तेजस्वीनी

प्रेरणादायी कथा एक मूलीचा खडतर प्रवास
     ' तेजस्विनी ' ही एक प्रेरणा देणार्‍या मुलीची
कथा... तिने लहानपणापासून आपल ध्येय
निश्चित करून जिद्दीने, मेहनतीने यश संपादन
करणार्‍या तेजस्विनीची ही प्रेरणादायी कथा....

         एक लहानस खेडगाव होत. गावात घरेही
कमीच, सगळी शेतावर आपला उदर्निवाह
करणारी कुटुंबे राहत होती. त्याच गावात सदाशिव
च एक कुटुंब राहत होत. सदाशिवला एकच
मुलगी होती, तिच नाव तेजस्विनी. ती लहान
पणापासुन खुपच हुशार होती. तेजस्विनीची आई
स्वरूपा ही पाटलांच्या शेतात काम करायची आणि
वडीलही तिथेच काम करायचे. गाव म्हटल्यावर
थोडीच घरे होती. गावात जाण्यासाठी अजुनही
कच्चा रस्ता होता. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई
जाणवत असे. दुसर्‍या गावात जायच म्हटल की
सायकल कींवा पायीच जाव लागे. गावाच्या
आजुबाजुला सगळी शेतेच होती. गावाची बरीच
लोक ज्यांचा उदनिर्वाह शेतीवरच होता. याच
गावात तेजस्विनी राहायची. ती प्राथमिक शाळेत
शिकत होती. गावात फक्त चौथीपर्यंत शाळा होती.
ती अभ्यासात हुशार होती. एकच मुलगी म्हटल्यावर
ती आईवडीलांची लाडकी होती. परिस्थिती तशी
बेताचीच होती. पण सदा आणि स्वरूपा आपल्या
मुलीसाठी खुप कष्ट करायचे. ते एक दिवसही
घरी राहत नव्हते. तेजस्विनीला सुट्टी होती. ती
आपल्या आईसोबत पाटलांच्या घरी आली.
तेव्हा तिथे पाटलांच्या वाड्यासमोर तिने वर्दीतल्या
पोलिसाला पाहीले. तिला त्यांना पाहून खुपच
अभिमान वाटला. तेव्हा लहान वय ते सहजच
आपल्या वडीलांना म्हणाली...
" दादा , मला पण मोठ होऊन असच पोलीस
व्हायचय.... तिचे वडीलही म्हटले ,
' हो बेटा, तु खुप शिक आणि मोठी हो... त्या
पोलीसकाकांसारखी....'
तेजस्विनीची परिस्थिती गरिबीची होती, जमिन
नाही, फक्त गावाकडे लहान छप्पर होत, त्या
गावात तर कामधंदा नाही म्हणून ते या गावात
आले आणि नवराबायको दोघेही पाटलांच्या
इथे शेतात काम करू लागले.
    तेजस्विनी शाळेत खुप हुशार होती. अभ्यासात
तर वर्गात सगळ्यांत पुढे असायची. तेवढीच
समजदार होती, एवढीशी शाळेत जाणारी मुलगी
पण सगळ घरच काम करुन शाळेचा अभ्यासही
करायची. सदा आणि स्वरूपाला आपल्या या
पोरीची खुप कौतुक होत. तिला संध्याकाळी
अभ्यास करताना पाहील की या दोघांचा दिवसभर
काम केल्याचा थकवा दुर व्हायचा. त्यांना मुलगा
नव्हता पण त्यांना तेजुवर खुप विश्वास होता.
हिच आपली उद्याची परिस्थिती बदलू शकते
अस त्या दोघांना वाटायच. तेजु ही अत्यंत गुणी
आणि आज्ञाधारक होती. ति शिक्षकांना आवडायची.
सोनाली म्हणून तिच्या आवडत्या शिक्षिका त्यांची
तर खुप लाडकी होती. शेजार्‍यांना देखील मदत
करायची. कुणाच पत्र, एखादा कागद काही
वाचायच लिहायच काम असेल तर शेजारीपाजारी
तेजुकडे येत, ती पण ते काम करुन द्यायची.
तेजुच चौथीपर्यंच गावातल शिक्षण पूर्ण झाल
आता तिच्या वडीलांना तिला पुढे शिक्षणासाठी
दुसर्‍या गावात आणि तेही आठ कि. मी. पाठवणे
म्हणजे, भितीच वाटत होती. ग्रामीण भाग
असल्याने दिवसातुन एकदाच बस गावात यायची.
