तेरा यार हुं मैं भाग -४.
जलद कथा मालिका.
रुपाली जयाच्या पुढे पोहचली,पण....
...... जयाकडे प्रथमदर्शनी बघताच ती विस्मयचकित झाली.तिच्या डोळ्यासमोर एक कोणीतरी प्रौढ स्त्री,डोळ्यांवर भिंगाच्या चष्म्यातून तिच्या समोर बसलेल्या क्लाएंट सोबत चष्म्याच्या वरून बघत बोलत होती.समोर कॉम्पुटर आणि बरेच पेपर,फायली होत्या.एक नेहमीची साधीशी साडी,हातात साधे घड्याळ,गळयात शॉर्ट मंगळसूत्र,आणि दुसऱ्या हातात पेनने काहीतरी लिहीत होती.....
.......रुपालीही आता भानावर ,वास्तवात आली.स्वतःला सावरले.आपण आता जुन्या मैत्रिणी नसून जबाबदार गृहिणी आहोत,हे स्वतःलाच समजावले.
आणि जयाने वर बघण्याच्या आत ,खुर्चीवरच जाऊन तिच्या गळ्यात पडली.जयाही स्वतःला सावरत उठून तिनेही रुपलीला घट्ट मिठी मारली.....!!
" हाय जया...!!"
" हाय रूपा डियर...!!"
दोघींनी गप्पा सुरू केल्या.
जया आणि रुपाली ऑफिसच्या ग्राउंड फ्लोवरवर असणाऱ्या हॉटेल मध्ये गेल्या.वीस बावीस वर्षांची कहाणी ,थोडक्यात सांगता येईल तशी एकमेकींना सांगितली.
....पुढे रोज दोघींचे दिवसातून पाच सहा वेळा बोलणे व्हायचे.
धाडसी,समजूतदार ,कमवती जया,सासरच्या लोकांनी तोंड देऊन देऊन थकली होती खुप.नोकरी करून घरातलेहि करावे लागायचे.
आता रुपाली भेटल्यानंतर तिच्यात एक नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखे झाले होते. आणि.....
" काय ग जयडे,आज फोन नाही केला तू..?"
" काहीं नाही ग रुपा.काल डॉक्टरकडे गेले होते.तेच आपले नेहमीचे रडगाणे ग.पाळीचा खुप ञास होत होता, ब्लिडिंग थांबत नाहिये.मरणाचा अशक्तपणा जाणवतोय.आणि कामाची सुट्टीही मिळेना."
" हो ग,माझेही मागच्या महिन्यात असेच झाले होते. डॉकटर म्हणाले की, मेनोपॉजचा त्रास सहन करावाच लागणार.निसर्ग नियम आहे तो.या सगळ्यातून जावेच लागणार...."
" अग पण रूपा,खुप ञास होतो ग,जेव्हा घरातून कोणाला काही घेणेदेणे नसल्यासारखे वागतात.माझा नवरा तर म्हणतोय ,\" जगात तू काय एकटी आहे का,सहन करणारी,माझ्या आईनेही सगळे सहन केले ना,तिला तर कधी कंप्लेंट करताना बघितले नाही आम्ही." मला न रूपा ,काय करू तेच समजत नाही...?"
" काही करू शकत नाही जया,सहन करायचे आणि फक्त सहनच करायचे.तेच आपल्या हातात आहे."
जया कामावरून घरी चालली होती.आणि बस मधून उतरणार एवढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला.
" जये,तू सकाळी सांगुन गेली होती ना,पण मी घरी येताना विसरलो आहे.गिरणीमधून पिठाचा डबा आणायचा विसरलो आहे.तू तिथूनच येणार ना.येताना तूच घेऊन ये.."
जयाने तिच्या नवऱ्याचा फोन आला होता आणि तो काय म्हणत होता ते रुपाला सांगितले.
" काय सांगू रूपा,एवढी सणक जाते ना डोक्यात.असे वाटते की,असल्या उलट्या काळजाच्या लोकांमध्ये जाण्यापेक्षा दूर कुठेतरी निघून जावे.कसं ग समजून घेत नाहीत हे लोक,अग इतकी वर्षे केले ना सगळे.घरी जातानाच उद्याचे मार्केट,लागणारी जिन्नस ,मीच घेऊन जायचे.पण आता नाही होत ग पहिल्या सारखे. खरचं सांगते."
" थांब जया ,घाबरु नको.संयम आणि सहनशिल तेचे हत्यार टाकून पळणे शोभत नाही आपल्याला.आजवर जे केले नाही.ते ही करायचे आता.तू परत घरी फोन कर.आणि सांग तुझी परिस्थिती.आणि हे ही सांग की,तू गिरणी पर्यंत आलेली नाहीस.बस स्टॉप वर उताण्याचे आत घ्यायला या.तुला घेऊन जाता जाता डबाही घेऊन जाऊ.असे बोल.आणि ऐकलं तर सरळ तशीच डॉक्टरकडे जा. औषध घेऊन घरी जा .आराम कर.आणि तरीही काही त्रास झाला तर परत मला फोन कर.मग बघू पुढे काय होते ते."
कधीही नवऱ्याला प्रतिउत्तर न देणारी जया मनमोकळेपणाने,धीराने नवऱ्याशी बोलली.
तिकडे जयाच्या नवऱ्याला तसेपण तिला होत असणाऱ्या त्रासाची कल्पना होतीच.जयाने नक्की मैत्रिणीला फोन केला असणार याची त्याला खात्री होती.आणि त्यानेही हुशारीने आणि चलाखीने स्वतःला बदलल्याचे दाखवले.आणि....
" जया तू तिथेच थांब,मी येतो गाडी घेऊन,डबा घेऊ आणि रात्रीसाठी जेवणाला काहीतरी पार्सल घेऊन येऊ. म्हणजे तुला घरी आले की आराम करता येईल." असे म्हणाला.
इतक्या वर्षांनी दोन मैत्रिणींची भेट झाली ,आणि रुपालीला परत तिची जुनी धाडसी,हिम्मतवाली जया मिळाली.आणि जयाला तिची समजून घेणारी सखी सोबती.
जया तिच्या नवऱ्या सोबत घरी पोहचली.घरातील वातावरण व्यवस्थित होते.काळजी चे सावट दूर झाले होते आणि...
तेवढ्यात जयाच्या फोन मध्ये " टप टप" मेसेज पडल्याचा आवाज आला.जयाने फोन घेतला बघितले की, रुपालीने अरजित सिंगच् तिचं आवडते गाणे पाठवले होते.
तू जो रुठा...
तो कौन हसेगा...
तू जो छूटा...
तो कौन रहेगा...
तू चूप हैं तो...
ये डर लगता हैं...
अपना मुझको अब कौन कहेगा....
तू ही वजहा,तेरे बिना....
बेवजहा...बेकार हुं मैं....
" तेरा यार हुं मैं....
" तेरा यार हुं मैं.....!!!!"
©® Sush.