Login

तेरा मेरा साथ रहे भाग-२८ (अंतिम)

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग:- २८ (अंतिम भाग)

मागील भागात:-

दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. भाच्चे मंडळी ऋषी आणि परी आत्तूचे लग्न म्हणून खूप खुश होती. लग्नाची खरेदी करून झाली. आरूषीने अभि व स्मिता यांच्या तिच्याकडून खास कपडे भेट म्हणून द्यायला त्यांच्या रूमकडे आली होती. ती दार ठोठावणार तोच तिच्या कानावर त्यांचे बोलणे ऐकू आले. ते ऐकून ती जागीच थिजली. आपसुकच तिचा हात तोंडावर गेला.

आता पुढे:-

"अहो, तुम्ही आरूचं सत्य अमोलला सांगितलेत ते खूप बरे केलेत. सगळं माहिती असूनही त्यांनी तिचा स्विकार केला. खूप कौतुक वाटतं हो त्यांचं." स्मिता अभिला म्हणाली.

"हो, गं आपला होणारा जावई कौतुक करण्यासारखाचं आहे. जेव्हा मी त्याला सांगितले की आम्ही स्मिताचे खरे जन्मदाते नाहीत. तेव्हा मला वाटलं तो लग्नाला नकार देईल. पण त्याने शांतपणे सगळे ऐकून घेतले व त्याचा आधी जो निर्णय होता तोच निर्णय ठाम राहिलं असे म्हणाला." अभि अमोलचे बोलणे आठवून कौतुकाने तिला सांगत होता.

"तो माझं कौतुक करतं होता. पण म्हटलं त्याला की तुला कौतुक करायचे असेल तर तुझ्या होणाऱ्या सासूचे कौतुक करं. कारण तिनेच आरूषीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला मी फक्त तिला साथ दिली." अभि हसतं म्हणाला.

"तो निर्णय माझा असला तरी, तुमचीही साथ तितकीचं महत्त्वाची होती. म्हणून तर मी तो धाडसी निर्णय घेऊ शकले." स्मिता त्याचा हात हातात घेत म्हणाली.

"नाही गं, आपण दोघं एकमेकांना साथ देतो. लाईक तेरा मेरा साथ रहे..हो ना." तो तिला जवळ घेत म्हणाला.

तिने हुंकार भरला.

अभि विचार करत म्हणाला,"मितू, मी अमोलकडून शब्द घेतलाय ते सत्य फक्त आमच्या दोघांत राहिलं म्हणून. पण आता वाटतं की आरूला हे कळायला हवं."

"अहो, काहीही काय बोलता? अजिबात सांगायचं नाही. ती ते सहन करू शकणार नाही. आपली आरू खूप हळवी आहे, हो. ती आपल्याला काही सांगणार नाही पण ती स्वतःला खूप त्रास करून घेईल. आता ही गोष्ट आपल्या तिघांतच राहिलं." स्मिता आरूच्या काळजीने हळवी होत म्हणाली.

"अगं, पण हे सत्य तिला कधी ना कधी कळेलच ना." अभि तिचे दोन्ही खांदे धरून म्हणाला.

"ते जेव्हाचे तेव्हा बघू. आता घरात शुभ कार्य आहे. तर त्यावर लक्ष देऊ." ती त्याचे हात दूर करत म्हणाली.

बाहेर हे सर्व आरूषीने ऐकले. काही क्षण तर तिला काहीच कळले नाही.

'ज्यांना आपण आपले आईवडील समजत होतो. ते आपले खरे आईवडिल नाहीत. तरीही किती केलं त्यांनी माझ्यासाठी. ते एक होते त्यांनी जन्म देऊन मरणासाठी टाकून दिले आणि एक हे दोघे ज्यांनी मला फक्त जीवदान दिले नाही तर नाव, प्रेम, आपुलकी, नाती, शिक्षण सर्व काही दिले. माझे लाड केले, माझे सर्व हट्ट पुरवले. इतकंच नाही तर माझ्या उपचारावर कधी कधी महिन्याचा आख्खा पगार घालवायला मागे पुढे बघितले नाही. खऱ्या आईवडिलांनीही हे केले नसते. हे सर्व फक्त त्यांनी माझ्यासाठी केले. किती मोठे उपकार केले त्यांनी! आत्तापर्यंत देवमाणूसाबद्दल फक्त ऐकून होते. पण आता हे दोघे आईबाबाच्या रूपाने देवच भेटले मला. देवा, यांना नेहमी सुखी ठेवं. या जन्मी तर त्यांचे ऋण मी फेडू शकणार नाही. पण देवा पुढच्या जन्मी याच आईवडिलांच्या पोटी माझा जन्म होऊ दे.' आरूषी मनातल्या मनात दोघांचे आभार मानत देवाला प्रार्थना करू लागली. तिचे डोळे आसवांनी तुडुंब भरलेले होते. कंठ कातर झालेला होता.

"आणि त्या इडियट अमूला सगळं माहिती होतं तरी त्याने सांगितले नाही. हेच प्रेम का त्याचं? बघते त्याला नंतर. पण मी खरंच खूप भाग्यवान आहे त्याचासारखा जोडीदार मिळाला मला. पण ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना सांगायला हवी." ती अमोलला आठवत मनात बडबडत होती.