काही काम असेल तरच लोक तिकडे जात. त्यात
मुलीची जात म्हटल्यावर लोकांच्या वाईट नजरा
मुलींच्या बाबतीत घडणारे प्रकार यामुळे तेजुला
पुढे शिकवाव की नाही या विचारांत तिचे बाबा
होते. त्यांच मन तर मुलीच्या काळजीपोटी नाहीच
म्हणत होत, पण तिची आवड, हुशारी यांच काय
उपयोग मग .... तेजुला पण शिकायच आहे.
       नेहमीप्रमाणे सदा कामावर गेला, त्याच
कामात लक्ष नाही, तो कुठल्यातरी विचारांत आहे.
हे पाटलांना जाणवल त्यांनी त्याला काय झाल ?
अस विचारल्यावर त्याने आपल्या मुलीच्या पुढील
शिक्षणाची चिंता बोलून दाखवली. मग पाटील
म्हणाले.... हे बघ सदा, तेजु खुप हुशार आहे.
तिला शिकव, ती पुढील शिक्षणाला जाईल.
त्यांनी तेजुला सायकल घेऊन दिली. आणि तिचे
शिक्षकही त्यांनीही तिच्या वडीलांना तिला पुढे
शिकवा अस सांगितल. सदाशिवने तेजुला पुढे
शिकायला पाठवल. तेजुलाही पाचवीच्या पुढे
आपण शिक्षण घेऊ शकु याचा खुप आनंद झाला.
ती रोज आठ किमी प्रवास करुन शाळेत जायची
आणि बरोबर यायची. तिथल्या मुली फक्त
चौथीपर्यंत शिकत आणि पुढे शेतीच काम करत.
पण तेजुचे विचार वेगळे होते. ती खुप जिद्दी होती.
आपली मुलगी पुढे शिकते, पैसा लागेल तिला
म्हणुन तिचे आईबाबा खुप कष्ट करायचे.
तेजुला काहीही कमी पडू देत नव्हते.
         तेजुही इतक्या लांब शाळेत जाऊन कधी
दमायची नाही, मन लावून अभ्यास करायची.
तिचा नेहमी प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक येतो.
तिच एक स्वप्न होत. मोठ होऊन तिला पोलीस
अधिकारी बनायच होत. शिक्षकही तिला चांगल
मार्गदर्शन करायचे. ती पण खुप मेहनत घ्यायची.
तिला आपल्या आईवडीलांच आणि गावाच नाव
मोठ करायच होत. तिला शाळेत चांगल्या मैत्रिणी
आणि चांगले शिक्षक मिळाले. तिला नेहमीच
प्रोत्साहन मिळत गेल. खुप काहि शिकायला
मिळाल. तिने दहावीपर्यंत आपले शिक्षण पुर्ण
केले. दहावीला मन लावून आणि चांगला
अभ्यास केला. रात्री कमी वेळ मिळायचा परंतु
सकाळी लवकर ऊठुन तिने अभ्यास केला.
तिला कुठलेही क्लास लावले नव्हते. कारण तेवढे
पैसे क्लासला भरण्याएवढी ऐपत नव्हती. तिने
आईबाबांना कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट धरला
नाही. आईवडील करीत असलेल्या कष्टाची
तिला जाणीव होती. शाळेतुन येईपर्यंत सायकल
च्या प्रवासाने दमुन जायची, पण तरीही आई
शेतातुन उशीरा यायची म्हणुन स्वयंपाक करणे,
बाकी सगळ आवरायची. मग यात तिचा वेळ
जायचा. जनावरांचचाही चार्‍याच तिला बघाव
लागे. आईवडील संध्याकाळी दमुन आल्यावर
त्यांना चहा द्यायची... आपल्या मुलीच्या हातचा
चहा पिउन त्यांना छान वाटायच... थकवा तर
दुर पळून जायचा. इतक सगळ करुन मिळालेल्या
वेळेत ती रात्री आणि सकाळी लवकर उठून
अभ्यास करायची. तिची हीच मेहनत आणि
मनापासुन केलेल्या कष्टाच चीज झाल होत.
