उध्वस्थ भाग-३

आत्ममुग्धता या एकाच कारणावर नात्यांतला दुभंग सांवरता यावा का ..?


रात्रभर पावसानं कहर केलाय..
उद्वेगाचे कितीतरी कढ रिचवून झालेत.. सत्य आणि आभास यांच्या हिंदोळ्यावर झोका घेणारं मन आत्ता शांत झालंय..
कोसळणारा भावनांचा प्रपात ,ती विद्धता सहज झालीय..
डोळ्यांतून वहाणारे अश्रू ही रुसलेत माझ्यावर की मी ईतकी कोरडी झालेय..? भावनातिरेकाचं दुःख ही वाटेनासं झालंय.. मथ्थड पणा आलाय का विचार करण्याची क्षमताच नाहीशी झालीय..
सध्या काहीच नकोसं वाटतंय कुणाशी काहीही बोलायची ईच्छाच राहीली नाहीये.. रमाकाकू ला काय उत्तर देणार आहे मी..?
आईची मैत्रीणच पण तीला माहीती आहे मिहीर असा वागतोय ते की सगळेच घरचे अनभिज्ञ आहेत..? शिक्षणा निमित्य आणि नंतर बिजनेस साठी सारखा घरा बाहेरच असणारा मिहीर.. या एक दोन वर्षातलीच ओळख...
सहज भेटायला म्हणून रमा काकूला गेलेले ..तीथेच पाहीलेलं मिहीरनं आणि प्रेमांतच पडला. आधी काही वाटलंच नाही फारसं त्याच्या बद्दल ..फारशी ओळख ही नव्हती.. पण नंतर माझ्यातलं गुंतणं त्याचं मोहवून गेलं.. सतत मागे मागे फिरणं ..एका अलवार नात्यांची गुंफण सहज होत गेली..
त्या वेळी त्याचं पझेसिव्ह असणं कधीच खटकलं नाही .. पण नंतर कुठेतरी काहीतरी चुकतंय याची जाणीव व्हायला लागली.. सततच्या चौकशा ,कुठे जाती आहेस ..? कुणा बरोबर आहेस..? आज बाहेरच का गेलीस ..?
फोन वर बोलणं कमी वादच व्हायला लागले.. ते ही सहन केलं पण नंतर काहीतरी बिनसत चाललंय याचं ,संशय पिश्शाच्यानं ताबा घेतलाय याचा असा दाट संशय यायला लागला.. एरवी चार चौघांत सभ्यपणे वागणारा मिहीर
पुरता बदलला.. टोमणे मारणं , अगदी शुल्लक गोष्टींवरून वाद घालणं ह्या वरच थांबलं नाही हे.. तर मित्रांशी बोलायचंच नाही.. ,ड्रेस कोणता घालायचा ,कोणत्या रंगाचा.. टिकली कोणत्या रंगाची लावायची लावायची की नाही ते ही हाच सांगणार.. कोणत्या नातेवाईकांशी बोलायचं तेही किती वेळ हे ही हाच ठरवणार घड्याळात पाहून हे यानंच ठरवायचं...
साडी नेसली तरी पिनअपच हवी एकेरी पदर नको . भलत्यांच अटी माझं स्वतःचं मतच नाही कशांत..
हे असह्य व्हायला लागलं.. तू "अग्नीसाक्षीतला" नाना आहेस का असं का वागतो आहेस हे फक्त विचारलं तर भडकलाच..
कसले पिक्चर पहातेस..?
"असलं काही वागतोय का मी..?"
तुझ्या काळजीनं रात्र रात्र झोप येत नाही..
सगळंच अनिश्चित भविष्य ..कसे दिवस काढायचे याच्या बरोबर ..?
मागे ही याच्या मित्राच्या पार्टीत ही असंच याला आवरतांना घाम फुटला सगळ्यांना..
मी ड्रिंक्स घेत नाही म्हणाले .साँफ्ट ड्रिंक कोणतंही चालेल कींवा ज्यूस ..मित्रानं आग्रह केला "घ्या हो वहीनी . काय होतंय ..?आपलीच आहेत सगळी .. घे ना वैदेही .. सब अपने ही है यार..हम सँभाल लेंगे..
ईतकंच म्हटलं माझा एकेरी उल्लेख आणि संतापलाच .."नाही म्हणती आहे ना ती ? समजत नाही एकदा सांगितलेलं.. आणि तू तू सांभाळणार..? स्वतःला आधी सांभाळ.. बायका दिसल्या की लागलाच मागे.."
बाप रे तमाशाच सुरु केला..
मित्रांनी आवरलं..
नक्की असा का वागतोय हा
काहीतरी कारण असावं नक्कीच.. पण कालचा प्रसंग हादरवणारा ..याचा विचार आता करायचाच नाहीये ठरवती आहे खरं पण रमाकाकू , आणि काका त्यांचा काय दोष यांत ..?
माझा निर्णय जरी ठाम असला तरीही सगळ्यांचा विचार ही केला पाहिजे...बोलावं का एकदा सगळ्यांशी स्पष्ट..? थोडा वेळ अजून मागून घ्यावा का..?
काही सुचेना झालंय..डोक्यांत विचारांचं थैमान उठलंय.."
वैदेही डोकं गच्च धरुन बसली.. सरीता वहिनी चहा घेऊन आली.. " जरा बोलुया का राणी..? मोकळेपणानं बोलु या का..? "
वहिनीनं मायेनं हात डोक्यावरनं फीरवला हलकसं चुंबन घेतलं वैदेहीच्या कपाळाचं .. डोळ्यांत बघत तीनं हातानंच अश्रू पुसले वैदेहीचे..आणि वैदेहीचा बांध फुटला...
क्रमशः ©लीना राजीव..

🎭 Series Post

View all