तुम देना साथ मेरा--भाग 19
( मागील भागात--
आभा सुंदर तयार होऊन त्याची वाट बघत होती.
मोरपंखी साडी, त्याला आवडतात म्हणून मोरपंखी खड्यांची छोटीसी पिन लावून बाकी केस मोकळे सोडलेले.
गळ्यात नाजूक गुलाबी-जांभळा नेकलेस, मॅचिंग बांगड्या, कानातले आणि कपाळावर छोटीशी चंद्रकोर.
आणि या सगळ्यांवर मात करणारा सोज्ज्वळ चेहरा, निरागस डोळे, चेहऱ्यावर लाजेची लाली, स्वर्गीय सौंदर्य!
आभा सुंदर तयार होऊन त्याची वाट बघत होती.
मोरपंखी साडी, त्याला आवडतात म्हणून मोरपंखी खड्यांची छोटीसी पिन लावून बाकी केस मोकळे सोडलेले.
गळ्यात नाजूक गुलाबी-जांभळा नेकलेस, मॅचिंग बांगड्या, कानातले आणि कपाळावर छोटीशी चंद्रकोर.
आणि या सगळ्यांवर मात करणारा सोज्ज्वळ चेहरा, निरागस डोळे, चेहऱ्यावर लाजेची लाली, स्वर्गीय सौंदर्य!
खूप उत्साहाने राजची वाट बघत होती, आतुर झाली होती.
सकाळी जेवायला येणारा होता राज.
सकाळी जेवायला येणारा होता राज.
दुपार टळून गेली, रात्र झाली, सगळे वाट बघून थकले, त्याचा फोन सुद्धा बंद, आणि.....राज त्यादिवशी आलाच नाही.)
आता पुढे---
राज आला तर नाहीच पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट पण होत नव्हता.
आबासाहेब पण काळजीत पडले.
आभाला सुद्धा काळजी होतीच पण एक अनामिक हुरहूर तिच्या मनात दाटून आली होती.
भावनांचे खेळ तिच्या मनात पुन्हा सुरू झाले होते.
भावनांचे खेळ तिच्या मनात पुन्हा सुरू झाले होते.
"काय झाले असेल? का नाही आला हा? त्याची अडचण काय नेमकी उद्भवली? की...की माझ्यावर रागावला आहे?"
वाऱ्याच्या वेगाने पण दिशाहीन असं धावत होतं तिचं मन.
"नक्कीच, रागावलाय माझ्यावर. मी ऐकलं नाही ना त्याचं, चित्र काढ म्हणून मागे लागला होता माझ्या पण नाही काढायचं मला, मला नाही जमणार हे का नाही समजून घेत तो....आणि आता असा रागावून आणि रूसून बसलाय!," आभा मनातल्या मनातच बोलत होती.
असे भलते सलते विचार करून तेच खरे मानून ती दुखावली होती.
थोडा राग तिलाही आला होता राजचा.
थोडा राग तिलाही आला होता राजचा.
इतक्यात राज नेहमीच बिझी असायचा, फोन सुद्धा कमी झाले होते पण वेळ मिळाला की लगेच एखादा तरी मेसेज करायचाच.
पण आज दोन दिवस झालेत फोन नाही, मेसेज नाही.
आबासाहेब काळजीने मुंबईला गेले. पण तिथेही त्याचा पत्ता नव्हता.
कामाच्या ठिकाणी तो गेले दोन तीन दिवस झाले आलाच नाही असे कळले तर शेजारच्या काकू म्हणाल्या की तो तीन दिवस आधीच शिरपूर साठी निघाला होता, खुशीत होता अगदी.
कामाच्या ठिकाणी तो गेले दोन तीन दिवस झाले आलाच नाही असे कळले तर शेजारच्या काकू म्हणाल्या की तो तीन दिवस आधीच शिरपूर साठी निघाला होता, खुशीत होता अगदी.
"तीन दिवस आधी? पण तो तर दोन दिवस आधी येणार होता मग एक दिवस आधीच कसा निघाला? आणि गेला कुठे??"आबासाहेब विचारात पडले.
