा ? "

वैखरी : "हो आई का गं अशी विचारतेस ?

आई : अगं फ्रेश हो . काही खावून घे . बाबांना तुझ्याशी काही बोलायचयं ".

वैखरी : "बाबांना ? अन् माझ्याशी, तेही महत्त्वाचं ?".
आई : " हो . ये, थोड्या वेळानी हॉलमध्ये ."
वैखरी : "हो .आई पण काय गं एवढं
महत्वाचं . माझं काही चुकलं का गं ? बाबा रागात तर नाहीत ना ? ".
आई : "नाही गं . छान खूश दिसत आहेत तुझे बाबा . आमचं शहाणं बाळ तू. आजवर तुझा काही त्रास झाला का कुणाला ?. एवढं समजदार बाळ कसं चुकेल ? ".

"हुश्श ! आता कुठं जीव भांड्यात पडला माझा .
तरी तर म्हटलं वसंत बाबत मी कुणाकडेच बोलले नाही . तर बाबांना कसं कळालं ? "चोराच्या मनात चांदणं " म्हणतात ते खरंच
आहे …. ," वैखरी मनाशीच पुटपुटली .

बाबा : "बस वैखरी . कसा सुरु आहे अभ्यास ".
वैखरी : "बाबा छान सुरु आहे."
बाबा : "तो तर छानच असणार कॉलेज टॉपर  आहे आमची मुलगी . आमचा अभिमान आहेस बेटा तू ".
आई : "अहो, वैखरीशी तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं होतं ना ?".
बाबा : " हो तेही बोलणारच . कामाच्या व्यस्ततेमुळे आम्ही आमच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीशीही दररोज मनमोकळ्या गप्पा मारू शकत नाही . आज वेळ मिळाला तर बोलू दया थोडं . "
वैखरी : "तसं नाही बाबा . तुम्हाला बिजिनेस मध्ये चांगला हेल्पिंग हॅड असता तर वेळ मिळाला

असता .तुम्ही पण एकटेच सांभाळता ना बिजिनेस . कसं शक्य आहे घरी वेळ देणं . जो वेळ देता तो क्वालीटी टाईम असतो यातच आम्हाला आनंद आहे . माझं सेमीस्टर संपलं की मी तुमच्या सोबतीला बिजिनेस जॉईन करते . तुम्हाला थोडा आराम

मिळेल . चालेल ना बाबा ? ".
बाबा : "चालेल . का नाही . पण तुला तुझ्याही घरचा बिझिनेस सांभाळवा लागेल ना ." .


वैखरी : "असं काय बोलताय बाबा ? हेच माझं घर आणि आपला बिझिनेस माझा बिझिनेस ."


बाबा : " हो बाळा . हे घर आणि बिजिनेस तुझेच आहेत . मुली भाग्यवान असतात मुलींना
दोन -दोन घरं असतात . एक सासरचं आणि एक माहेरचं अशी दोन घरे".
वैखरी : "आई बघ गं बाबा कसे बोलतात ."
आई : " अगदी बरोबर बोललेत तुझे बाबा ."
वैखरी : "आई तू पण…. ?"
आई : "हो बाळ . जगाची रीतचं ती. लाडाकोडात आईबाबांकडे लेक लहानाची मोठी करायची . समजदार झाली की तिनी सासरची जबाबदारी सांभाळायची ."
वैखरी : "वाईटच आहे ही रीत ".
बाबा : असं बोलून कसं चालेल बेटा . बघ पाटील काकांची खूप इच्छा आहे गं . मला सतत

म्हणतात ,"तुमची वैखरी खूप समजदार आणि हुशार मुलगी आहे . तुमची हरकत नसेल तर आम्हाला सुन म्हणून हवी . आम्हाला मुलगी नाही तिच आमची सून अन् तिच आमची . मुलगी ."
आई : "आशय बाबत बोलताय का तुम्ही ? " .
बाबा : हो .आशय, पाटील साहेबांचा एकुलता एक मुलगा . खूप हुशार आहे. कुठलही व्यसन नाही . संपत्तीचा गर्व नाही . असा मुलगा मिळणे कठीणच . शांत आणि सयंमी मुलगा आहे आशय . पाटील साहेबांचा बिजिनेस कमी वेळात उंचीवर नेवून ठेवलाय आशयनी . मुंबईतल्या मुंबईत राहिल आपली वैखरी . आपल्या डोळ्यासमोर . आठवण आली की जायचं भेटायला ."
आई : "काय गं वैखरी . तुझं काय मत आहे बोल न काहीतरी ." तू ओळखतेस ना आशयला ".
वैखरी : " हो . हो म्हणजे मी ओळखते आशयला . बाबांसोबत एकदा गेलेली आहे मी आशयच्या ऑफिसला ."
आई : " कसा वाटला ?"
वैखरी : " मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघीतले नाही . तसंही सध्या मला माझ्या परिक्षेचा अभ्यास महत्त्वाचा आहे . एक एक दिवस महत्त्वाचा आहे

अभ्यासासाठी ."


"आता बघशील ", आतू हसून म्हणाली .

बाबा :" वैखरी बेटा तुझी डीग्री पूर्ण झाल्यावरच आपण लग्नाची बोलणी करू . काही घाई नाही . तू तुझा अभ्यास मनलावून करं . या सन्डेला सहज भेटायला येणार आहे पाटील फॅमिली . तेवढं त्यांना छान हसून अटेंन्ड करशील . जास्तवेळ नाहीत थांबणार ते ."