दहावीच्या पेपरचा चांगला अभ्यास केल्यामुळे
ति चांगल्या गुणांनी उत्तीर्णच नाही झाली
तर जिल्ह्यात ती पहीली आली होती. ही बातमी
कळली तेव्हा तिच्या आईबाबांना, शिक्षकांना
आणि गावातील सर्वांना तिचा खुप अभिमान
वाटला, तिच खुप कौतुक झाल. पेपरला नाव
आल. शाळेच आणि आईवडीलांचही नाव झाल.
तिच्या वडीलांना तर खुप आनंद झाला. तिच्या
यशाने ती खुप आनंदात होती. पण तिला अजुन
पुढे झेप घ्यायची होती. पुढे अजुन शिकायच होत.
हा तर पहिला टप्पा तिने यशस्वीपणे पार पाडला.
इतक मोठ यश मिळवून देखील तेजस्विनी
हुरळून गेली नाही. तिने तिच ध्येय निश्चीत केल
होत. दहावीपर्यंत शिकणारी गरिब, मजुर
कुटुंबातुन शिकलेली ती पहीलीच मुलगी होती.
त्यांच्या गावात, शेजार्‍यांना देखील खुप आनंद
झाला. सगळीकडे तिच्या यशाची चर्चा होत होती.
पाटील साहेबांना तर खुप अभिमान वाटला.
त्यांनी गावाच्या वतीने तेजुचा सत्कार केला
आणि पुढील शिक्षणास प्रोत्साहन दिले. काही
लागल्यास ' मि मदत करेन तुला ' अस आश्वासन
दिल. शाळेच्या वतीने तिचा सत्कार झाला.
आपल्या मुलीच्या यशाने आईवडीलांच्या डोळ्यां
तुन आनंदाश्रु वाहू लागले. आणि त्यांचा विश्वास
पटला की याच शिक्षणाने आपली मुलगी
शिकुन खुप पुढे जाईल.
   चांगल काहि करायच म्हटल की अडथळे
येतातच तसच झाल तेजुच्या बाबतीत....
तीच्याच गावातील एका मुलीला ती शिक्षणासाठी
बाहेर होती, म्हणून तिला मुलांनी त्रास दिला
वगैरे अस तिच्या वडीलांच्या कानी आल. त्यांना
लोकांनी सांगितल की ' तेजुलाही बाहेर शिकायला
पाठवू नको, कितीही केल तरी ति अडाणी
माणस, त्यांनी अस सांगितल्यामुळे सदालाही
आपल्या मुलीच्या काळजीपोटी त्याने तेजुला
सांगितले की ' पोरी, आता जवळ होती शाळा
म्हणुन तुला शिकवल, आता पुढे खुप दुर जाऊन
तुला शिक्षण घ्याव लागत असेल, तर ते जमणार
नाही. त्यामुळे तु पुढे शिकू नको. त्यांच्याच
नातेवाईकांकडून तिला लग्नासाठी स्थळ आल
होत. पण तेजुला शिकायच होत, काय कराव
समजत नव्हत. वडील तर तिच ऐकायला तयार
नव्हते. तेव्हा सोनाली मॅडम तिच्या आवडत्या
टीचरला तिने हे सगळ सांगितल. त्यांनी घरी
येऊन तिच्या वडीलांना समजावून सांगितल.
त्यांची अडचण, त्यांचे विचार सगळ ऐकून घेतल.
तेव्हा पुढील तेजुचा शिक्षणाचा खर्च मी करेल
अस त्या टीचरने सांगितल. तुम्ही फक्त तिला
साथ द्या.... तेव्हा तिच्या वडीलांची काळजी
दुर झाली. सोनाली मॅडममुळे तेजुच्या शिक्षणाचा
प्रवास परत सुरू झाला. आईबाबांना आता
शिक्षणाच महत्व समजल होत. ते तेजुसाठी काहीही
करायला तयार होते. तेजुने शेतात, घरी मदत
करुन बारावीच्या परीक्षेत चांगल यश संपादन
केल. ती काॅलेजमध्ये प्रथम आली होती.
आईवडीलांना या वेळेस खुप आनंद झाला.
तिच्या बाबाने तर सगळ्या गावात पेढे वाटले.
तेजुलाही आईबाबा आपल्याला सपोर्ट करतात
याच खुप छान वाटत होत. ती बारावी पास झाली.
तेव्हा सदा आपल्या बायकोला म्हणाला...