सतत प्रयत्न सुरू होते आभाचे, आबासाहेबांचे त्याला कॉन्टॅक्ट करण्याचे पण काहीही फायदा झाला नाही.
आभा पुन्हा उदास होऊ लागली होती.
नको त्या विचारांचं चक्रीवादळ मनात शिरत होतं आणि पुन्हा तिच्या डोळ्यांत नैराश्याची झाक डोकावत होती.
गैरसमज करून घेतला तिने आणि राजने मला धोका तर नाही ना दिला या विचारात कुढत होती ती.
"आभा उगाच काहीही विचार नको करुस. राजला ओळखतो मी चांगलं. फसवणाऱ्यातला नाही तो.आणि इकडे यायला निघाला होता तो हे पण शेजारच्या काकूंनी सांगितलं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी पोलिसांची मदत घ्यावी म्हणतोय,"आबासाहेब आभाला समजावत होते.
"नको पप्पा, पोलीस नको.माझ्या नशिबाने थट्टा चालवली आहे. अजून गुंता नको वाढायला."
"अगं, गुंता वाढवायला नाही सोडवायला म्हणतोय आम्ही. राजचा शोध नको का घ्यायला? आपल्याशिवाय त्याला आहे तरी कोण जवळचं असं? तूच सांग, तुला तरी चुपचाप बसून अलिप्त राहणं पटतंय का? तू त्याची सगळ्यांत जवळची व्यक्ती आहेस आणि तूच त्याला ओळखू शकली नाहीस? तो स्वतःहून नाहीसा नाही झालाय काहीतरी घडलंय नक्की असं मला वाटतंय. तुला काही बोलला होता का तो? आठव ना जरा. अशी एखादी गोष्ट किंवा घटना, जी आपल्याला मदत करू शकेल?"
आभा आठवायचा प्रयत्न करू लागली.
"तुझ्यासोबत तो सगळं शेअर करतच असेल ना. दुसरं होतं तरी कोण त्याला जवळचं असं....," आबासाहेब असं बोलत असतानाच आभा काहीतरी सुचल्यासारखं ताडकन उठली आणि धावतच निघाली.
तिच्याव्यतिरिक्त अजून एकच व्यक्ती होता जो राजच्या अगदी जवळचा होता,.... अंशु...त्याचा जिवलग मित्र.
आभा धावतच अंशुकडे पोचली. तो कुठेतरी बाहेर जायलाच निघाला होता.
"आभा, तू?"
"अंशु, राज कुठाय?"
"मला नाही माहीत," नजर चोरत अंशु म्हणाला.
"अंशु, खोटं बोलू नकोस प्लिज, सांग राज कुठाय? असा कसा बेपर्वा आहे तुझा मित्र. काही कळतं की नाही त्याला," आभा चिडून बोलत होती.
आभाचे रडून रडून सुजलेले डोळे,अस्ताव्यस्त भावना, चेहरा आणि नजर अंशुकडून बघवल्या जात नव्हते.
"आभा प्लिज शांत हो, भानावर ये. हो मला माहित आहे राज कुठे आहे पण तुला नाही सांगू शकणार. वचनात बांधून ठेवलं आहे त्याने मला, प्लिज माफ कर मला," अंशुने हात जोडले.
"कसलं वचन? आमच्या प्रेमापुढे मोठं असं काय आहे त्याच्यासाठी? तुला सांगावंच लागेल अंशु."
अंशु तरीही काहीच बोलत नाही हे बघून डोळे पुसत आभा म्हणाली, "ठीक आहे, तू त्याला वचन दिलं आहेस ना की तो कुठाय हे मला सांगणार नाहीस, नको मोडूस वचन. पण मी तुझ्या मागे तू जिथं जातोय तिथं नक्की येणार. मला अडवू शकत नाहीस तू आणि मला माहिती आहे तू आता राजकडेच निघाला आहेस, हो ना?"
"आभा प्लिज मला पेचात नको पकडूस, जा इथून प्लिज," इतकं बोलून अंशु निघाला. आभा सुद्धा त्याच्या मागोमाग निघाली.
क्रमशः
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा