अष्टपैलू लेखक महासंग्राम
पहिली फेरी - कथामालिका
©®प्रज्ञा पवन बो-हाडे
चार भावडांपैकी ज्योती ताई सगळ्यात मोठ्या.
ज्योती ताईंच्या बालपणातील हौस साहेबरावांनी कौतुकाने पूर्ण केली. आपल्या मुलांनी शिकून नाव कमवाव अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा.
वडिल सहकारी सोसायटीत काम करत असताना. ताई प्रगती पुस्तक घेवून सहि करण्याकरता वडिलांना सांगतले तसे वडिल सर्वांसमोर ओरडले. घरी आल्यावर आईला घडलेला प्रकार सांगताच अश्रू अनावर झाले होते. एकीकडे शिक्षकांचे ओरडणे तर दुसरीकडे वडिल अश्या द्विधा मन:स्थितीत मन कावरेबावरे झाले होते. या परीस्थितीतून बाहेर काढण्याचे कौशल्य आईला अचूक आत्मसात असावे. तशी आईने ताईंचा अभ्यास घ्यायला सुरवात केली. ताईंच्या आई जुनी अकरावी शिकलेल्या शाळा मास्तरांची मुलगी त्यामुळे शिक्षणाच महत्व साहजिकच होते. योगायोगच म्हणावा लागेल. शाळेत गणिताच्या मास्तरांची बदली झाली. साळवे सरांनी गणित या विषयाशी गट्टी कशी जमवायची याचे सूत्र आत्मसात करुन दिले. इंग्रजी विषयाचे चव्हाण सर, हिंदी विषयाच्या बैरागी मॅडम, यांनी शिक्षणा विषयी गोडी निर्माण केली.
जादूची कांडी फिरवावी तसे ताईंच्या पाचवीचा रिजल्ट लागला. ९० टक्के मार्क पाडून ताई उत्तीर्ण झाल्या.
आनंदाचे वारे घरात वाहू लागले. कोणालाच ताईंच्या रिजल्ट वर विश्वास बसत नव्हता. पहिल्या सत्रात इतके कमी मार्क आणि आता एकदम ९० टक्के. हि सर्व आई आणि शिक्षकांची कमाल. ताईची जवळची मैत्रिण मनिषाने पाचवी पासून दहावी पर्यंत एकाच बाकावर बसण्याची साथ दिली. सातवीत असताना ताईंना देशस्त रुग्वेद वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळाले. ताईला नृत्य, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची विशेष आवड.
साहेबरावांना स्थळाला नाही म्हणतात कुठेच कमतरता दिसत नव्हती. त्यांना हा अमृतयोग घडवून आणायचाच होता.
लग्नसोहळा दणक्यात पार पडला. सुखाच्या संसाराला सुरवात झाली. आकाश आणि दिशा ह्या दोन गोंडस मुलांचा जन्म झाला. दोन्ही मुल आई-वडिलांसारखी हुशार आणि संयमी निघाली. आईचा वारसा पुढे नेत ताईंनी मुलांचा जमेल तसा अभ्यास घेवून आपल राहिलेल अपूर्ण शिक्षण मुलांमार्फत पुरे केले. मुलगा इंजिनियर आहे. तर मुलगी आर्किटेक्ट शिकत आहे.
ताईचे आयुष्य पुढे कोणत्या प्रकारे वळण घेणार आहे. ते आपण पाहूया पुढिल भागात.
क्रमश: