ती काळोख अंधाराची रात्र रेशमा घरात एकटीच होती. राघव कंपनीच्या टूरवर काही दिवसांकरता नाईलाजस्तव गेला होता. रेशमावर पहिल्यांदाच एकटी राहण्याची वेळ आली होती.
प्रत्येक वेळी पाच तासांचा प्रवास करत माहेरी जाणे रेशमाला अवघड वाटत होते. तिने यावेळी एकटीने घरात राहण्याचा विचार केला.
नेमकी राघव घरी नव्हता. तरी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो असे विजयला सांगितले होते. दोघा मित्रांची खूप वर्षांनी भेट होणार होती.
असा विचार करताना रेशमाचा डोळा लागतो. दुसरा दिवस उजाडतो,विजय आणि त्याची फॅमिली घरी येणार होती. राघवला फोन करुन विचारताच तो अर्धा तासात घरी येणार होता. मनातली भिती काही केल्या जात नव्हती. आता जे होईल त्याला निर्भिडपणे सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
तसेही विजयची देखील फॅमिली आहे. तो ही भूतकाळ विसरला असणार. जरी तो समोर आला तरी मित्र-मैत्रिण असल्यासारखे नात पुढे नेवू शकतो असे रेशमाने मनोमन ठरवले.
आजूबाजूचा, बागेचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता रामूला आधीच सांगून सक्त ताकीद दिली होती.
राघव : झाली का तयारी सगळी. जेवणाचा काय बेत? काही गोड स्विटमार्ट मधून आणायचे का? विजय येईल इतक्यात.
रेशमा : काळजी नका करु. मी सगळी तयारी केली. पाहुणचार करायला आपण कुठे कमी पडणार नाही. टेन्शन नका घेवू
रेशमा : अहो, मी एक साडी आणली कालच थांबा दाखवते तुम्हांला. हे बघा.
राघव : छान आहे साडी. म्हणजे आता विजय करता आणि त्याच्या मुली करता ड्रेस घेवूया.
रेशमा : अरे वा. मुलगी पण आहे का त्यांना. तुम्ही बोलला नाही मला.
क्रमशः