आठ दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. शालिनी ची सासू..चुलत दिर आणि जावा पण आल्या होत्या कोर्टात.
"जज साहेब..या माणसाने त्याच्या सख्ख्या..चार वर्षाच्या पुतणीवर अत्यंत निर्दयीपणे अतिप्रसंग करून तिला जीवे मारण्याचा अक्षम्य असा गुन्हा केला आहे. जज साहेब याला गुन्हा म्हणायचा की पाप हे पण मला समजत नाहीये. कोर्टाला माझी कळकळीची विनंती आहे..या असल्या हैवानाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. नऊ महिने स्वतःच्या उदरात ठेवून..रक्ताच पाणी करून आईने मुलांना वाढवायचं आणि त्यांचा जीव असल्या नराधमांनी घ्यायचा हे कुठपर्यंत चालत राहणार आहे. त्या आईच्या काळजाला किती जखमा झाल्या असतील याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. मला माहित आहे मी कोर्टात आहे आणि खूप भावनिक होऊन बोलतोय पण जज साहेब असल्या माणसांना जो पर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत दुसरे नराधम जन्म घेतच राहतील. आपण याला योग्य ती शिक्षा देऊन प्राजक्ताला न्याय मिळवून द्याल अशी आशा बाळगतो. दॅट्स ऑल!" ऍडव्होकेट.नलिन खैरे
"सर..मला काही बोलायचं आहे." शालिनी
"तुम्हाला जे बोलायचं आहे ते इकडे येऊन बोला."जज साहेब
"तुम्हाला जे बोलायचं आहे ते इकडे येऊन बोला."जज साहेब
"सर..आम्ही बायकांनी आणि मुलींनी नक्की काय करायचं.. कस वागायचं किंवा कसे कपडे घालायचे? म्हणजे असल्या पुरुषांची नजर आमच्यावर पडणार नाही. बस मधे जा..भाजी मार्केट मधे जा.. देवळात लाईन मधे उभ रहा कुठेही जा यांच्या वाईट नजरा आमच्यावर कधी पर्यंत रोखून असणार. अंगभर साडीवर पण हे हात टाकतात आणि छोट्या कपड्यांमध्ये बागडणाऱ्या निरागस मुलींवर पण हे हात टाकणार. साठ वर्षाची बाई दिसत नाही की चार वर्षाची पोर दिसत नाही. घरात पण आम्ही सुरक्षित नाही मग आम्ही सुरक्षित कुठे राहू शकतो अस एखाद ठिकाण सुचवाव..निराधार बायकांना पण हल्ली निराधार केंद्रामध्ये गलिच्छ वागणूक दिली जाते. तिकडेही तिच्या इभ्रतिवर हात टाकला जातो. यांच्या मनाप्रमाणे नाही वागल तर हे अंगावर ऍसिड फेकणार नाहीतर तोंडावर. कधी छातीवर हात..कधी पाठीवर हात..शी....शिसारी येते अंगावर. किळस वाटते अश्या लोकांची.
जज साहेब मला न्याय फक्त माझ्या मुलीसाठी नकोय. त्या सगळ्या मुलींसाठी हवाय ज्यांना त्यांचं स्वतःच जग निर्माण करायचं आहे पण असले नराधम त्यांना तिचं जग निर्माण करूच देत नाही आहेत." शालिनीला अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते.
जज साहेब मला न्याय फक्त माझ्या मुलीसाठी नकोय. त्या सगळ्या मुलींसाठी हवाय ज्यांना त्यांचं स्वतःच जग निर्माण करायचं आहे पण असले नराधम त्यांना तिचं जग निर्माण करूच देत नाही आहेत." शालिनीला अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते.
मंदारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. घरातल्या इतर लोकांची हाय घेऊन ती मात्र नव्याने तीच जग निर्माण करायला पुढे सरसावते आणि तिला साथ मिळते ती तिच्या ऍडव्होकेट सरांची आणि नव्या आश्रमातील बायकांची....
समाप्त.....
@श्रावणी लोखंडे ©
समाप्त.....
@श्रावणी लोखंडे ©
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा