सिंह,“ आत्ताच्या आत्ता इथून निघायचे आणि या हरणाला विसरून जायचे!” तो रागाने म्हणाला.
त्या लांडग्याचा म्होरक्या आता बोलू लागला.
लांडगा,“तुम्ही आडवू शकत नाही आम्हाला आम्ही राजाच्या सांगण्यावरून शिकार करत आहोत!”तो कचरत दबक्या आवाजात घाबरून बोलत होता.
सिंह,“ तुम्हाला तुमचा जीव प्रिय असेल तर निघा नाही तर एका झडपेत तुमच्या सगळ्यांचा खात्मा करेन!” तो कडाडला आणि लांडगे घाबरून माघारी फिरले पण जाता जाता त्यांची नजर तिथेच उभे असलेल्या अगम्य आणि अभिज्ञावर पडली होती.
हरणाने कृतज्ञतेने सिंहाकडे एकदा पाहिले आणि ते महाराजांचा विजय असो असे म्हणून घनदाट जंगलात पुन्हा लुप्त झाले.अगम्य आणि अभिज्ञा शांतपणे ते पाहत होते.त्या सिंहाने दोघांना पाहिले आणि तो त्यांना म्हणाला.
सिंह,“माझ्या मागे चला लवकर त्या लांडग्यांनी तुम्हांला पाहिले आहे ते आता जाऊन त्या रिंगा सिंहाला सांगणार आणि तो त्या सैतान सुर्यकांतला सांगणार! त्यामुळे तुम्ही लवकर माझ्या बरोबर सुरक्षित ठिकाणी झाला!” तो काळजीने बोलत होता.
त्याच बोलणं ऐकून अभिज्ञा आणि अगम्य दोघे त्याच्या मागे चालू लागले. तो सिंह म्हणजेच त्या कथेतील रेंबो होता. जो या जंगलाचा राजा होता. रेंबो त्यांना एका टेकडीवरील गुहेत घेऊन गेला.
अगम्य,“ तू जंगला पासून इतक्या लांब का राहतोस?” त्याने विचारले.
रेंबो,“ कारण माझ्या जीवाला धोका आहे! तो रिंगा आता जंगलाचा नामधारी राजा आहे आणि सूर्यकांतच्या म्हणण्यानुसार वागतो. रिंगा आणि त्या लांडग्यांच्या समूहाने नुसता धुमाकूळ घातला आहे जंगलात! प्राणी,पक्षी स्वतंत्रपणे फिरू शकत नाहीत! सगळे एका भीतीच्या सावटाखाली आहेत! तो रिंगा आणि लांडगे फक्त मजेसाठी प्राण्यांचा जीव घेत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही. याची खंत वाटते मला पण सुर्यकांतचा काळ्या शक्ती समोर कोणाचाच निभाव लागत नाही. तो आमच्या पुस्तकात आला आणि आमचे सगळे जीवनच बदलून गेले!” तो दुःखी होऊन सांगत होता.
अभिज्ञा,“ पण तू आम्हाला कसा ओळखतोस?” तिने विचारले.
रेंबो,“ काही वर्षा पूर्वी सूर्यकांत जेंव्हा आमच्यावर राज्य करायला आला तेंव्हाच आकाशवाणी झाली होती की एका वेगळ्या जगातून दोन लोक येतील आणि तेच तुमची सुर्यकांतच्या जाचा पासून सुटका करतील! आणि तुम्ही आल्याची चहून आधीच सूर्यकांतमुळे मला झाली होती.” तो म्हणाला.
अगम्य,“ पण सूर्यकांत आता शांत नाही बसणार तो काही ना काही करणारच!” तो म्हणाला.
रेंबो,“हो पण आता पुढच्या कथेत तुम्हाला सुखरूप पाठवणे माझी जबाबदारी आहे तुम्ही चिंता करू नका! थोडा वेळ थांबा मी बाहेर एक फेरी मारून येतो आणि मला सुरक्षित वाटले की तुम्हाला पुढच्या कथेत जाण्याचा मार्गा पर्यंत सोडून येतो.” तो म्हणाला आणि बाहेर गेला. तर बाहेर सगळी शांतता होती.
कदाचित अजून ही खबर रिंगा पर्यंत पोहोचली नव्हती. पण रिंगा निवांत झोपला होता आणि तेव्हढ्यात तिथे सुर्यकांत आला आणि त्याने रिंगाला लाथ घालून उठवलं. रिंग खडबडून रागातच जागा झाला. तो रागाने काही बोलणार तर समोर सुर्यकांतला पाहून तो हाडबडला आणि उठून उभा राहून बोलू लागला.
रिंगा,“ महामहिम महाराज आपण मला बोलवायचं ना तुम्ही कशाला तसदी घेतली?” तो लाळ घोटेपणा करत म्हणाला.
सुर्यकांत,“ इथं इतकं मोठं संकट आले असताना तुला झोपा काढायच्या सुचत आहेत!” तो चिडून म्हणाला
रिंगा,“ काय झालं महाराज?” त्याने विचारले तो पर्यंत लांडग्यांचा कळप धापाटाकत आला.त्यातील लांडग्यांचा म्होरक्या समोर येत म्हणाला.
“ राजे अहो राजे! ते दोन मानव आपल्या कथेत पोहोचले आहेत! आम्ही शिकारील गेलो होतो तेंव्हा त्या रेंबोने त्या दोघांना आमच्या पासून वाचवले आणि त्यांना कुठे तरी घेऊन गेला!”
सुर्यकांत,“ऐकलेस काय झालं ते? तो अगम्य आणि अभिज्ञा दोन कथा पार करून तुझ्या कथेत पोहोचले सुध्दा आणि तू इथं झोपा काढत आहेस!जा त्या तिघांना पकडा आणि माझ्या समोर हजर करा ते जर तिसऱ्या आणि चौथ्या कथेच्या मध्ये असणाऱ्या त्या कथेत पोहोचले आणि त्यांनी जर मी बंदी बनवलेल्या कुसुमारंगिनीच्या आत्म्याला सोडवले तर माझ्या अर्ध्या शक्ती कमी होतील याचा अर्थ कळतो का तुला रे ये रिंगा?निघा लवकर जा त्या रेंबोने त्यांना त्या कथेत पोहोचवायच्या आत त्यांना धरून आणा निघा!” तो रागाने ओरडला आणि रिंगा सहित सगळे जंगलाच्या दिशेने पळाले!
★★★
★★★
इकडे रेंबोने गुहेच्या बाहेर येऊन टेहळणी केली आणि आत जाऊन अभिज्ञा व अगम्यला म्हणाला.
रेंबो,“ बाहेर सगळी शांत आहे! अजून तरी कोणीच दिसत नाही तो पर्यंत तुम्ही चला मी तुम्हाला पुढच्या कथेच्या दारा पर्यंत सोडतो!” तो म्हणाला आणि अगम्य व अभिज्ञा त्याच्या मागे निघाले. तो त्यांना जंगलाच्या एकदम आत घेऊन जात होता.
तो पर्यंत रिंगा आणि त्याची लांडग्यांची गँग तिथे पोहोचली दुरूनच रेंबोने त्यांना येताना पाहिले आणि तो म्हणाला.
रेंबो,“ इथून काही पावलांच्या अंतरावर एक मोठे वडाचे झाड आहे त्या झाडाची सगळ्यात लहान परंबी ओढा म्हणजे झाडाच्या खालचा गुप्त दरवाजा उघडेल आणि तुम्ही त्या दारातून पुढच्या कथेत पोहोचाल!लवकर जा रिंगा आणि लांडगे येत आहेत! तुम्ही जाऊ पर्यंत मी त्यांना थोपवून ठेवतो!” तो म्हणाला.
अभिज्ञा,“ पण त्यांनी तुझ्यावर त्यांनी हल्ला केला तर?” तिने काळजीने विचारले.
रेंबो,“ मी पाहून घेईन त्यांना पण तुम्हाला इथून पुढच्या कथेत पोहोचणे गरजेचे आहे कारण तुम्ही पुढे गेला तरच या पुस्तकातील त्या सुर्यकांतचे राज्य संपुष्टात येईल आणि हे पुस्तक पुन्हा पूर्ववत होईल! मला काही होणार नाही तुम्ही चिंता नका करू माझी!” तो म्हणाला आणि अगम्य अभिज्ञाला ओढतच घेऊन गेला.
अभिज्ञा आणि अगम्य दोघे ही त्या वडा जवळ पोहोचले. तो पर्यंत रेंबोने रिंगा आणि लांडग्यांना थोपवून ठेवले! अगम्यने वडाच्या झाडाचे निरीक्षण केले आणि त्याने लहान परंबी पाहून ओढली पण काहीच झाले नाही त्याने पुन्हा सगळ्या पारंब्या पहिल्या आणि सगळ्यात लहान पारंबी शोधून ती ओढली आणि मोठ्या आवाजा बरोबर त्या वडाच्या झाडा खाली असलेला गुप्त दरवाजा उघडला आणि दोघे त्या दारातून भुयारी मार्गाने पुढच्या कथेत जाऊ लागले आणि तो दरवाजा काही मिनिटांनी आपोआप बंद मोठा आवाज करून बंद झाला
पुढची कथा ही अदृश्य होती त्या कथेत काय होते ज्याची कोणालाच कल्पना नव्हती?
©swamini chougule