थोडंसं बालिश वाटेल..पण तुलना नाही नी तिरस्कार पण नाही हा कुणाचा.....
पण तरी मला प्रश्न पडलाच कि....
आपल वय वाढलं की आपल्याला काहीच त्रास नसतो का?? स्त्री असो की पुरुष......
लग्न झाली मुल झाली..जगाच्या भाषेत संसाराची गाडी सुरळीत चालली .आयुष्य स्थिरसावर झालं .....की माणसाला गरज नसते का मायेच्या स्पर्शाची,आपुलकीच्या चौकशीची ...कोणीतरी जवळ बसवून विचारायची ..की कस चालू आहे?मजेत आहेस ना?काही अडचण.....
आपल्याला वाटत ना आपल्याला ही कुणीतरी कधीतरी प्रेमाने कुशीत घ्यावं नी विचारावं ...आहेस ना तू बरी??