स्वरूपा, आपण तेजुला शिकू द्यायच, आपण
नाय शिकलो, पर आपली पोरगी शिकून खुप
मोठी होईल, अन् बाकीच्या लोकांनाबी पुढे
नेईल. ती खुप हुशार आहे. आपल्या वडीलांचे
हे कौतुकाचे शब्द ऐकुन तेजुलाही भरुन आल.
त्याच दिवसापासुन तेजुने अजुन पुढे जायच
ठरवल.
      तेजुची बारावी पूर्ण झाली होती. आता पुढे
तिला काॅलेज आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग
च्या परिक्षेची तयारी सुरू केली आणि पुढच
काॅलेजमध्ये प्रवेश मिळवल. तेजुची परिस्थिती
गरिबीची होती, तिला परिस्थितीच भांडवल
करायला आवडत नव्हत. पुढे तीन शिकायच
म्हटल्यावर पैसे तर लागणार होते. म्हणुन ती
सुट्टीच्या दिवशी काम करायची. त्यातुन मिळणारे
पैसेतुन ती पुस्तक घ्यायची. तिला जास्त गुण
मिळाल्यामुळे तिला चांगल्या काॅलेजमध्ये
ॲडमिशन मिळाल होत. सोनाली मॅडमने तर
तिला आपली बहीण समजुन काॅलेजसाठी
लागणारी सर्व मदत केली. ती तिथेच हाॅस्टेलाला
राहू लागली. आईवडील तिला पैसे पाठवत होते.
कारण काॅलेज गावापासुन लांब तालुक्याच्या
ठिकाणी होत. ती काॅलेजमध्ये गेल्यावर खुप
पहील्यासारखा अभ्यास करू लागली. तिने
शिक्षकांकडुन राज्यसेवा परिक्षेविषयी सर्व माहीती
मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा अभ्यास
सुरु होता. काॅलेजमध्ये इतर मुलींसारखी ती
वेळ वाया घालवत नव्हती. ती तिच्या ध्येयाच्या
दिशेने वाटचाल करत होती. स्पर्धापरिक्षेचा
आणि काॅलजचा दोन्ही अभ्यास ती करत होती.
हे चालु असताना ग्रॅज्युएशन देखील पूर्ण करत
होती. तिने स्पर्धापरीक्षेसाठी क्लास वगैरे
जाॅईन ती करू शकत नव्हती, कारण त्यांची फि
तिला परवडण्यासारखी नव्हती. पण तिला
मार्गदर्शक शिक्षक चांगले मिळाले.
अभ्यास तर चालू होता, करत होती. तिने पहीली
राज्यसेवेची प्रिलीअमची परिक्षा दिली, त्यात
ती नापास झाली. तिला थोड वाईट वाटल.
आपण कुठे कमी पडतो, काय चुकल ते परत
त्या चुका नाही करायच्या, तिला अनुभव मिळाला.
तीने परत मन लावून आणि पुर्ण एकाग्रतेने
अभ्यास सुरू केला. पहिल्या अपयशामुळे ति
खचुन गेली गेली. तिला अजुन जास्त अभ्यास
करण्याची प्रेरणा मिळाली. पहील वर्ष गेल.
दुसर्‍या वर्षी तर्यंत चांगला अभ्यास केल्यामुळे
तिला पूर्वपरीक्षेत यश मिळाल. तिला खुप
आनंद झाला. ही यशस्वी होण्याच्या टप्प्यातील
पहीली पायरी तर ती चढली होती. त्याच जिद्दीने
ती अभ्यास करत राहीली, ग्रॅज्युएशन पुर्ण
झाल्यावर तिने मुख्य परिक्षा दिली. त्यातही
ती पास झाली. तिच्यात जिद्द होती आणि मेहनत
करण्याची तयारी होती. आईवडीलांपासुन दुर
राहुन तिने हाॅस्टेलला राहुन, काॅलेज लाईफ
असुनही एवढ enjoy न करता तिने अभ्यासाला
प्राधान्य दिल. कारण तिला तिच्या ध्येयापर्यंत
पोहचायच होत. एक दिवस ति ती मुलाखतीमध्ये
ही पास होते. तिची आयपीएस पदी निवड होते.
