राघव आणि विजय एकमेकांना कडकडून मिठी मारतात. इकडे रेशमा आपली साडी सावरत मागून येत असते. आवाज ओळखीचा वाटल्याने रेशमा एकदम आवजाच्या दिशेने पाहते. तो आवाज विजयचाच होता.
होय रेशमाचा भूतकाळ आता समोर उभा होता. रेशमा दोन मिनिट स्तब्ध झाली.
आपल्याला फसवून विजयने आणखी एका राणी नावाच्या बाईला त्रास दिला. आणि खोटी कहाणी ऐकवून राघवकडून खोटी सहानभूति मिळवत असल्याची रेशमची खात्री पटते.
रेशमा विजयला नव्याने ओळख देत भेटते. भूतकाळ काहीच आठवत नसल्याचे दाखवत असते. राघव मात्र रेशमाच्या स्वभावातला बदल न्याहळत असतो.
त्याला थोड वेगळ वाटते. पण तो फारस त्याकडे लक्ष न देता विजय च्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात.
रेशमा विचार करते जे आहे हे चांगले चालले उगाच स्वत:चा आणि विजयचा संसार का उध्वस्त करायचा. तसेही दहा वर्षांचा काळ लोटला आहे. विजय देखील त्याच्या आयुष्यात खूप पुढे आला आहे. त्याने तर., राणीशी देखील प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यांच नात इतक पुढे गेल की, मुलगी झाली. आणि आता नेहा.
विजय : काढली ना. कामच असे आहे आमचे. अर्जंट म्हटले की आहे तिथून निघाव लागते.
विजय : हो ग. आपल्या श्वेता आणि तुझी काळजी घ्या. काम झाल की न्यायला येतो तुम्हांला.
नेहा : सांभाळून जा.
विजय : हो ग. आपल्या श्वेता आणि तुझी काळजी घ्या. काम झाल की न्यायला येतो तुम्हांला.
ते सत्य काय आहे ते आपण पाहणार आहोत अंतिम भागात.
क्रमशः