स्वप्नातलं भविष्य ( भाग १० अंतिम)

सुहास रेखाच्या मागे धावत सुटला........


सुहास रेखाच्या मागे धावत सुटला. तिच्या अंगात कुठून एवढं बळ आलं होतं कोण जाणे. ती एखाद्या

खुळावलेल्या जनावरासारखी "त्या " खोलीच्या दरवाजातून वाड्यच्या मागच्या भागात आली. बघता बघता ती तापवणाऱ्या उन्हातून चढण ओलांडून माळावरल्या उतारावरून नदीकडे निघाली. तिच्या लक्षात आलं नाही की माळ उतरल्यावर नदीजवळ दलदल आहे. सुहास तिच्या मागे ओरडत धावत होता, " रेखा, अगं थांब, काय करत्येस तू ? कुठे निघालीस ? ", मग त्याला कळलं की ओरडण्यात वेल घालवण्यापेक्षा आपण तिच्यासमोर जाऊन तिला अडवायला हवं . तो कसातरी तोल सांभाळत नदीकडे जाणारी उतरण उतरू लागला. माणूस उतरणीकडे बघत बसला की त्याला घसरण्याची भीती जास्तच वाटते. जवळपासची झाडे झुडपे पकडत तो उतरत होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटत होतं. शिवाय वरून ऊन आणि गरम वारा. रेखा मात्र स्वताशीच बडबडत साडी वर धरून पळत होती. तिचे केस आणी पदर वाऱ्यावरती भन्नाट उडत होते. एखाद्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर पळणारी स्त्री दाखवलेली असते ना , तशी. आता ती निराहसेने पक्की ग्रासली होती. एकीकडे म्हणत होती, "आता मला जगून काय उपयोग ? " .... इतरही बडबड चालू होती. हातून गेलेल्या सगळ्याच गोष्टींची तिला आठवण येत होती. मग तिला आठवलं. तिच्या वडलांनी पण आत्महत्याच केली होती, असं आत्या म्हणाली होती. मग तिला डोळ्यासमोर आई, आत्या आणि एक वडिलधारं माणूस (तिचे वडिल असावेत. कारण तिने वडलांना पाहिले नव्हते ) दलदलीत उभे असलेले दिसले. ते तिला त्यांच्याकडे येण्यासाठी खुणावत होते. दुर कुठेतरी तिला डोक्याला बँडेज बांधलेला अविनाश दिसला. वेगवेगळ्या भासांमुळे तिला दिसलं नाही की पुढच्याच खडकावर गर्द हिरब्या रंगाचं बुळबुळीत शेवाळ माजलेले आहे. इकडे सुहासही त्याच्या बाजूच्या खडकावर पाय ठेवणार तेवढ्यात तो ओरडला, "रेखा, जाऊ नकोस, पुढे दलदल आहे...... तू म्हणालीस तसा आपण दिवसाचा संसार करू. रेखा प्लीज परत फीर.... " असं म्हणता म्हणता त्यालाच हुंदका फुटला. रेखाला काहीच ऐकू येत नव्हतं. तिला लांबून कमळीच्या हसण्याचा आवाज येत होता....... ‌ समोर दिसणारे आई, आत्या आणि न पाहिलेले वडील हात पुढे करून तिला कवेत घ्यायला उत्सुक असलेले दिसले..... दलदल , निसरडं याचं तिला काहीच वाटलं नाही. तिचे पाय पटकन त्या निसरड्या खडकावर पडले.......... आणि ती काळ्या कुट्ट दलदलीत घुसली . मग मागे वळून तिने सुहासला सांगितलं, " माझ्या मागे येऊ नकोस. नैनाला सांभाळ....... मला ज गा य चं ना ही. ... " असं म्हणता म्हणता प्रथम ती कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत आणि शेवटी तिचा चेहरा दलदलीत बुडू लागला. नाकातोंडात घाणेरडी दलदल शिरली. त्या घाणेरड्या वासाची जाणीव् होण्या आधीच ती बुडाली.... ‌. डुबुक . डुबुक.. डुब ... डुब असा आवाज करीत मोठमोठे बुडबुडे आले. .... आणि दलदल शांत झाली......... पोट भरलेल्या .. डा कि णी सा र खी ..... .