तिला आणि आईवडीलांना, सर्व गावकर्‍यांना
आनंद झाला आणि सगळ्या गावाला तिचा
अभिमान वाटला. एवढ्या गरिब परिस्थितीत
तिने जिद्दीने शिक्षण घेऊन हे यश मिळवल.
तिला मदत करणार्‍या आणि आपल्या बहिणी
सारख नेहमी पाठीशी असणार्‍या सोनाली टीचर
ला तर खुप आनंद झाला. त्यांना खुप अभिमान
आणि तिच्यावर विश्वास होते. तेजस्विनी त्यांना
जाऊन भेटली आणि त्यांचे आर्शिवाद घेतले.
   एक गरिब कुटुंबातील मुलगी, आणि तिला
शिकवणारे , साथ देणारे तिचे आईवडील यांच्या
सपोर्टमुळे तेजस्विनीने आयपीएस परीक्षा पास
केली. तिच्या यशाबद्दल , प्रवासाविषयी सर्वच
वर्तमानपत्रांतुन तिच्याविषयी छापण्यात आल
होत. तेजस्विनीच स्वप्न खुप कष्टाने पूर्ण झाल
होत. जेव्हा ती तिच ट्रेनिंग पूर्ण करुन तिच्या
गावात परत येते तेव्हा तर सगळा गाव तिच्या
स्वागतासाठी सज्ज झाला होता. गावाच्या वतीने
तिचा सत्कार करण्यात आला. आता ति अधिकारी
झाली होती. त्यामुळे सगळीकडुनच तिच्यावर
कौतुकाचा वर्षाव होत होता. आईबाबांना तर
खुप छान वाटत होत. गावात खुपच बदल झाला.
तेजस्विनी ने शिकुन आयपीएस होउन स्वतःच
शाळेच, आणि गावाच नाव मोठ केल. तिच्या
आईवडीलांचही सर्व स्तरातुन कौतुक झाल.
गावातील मुलींनी तेजस्विनीपासुन प्रेरणा घेतली.
सर्वच मुली आता शिकु लागल्या आणि त्यांचे
घरचेही त्यांना सपोर्ट करू लागले. गावातील
लोकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
आयपीएस म्हणुन सगळा गाव, जिल्हा तिला
ओळखु लागला. सगळे तिला आता बघितल्यावर
सलाम करतात. गावात जाणारे पक्के रस्ते
तयार झाले. तिच्यामुळे गावाला एक नवी ओळख
मिळाली. गावात शाळा तयार झाली आणि
काॅलेजचही काम सुरू झाल. तिच्याच गावात
बायका, मुलींना त्रास देणारे दारू पिणारे आणि
टपोरी मुल सुध्दा तेजस्विनीला वर्दीत पाहून
घाबरतात. महीलांना त्रास देणार्‍यांना वचक
बसला. तेजस्विनीमुळे गावात खुप चांगल्या
गोष्टी झाल्या. एक मुलगी शिकली तर गाव
एवढ पुढे गेल. आपण इतर मुलींना शिकवल
पाहीजे, आणि त्यांना शिकवणे आपली जबाबदारी
आहे, अस प्रत्येक वडीलांना समजल. सर्वांसाठी
आयपीएस तेजस्विनी आदर्श होती. तेजस्वीनीने
आपल्या यशाच श्रेय आईवडील, तिला मदत
करणार्‍या टिचर सोनाली मॅडम यांना दिल...
" तुमच्यामुळे मी माझे हे स्वप्न पुर्ण करू शकले."
मला तुमच्या सर्वांची साथ आणि आर्शिवादामुळे
मी हे यश मिळवू शकले.
     
        या गोष्टीवरुन एवढच सांगायच आहे की
आपण कुठलही यश मिळवण्यासाठी मेहनत,
जिद्द आणि सातत्य असेल आपल स्वप्न नक्कीच
पुर्ण होत. अस म्हणतात ना ' कोशिश करनेवालो
की कभी हार नहीं होती. ' आपल ध्येय निश्चित
केल्यास आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्न
करत राहील्यास यश आपल्याला मिळतेच.
स्पप्न नुसत पाहायच नसत तर ते सत्यात
उतरवण्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर
उचलावा लागतो. शेवटी कस आहे, स्पर्धेत
हजार लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी
999 लोकांपेक्षा काहितरी वेगळ कराव लागत.
प्रयत्न करत राहील्यास एक ना एक दिवस
आपला येतोच.