वैखरी विचारमग्न झाली . मनात विचार करू लागली . हे तर फार मोठे संकट आहे
" आशय " नावाचं . कसं हाकलून लावायचं या संकटाला ?
वैखरी विचारात असतांना आतू वैखरीला आवाज देते….
आतू : " वैखरी, चल मला तुझ्यासोबत काम आहे . दादा येवू का आम्ही ?".
बाबा : हो, हो मलासुद्धा एक मिटींग आहे.
मी सुद्धा निघतो . आज रात्रीच्या जेवणाला वाट बघू नका . डिनर बाहेरच होईल माझं .

आई : "अहो . रविवार म्हणजे परवाच . किती लोक येणार थोड़ी पूर्वसूचना द्याल बरं का ?"

आतू : "काय गं वैखरी काय विचार करतेस ? दादानी लग्नाची गोष्ट काढली अन् तुझा चेहराच पडला . "

वैखरी : "पडणार नाही तर काय ? लाडानी आईवडिल लहानाचे मोठे करतात मुलींना आणि अचानक कळतं की ज्या घराला एवढा जीव लावला जिथे आयुष्यातील बावीस-तेवीस वर्षाच्या विविध आठवणी पेरल्या गेल्यात ते घर आपलं नाही . रुजलेल्या रोपट्याला उपटून दुसऱ्या मातीत रुजवण्याची ही रीत मनाला पटण्यासारखी नाही . एवढं सोपं असतं का गं . एका मातीतून दुसऱ्या मातीत रुजणं तेही अपरिचित घर . त्यांचा स्वभाव, सवयी माहित नाही अशा व्यक्तींसोबत राहणं ."

आई :" चांगलीच चर्चा रंगलीय आतू भाचीत ."
वैखरी : "आई तू ? अगं समजावणं तू बाबांना नाहीतर माझं लग्न लावून टाकतील ते ".
आई : का ? तुझे बाबा जे करतील ते तुझ्या भल्यासाठीच करतील हे लक्षात असू दे वैखरी .
लग्न आज ना उद्या करावचं लागणार . तुझी डिग्री होईपर्यत थांबणार आहेत. आणखी काय समजावायचं बाबांना . तुझ्या बाबांनी योग्यच विचार केला . मुलगाही अतिउत्तम शोधला . आणखी काय हवं . वैखरी एक गोष्ट तू समजून घे.विवाहसंस्था ही कुटुंब संस्थेचा पाया आहे . आणि कुटुंबसंस्था समाजाचा पाया . समाज मिळून देश बनतो म्हणजेच काय राष्ट्राची बांधणी कुटुंबातून होत असते . कुटुंबसंस्था विविध सामाजिक संस्थास्तरावर काम करत असते .
सामाजीकरणाचे कुटुंबसंस्था ही केंद्रबिंदू आहे . देशाचा सुजाण, संस्कारी नागरीक कुंटुंब संस्थेत

घडतो . विवाहसंस्थेवर समाजाची संरचना अवलंबून आहे. आदर्श विवाहसंस्थेमुळे आज आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. विवाह म्हणजे काही चूकीची बाब नाही . योग्य वेळ साधूनच बाबा तुझा विवाह करण्याचं ठरवत आहेत त्यामुळे बाबांना समजावून सांगण्या सारखं काही नाही वैखरी ."
आई वैखरीला विवाहसंस्थेचं महत्त्व सांगून किचनमध्ये निघून जाते….


वैखरी : आतू लग्न करणं जरूरीच आहे का गं ?
एखादयानी नाही केल तर ? एखाद्या व्यक्तीची इच्छा नसेल तर जबरदस्तीनी मर्जीविरुद्ध लग्न लावून द्यायचं का?

आतू : " हो लग्न करणे जरूरी आहे .आताच वहिनी सांगून गेल्या पटलं मला . राहिला इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रश्न ते चुक आहे . तुझं लग्न तुला विचारून लावण्यात येत आहे. मर्जीविरुद्ध नाही ."

वैखरी : "मर्जीविरुध्द होतेय माझं लग्न . माझी मर्जी नाही ." तू तर नाही केलं लग्न . तशी राहील ना मी"

आतू : "काहीतरी काय बडबडतेस ? माझं लग्न

झालयं . मी केवळ समाजाच्या नजरेत बिनालग्नाची आहे हे तुलाही चांगलं ठावूक आहे."


वैखरी : "तुझ्या आवडीचा व्यक्ती तुला सोडून गेला त्यानंतर तू लग्न केलसं का?"

आतू : अगं वारंवार तु तुझ्या लग्नाची गोष्ट माझ्या पर्यंत आणून का थांबतेस . माझी व तुझी कथा निराळी . माझ्या मनात आधीच कुणीतरी होतं… मनात जागा रिकामी नसतांना मी लग्न कसे करणार होते . ज्याच्याशी लग्न केलं असतं त्याच्यावर अन्याय नसता का झाला . माझं हिंदू विवाह विधीनुसार लग्न झालेलं होतं प्रेमनी धोका दिला त्यात माझा काय दोष ?".

वैखरी : नाही, आतू तुझा काहीच दोष आहे असं म्हणायचं नाही मला. मनात जागा नसेल दुसऱ्या कुणासाठी तर कसं लग्न करायचं खरंच तो स्वतःवर व ज्याच्याशी लग्न करणार त्याच्यावर अन्यायच करणे आहे. म्हणून मी लग्न न करायचा निर्णय घेतलाय".

एवढं बोलून वैखरी तिथून निघून जाते आतूला वैखरीच्या वाक्यांनी धक्काच बसतो ती विचारमग्न होते . पुन्हा तोच इतिहास घरात रिपीट होणार का ? हा प्रश्न तिच्यामनात गुंजी घालतो….

कमशः

वैखरीच्या जीवनात पुढे काय होईल ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग-१५

कथानक आवडले तर लाईक कमेंन्ट नक्की
करा . न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !

©® ऍड .निता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .





🎭 Series Post

View all