अभिला तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी  स्मिता दार उघडून बाहेर पडली तर आरूषी तिला पाठमोरी उभी असलेली दिसली.

तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती एकदम दचकली.

"अगं ए, आरू, राजा मी आहे आई. एवढी का दचकलीस?" स्मिता तिला म्हणाली.

आत्तापर्यंत दाबून ठेवलेला आसवांचा बांध फुटला.  ती चटकन वळून तिच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली.

स्मिता तिला काय झालं म्हणून विचारत होती. पण ती काहीच सांगायला तयार नव्हती. तिला बिलगून हुंदक्यावर हुंदके देत होती.

स्मिता खूप घाबरून गेली. तिच्या हुंदक्यांचा आवजाने अभिही बाहेर आला. त्याने नजरेने तिला विचारलं, माहिती नाही असे ओठ काढले.

अभिला पाहून आरूषीला अजून दाटून आलं. ती आता त्या बिलगून रडू लागली. त्याने तिला तसेच रूममध्ये नेले. पाणी प्यायला दिले. ती थोडी शांत झाली. तरीही दोघांच्या मांडीवर डोकं ठेवून आसवे गाळतं होती.

त्या दोघांना वाटलं ती सासरी जाणार म्हणून इतकी रडतेय.

अभि तिचं डोकं कुरवाळत म्हणाला, "बच्च्या, शांत हो, आताच अशी रडशील तर पाठवणी करताना डोळ्यांत पाणी शिल्लकच राहणार नाही, राणी." तो विनोद करण्याचा प्रयत्न करून तिला हसवायचा प्रयत्न करत होता.

खरं तर ती सासरी जाणार या कल्पनेने दोघांनाही भरून आलं होतं. कसे बसे स्वतःला सावरत तिला सावरत होते. तेवढ्यातही त्याच्या बोलण्याने ती हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

आरूषीच्या मनातलं वादळ शमता शमत नव्हते. अमोल व त्याच्या आईवडिलांशी बोलल्या शिवाय तिला चैन पडणार नव्हतं. तिने मनाशी एक निर्णय घेतला.

अभि व स्मिता यांनीही आधीच अमोलच्या आईवडिलांना तिच्याबद्दल सगळं सांगितले. कारण त्यांना नंतर वाटायला नको की फक्त मुलाला सांगून त्यांना अंधारात ठेवून फसवणूक केली. म्हणून त्यांनी सगळं खरं सांगितले त्यांनाही या उभयंताचं कौतुक वाटलं आणि आपल्या मुलाचा अभिमानही वाटला. त्यांनाही अमोल सारखेच या लग्नाला मनापासून होकार दिला.

आरूषीने स्वतः अमोलच्या आईवडिलांना भेटून त्यांना सर्व सांगितले. तिने सर्व सांगितले हे तिच्या आईवडिलां व अमोल यांना कळू देऊ अशी इच्छा व्यक्त करून त्यांचा जो निर्णय असेल ते तिला मान्य असेल असे सांगून ती निघून आली.

त्यांनी लग्नाला होकार दिल्यावरही तिने विचारलं होतं उपकार म्हणून किंवा समाजात नाव मोठं होण्यासाठी तुम्ही लग्नाला होकार दिला असेल असे मला नको आहे.

तसं असतं तर त्यांनी ही गोष्ट जग जाहीर करून प्रसिद्ध मिळवली असते ना असे ते म्हणाले. तिला त्यांनी मनापासून सून म्हणून स्विकारले हे पटवून दिल्यावरच ती लग्नाला तयार झाली.

थाटामाटात अमोल व आरूषी यांचे लग्न पार पडले. त्या दोघांचाही सुखांचा संसार सुरू झाला.

सगळे कर्तव्ये व जबाबदाऱ्या अभि व स्मिता यांनी एकमेकांच्या साथीने पार पाडले. आता त्यांनी उरलेले आयुष्य जास्तीत जास्त एकमेकांच्या सान्निध्यात एकमेकांच्या साथीने आनंदाने जगायचे ठरवले.

कर्तव्य व जबाबदारी
पार पाडले साथीने
सुखदुःख सहन केले
एकमेकांच्या सोबतीने

उरलेले क्षण तुझ्या
मिठीत घालवेन
शेवटच्या श्वासापर्यंत
सोबत असेन

अभिच्या खांद्यावर डोकं टेकवत स्मिता आठोळी म्हणून दाखवली. त्याने मनापासून तिला दाद दिली. ते दोघे रूममध्ये टि. व्ही. पाहत होते. टि. व्ही. वर त्यांना साजेसे गाणं लावलं होते.

तेरा मेरा साथ रहे हो तेरा मेरा साथ रहे
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे
तेरा मेरा ...

ते दोघे एकमेकांना पाहून हसू लागले.

समाप्त-

समजूदार, प्रेमळ, खंबीर साथ देणारा जोडीदार असेल तर आयुष्यातील कोणत्याही परिस्थिती वर मात करून कोणत्याही वाटेवर आनंदाने चालू शकतो.

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

कथेचा शेवटचा भाग कसा वाटला, ते सांगायला विसरू नका.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत.

🎭 Series Post

View all