नात्यात, मैत्रीत किंवा समाजात आपण कोणाला तरी मदत करत असतो आणि आपल्यालाही इतरांची कधीतरी मदत घ्यावीच लागते.
म्हणजेच आपल्यावरही इतरांचे उपकार होत असतात आणि आपणही कोणावर तरी उपकार करतच असतो.
म्हणजेच आपल्यावरही इतरांचे उपकार होत असतात आणि आपणही कोणावर तरी उपकार करतच असतो.
आपल्यावर ज्यांनी उपकार केले आहे, त्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्याशी वागत असतो.
पण आपण ज्यांना मदत केली, उपकार केले..त्यांना त्या गोष्टीची सारखी जाणीव करून दिली तर.. त्या व्यक्तीला कमीपणा वाटतो.
वाईट वाटते ना!
वाईट वाटते ना!
आयुष्यात कधी ना कधी उपकाराची परतफेड करण्याची वेळ येतेच ना!
ताईंच्या बाबतीत आमचे असे झालेच ना...
ताईंनी विनयला त्यांच्या दुकानात काम करण्यास सांगितले. हे खरेच चांगले झाले. पण विनयने
प्रामाणिकपणे काम केले व खूप मेहनत घेतली. त्यामुळे ताईंचाही खूप फायदा होत गेला ना!
त्यांनी अजून एक मोठे दुकान सुरू केले आणि मोठे घरही घेतले.
प्रामाणिकपणे काम केले व खूप मेहनत घेतली. त्यामुळे ताईंचाही खूप फायदा होत गेला ना!
त्यांनी अजून एक मोठे दुकान सुरू केले आणि मोठे घरही घेतले.
एकदा ताईंच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना आरामाची गरज होती, तेव्हा विनयने दुकान सांभाळले. ताईला आमच्यामुळे खूप आधार मिळाला.
असेच एकदा,
ताई आजारी पडल्या. हाॅस्पीटलमध्ये ॲडमिट होत्या. तेव्हा मी ताईंची सेवा करत होते.
ताई आजारी पडल्या. हाॅस्पीटलमध्ये ॲडमिट होत्या. तेव्हा मी ताईंची सेवा करत होते.
आम्ही हे सर्व जे केले ती उपकाराची परतफेड म्हणून नाही. तर... अडीअडचणीला मदत करणे. हे आपले कर्तव्यच आहे. म्हणून सर्व केले.
मदत, कर्तव्य या गोष्टींना उपकार म्हटले की, मग मनात कुठेतरी अपेक्षांची भावना राहते.
ताई आमच्याकडून तशाच अपेक्षा ठेवून असतात. त्यामुळे मला हे पटत नाही.
आम्हांलाही आमचे एक वेगळे आयुष्य आहे ना? स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे ना? नेहमी त्यांच्या म्हणण्यानुसार का वागायचे? आयुष्यभर असेच उपकाराच्या ओझ्याखाली दबून जीवन जगायचे का?
मी माझ्या इच्छा, माझ्या माहेरची नाती व माहेरकडे होणारे कार्यक्रम यांना महत्त्व द्यायचे नाही का? एक स्त्री म्हणून ताईंना माझे दुःख का समजू नये?
जशी त्यांना माहेरची ओढ असते, तशी मलाही आहेच ना?
मी माहेरी जायचे म्हटले की, ताईंचे काही ना काही काम निघतच असते. आणि कधी गेलीच माहेरी तर लगेच बोलावून घेतात.
जशी त्यांना माहेरची ओढ असते, तशी मलाही आहेच ना?
मी माहेरी जायचे म्हटले की, ताईंचे काही ना काही काम निघतच असते. आणि कधी गेलीच माहेरी तर लगेच बोलावून घेतात.
विनयला मी अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
'आपण ताईंचे उपकार कधीच विसरणार नाही. उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवू;पण काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे तरी करू? आपले आयुष्य आपल्यासाठी जगू.'
'आपण ताईंचे उपकार कधीच विसरणार नाही. उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवू;पण काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे तरी करू? आपले आयुष्य आपल्यासाठी जगू.'
भूतकाळातील विचारात गढून गेलेली वृषाली, मोबाईलच्या आवाजाने भानावर आली. जाऊबाईंचा फोन आलेला होता. नेहमीप्रमाणे दोघींनी गप्पांचा आनंद घेतला.
माहेरी लग्नाला जाण्यावरून वृषाली विनयशी बोलली व त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर, दोघेही काहीच बोलले नव्हते. घरात शांतता होती.
दुसर्या दिवशी, रात्री जेवणाच्या वेळी,
विनय स्वतःहून वृषालीला म्हणाला,
"दादाचा फोन आला होता, दादाने सांगितले की, 'ताईच्या सासर्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम गावाकडेच आहे. आई व आम्ही दोघे जातो. तुम्ही दोघं वृषालीच्या बहिणीच्या लग्नाला जा. म्हणजे दोन्हीकडे हजेरी लागेल. कोणाला रागही येणार नाही.'
आता दादाने सांगितले तसे ऐकावेच लागेल."
विनय जे म्हणाला, ते ऐकून वृषालीला खूप आनंद झाला. मनातून तिने जाऊबाईंचे आभार मानले. 'जाऊबाईंनी दादांना छान पटवून दिले व त्याचाच हा छान परिणाम झालेला दिसला.
जाऊबाईंनी मला केलेली ही मदत मी लक्षात ठेवी.'
जाऊबाईंनी मला केलेली ही मदत मी लक्षात ठेवी.'
असा विचार करत वृषाली आनंदाने लग्नाला जाण्याच्या तयारीला लागली.
समाप्त
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा