Login

अज्ञात जागेचे प्रवासी. भाग - ३.

दोन वैमानिक ज्यांनी अनेक वेळा विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे पोहचविले. एक दिवस अचानक त्याच्या समोर एक अशा अज्ञात जगाच्या दुनियेत त्यांचा प्रवेश झाला तो ही अपघाताने ज्यात फक्त ते आणि त्यांचे सहकारी पोहचले. कोणती असेल ती दुनिया आणि कसे सुटतील त्यातून? यासाठी कथा नक्की वाचा.
सर्व जण अजून जास्त घाबरले. प्रत्येकाने आपल्या मोबाईल ची बॅटरी ऑन करायचा प्रयत्न केला पण मोबाईल पूर्णपणे बंद पडला होता काहीच ऑपरेट होत नव्हते. हा एक प्रकार पाहून काही गोंधाळले तर काही घाबरून गेले.
"प्राप्ती लवकर कॉकपिट मध्ये जा आणि बघ काय झाले आहे? मी तोवर इथे सर्व परिस्थिती सांभाळते."

तिची आत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती या गोंधळलेल्या आणि भितीच्या वातावरणात ही अभयचा स्वभाव हा सुधारणार नव्हता.

प्राप्ती कसेतरी सावरत, आधार घेत दिसत नसल्याने ती कॉकपिटच्या दिशेने निघाली. अभय आणि शार्दूल अजूनही विमानाला कंट्रोल करण्याचे निष्फळ प्रयत्न करत होते. तेवढ्यात कॉकपिट चा दरवाजा उघडला गेला.‌ तोल गेल्याने अचानक प्राप्ती विमानाच्या वरील यंत्रणेच्या भागावर तिचे डोके जोरात आपटले. तिच्या कपाळाला खोच पडली व त्यातून रक्त वाहू लागले.

कोणीतरी आपटल्याचा आवाज शार्दूल आणि अभयला ऐकू आला. अंधार असल्याने त्यांना दिसेना त्यात इर्मज्नसी असणारे लाईट ही काम करत नव्हते.

"प्राप्ती, गार्गी?" शार्दूल हाक मारत म्हणाला.

आपल्या कपाळावरील जख्म दाबत कण्हत ती म्हणाली, "मी प्राप्ती. काय झालं आहे नेमकं? विमानाच्या सर्व लाईट बंद, मोबाईल ही बंद पडले आहेत. सर्व प्रवासी पार घाबरले आहेत."

"मलाही माहित नाही प्राप्ती. आम्ही दोघांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण सर्व अयशस्वी, निष्फळ."

तिने तो आवाज ओळखला अभयचा. त्यांच्या स्वरातील निराशा तिला जाणवत होती.

कंट्रोल रूमला संपर्क साधायचे ठरवले होते पण सर्व मोबाईल
बंद पडलेत सर्व आणि इथली सर्व यंत्रणा एकाएकी बंद पडल्या आहेत. मघाशी अचानक पणे एक नाही दोनदा विमानाला जोरात झटका बसला आणि विमानाची गती कमी झाली आणि दुसरा झटका बसताच विमानाची गती वाढली. विमानाची मागची बाजू ही पलटली आणि आपण सरळ रेषेत खालच्या दिशेने जात आहोत.‌ विमानावरील नियंत्रण पूर्णपणे आपण गमावले आहे. सर्व यंत्रणा व्यवस्थित असूनही हे का आणि कसे घडतय मला काहीच कळेना.

सर्व काही शांतपणे ऐकत असलेली प्राप्ती अभयचे आपण विमानावरील नियंत्रण आपण गमावले हे ऐकताच ती प्रचंड घाबरली. तिच्या घशाला कोरड पडली. शरीराची थरथर वाढली.
ती जोराने ओरडली. तिला स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले होते.

"प्राप्ती शांत हो! ओरडू नकोस आधीच परिस्थिती अवघड झाली आहे.‌ ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असूनही आम्ही शांतपणे प्रयत्न करत आहोत आणि अशावेळी तु पॅनिक होऊन आमचा ही तणाव वाढवत आहेस" शार्दूल तिच्यावर खेकसला.

त्यांच्या ओरडण्याने ती जोरात दचकली. ती शांत झाली पण तिला मनातुन वाईट वाटले.

"शार्दूल तिच्यावर ओरडू नकोस ती घाबरली आहे. हा अनुभव सर्वांसाठी दिलासादायक नसतो. तिला शांतपणे ही समजावून सांगता आले असते तुला."

"सॉरी अभय, मला फार कर प्राप्ती" त्यांच्या बोलण्यात खजिलपणा जाणवत होता.

"इट्स ओके."

कॉकपिट चा दरवाजा उघडून बंद झाल्याचा आवाज दोघांनाही आला.

"मी उगाच चिडलो तिच्यावर."

"जिवंत वाचलो तर माफी मागायला विसरू नकोस."

"अशावेळी मस्करी नको रे. आधीच ही काय ब्याद मागे लागली आहे कळेना सगळं सुरळीत असताना. वातावरण ही व्यवस्थित...."

त्यांचे बोलणे मध्येच गुंठले. विमानाचा तीव्र संकटाचा अलार्म वाजू लागला. हा अलार्म कशाचा वाजतो आहे हे पाहण्यासाठी अभयने पाहिले तर... विमानाच्या खालच्या भागात आग लागली होती.

"शीट... जोरात हॅण्डल हात आदळत अभय म्हणाला."

"काय झाले?"

"विमान वेगाने अजून खाली जात आहे आणि हवेच्या घर्षणामुळे पेट घेतला आहे खालच्या भागात. आता आपल्याला लॅण्डिग साठी लिवर खाली नाही खेचता येणार. विमान लॅण्डिग करायची वेळ आली तर... ते घसरत जाईल अथवा मोठा स्फोट होऊन..."

हे ऐकून शार्दूल घाबरला.

"तु कंट्रोल रूमला संपर्क करायचा पुन्हा प्रयत्न करून पहा."

"नाही होणार शार्दूल. सगळ्या सिस्टीम आता पूर्णपणे बंद पडल्या आहेत."