सुहास तिथेच खडकावर डोकं धरून रडत बसला. त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडलेला त्याला जाणवला. त्या हाताची पकड घट्ट होती. तो आश्वासणारा हात नव्हता. त्याला धक्का देण्याचा हेतू त्यातून स्पष्ट जाणवला. त्याने मान वळवली . तो हात मामांचा होता ......... त्याने कसंतरी धडपडत ती पकड सोडवली आणि मामांच्या कानफटात मारली. आणि म्हणाला, " मामा माझ्या जिवावर उठलास ? आधीच तू दोन जिवांच्या हत्यांना तू जबाबदार आहेस " मामा कानफटात खाऊन दुसऱ्या खडकावर भेलकांडला . उठत धडपडत तो माळ चढू लागला. सुहास त्याच्या मागेच होता. त्याने पटकन मामांचा एक पाय ओढला. त्याच्या हातात त्यांच्या धोतराचं टोक आलं. त्याने ते खसकन ओढलं. पण मामांनी दुसऱ्या पायाने त्याच्या तोंडावर लाथ मारली. सुहासने तोल सांभाळला. पण मामा तोपर्यंत माळावर चढले होते. मामा माळावर मोठया कष्टाने आले खरे, पण समोर जाधव उभा असेल याची त्यांना कल्पना नव्हती. ते जेमतेम उभे राहिले असतील नसतील , तोच जाधवने त्यांच्या छातीत एक ठोसा लगावला. ...... पण मामा काही कच्चे खिलाडी नव्हते. त्यांनी पण जाधवाच्या पोटात दोन ठोसे मारून त्याचा एक हात पिरगळला आणि दुसऱ्या हाताने त्याची मान पकडली . म्हणाले, " जाधव शेवटी तू नोकर माणूस. वाड्याच्या अन्नाशी गद्दारी केलीस. थांव , साल्या तुला पण दलदलीत फेकतो." असं म्हणून त्यानी त्याच्या कमरेत हात घालून त्याला उचलायचा प्रयत्न केला. पण जाधवने जीवाच्या आकांताने मामांच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली. आणि मामांचा विळखा सैल पडला. मामा धडपडले. आता सुहासही वर आला होता. त्याने मामांच्या बरगडित लाथ मारली. वेदनेने विव्हळत त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. पण जाधवने पटकन त्यांच्या छाती वर उडी मारली आणि त्यांच्या नाकातोंडावर दोन चार ठोसे मारले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. आता तो छातीवर घट्ट मांड घालून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणाला" मामा , तू माज्या कमळीला मारलीस. तिचा जीव घेतलास. भडव्या, हरामजाद्या , आता मी तुला जिवंत ठेवीत नाही . " तो पुन्हा गळा दाबू लागला. पण सुहास ओरडला, " नाही जाधव त्याला मारू नकोस. आपण त्याला पोलिसांच्या हाव्यात देऊ. त्याला असाच पकडून बांधून ठेवू " त्यावर जाधव भडकून म्हणाला, " मी याला मारणार माजी कमळी कशी तळमळली असेल ह्ये कळलच पायजे ......... च्याला. "

सुहासनी मग जाधवला कसंतरी समजावलं. कायदा हातात घेणं बरोबर नाही. शिवाय याला असा मारून टाकला तर तो मरून सुटेल लेकाचा. याचे हालहाल व्हायला हवेत्. ह्याच्या मुळे तू , कमळी , रेखा आणि सदा यांनी किती मनस्ताप आणि हाल सोसले आहेत याची तुला कल्पना आहेच. यालाही जरा पोलिसी पाहुणचार आणि कोर्ट कचेरीच्या चकरा करू देत की. हे जाधवला पटलं. मग त्या दोघांनी मामांचा बनियान आणि धोतर फाडून त्यांचे हातपाय बांधले. मामा रागाने बडबडत होते, " लेको, तुम्हाला याचा जाब द्यावा लागेल. मी काहितरी करून सुटका करून घेईन. आता वाडा फक्त माझ्या मालकीचा आहे. रेखा पण गेली. मग सुहास भडकून म्हणाला, " ए, तोंड बंद कर सुकळीच्च्या., गप एकदम गप. तुला काय वाटतं रे, तू सुटशील दोन खुनांचा आरोप आहे तुझ्यावर, फाशी तुला नक्कीच होणार. काही नाही तरी जन्म ठेप कुठेच गेली नाही. आता मरेपर्यंत सड तुरुंगात. मधून मधून आम्ही येऊच तू कसा सुखात आहेस ते. " मामांना त्या दोघांनी उचलत ढकलत , लाथाळत वाड्यात आणून "त्या " खोलीत ढकलले. त्यांना खोलीत बांधण्यासारखी वस्तू दिसेना. सुहासला अचानक आठवलं, की मामांनी आजच दोरखंड आणलाय‌. शोधाशोध केल्यावर त्यांना तो मिळाला. एक तारेचं वेटोळंही मिळालं. त्यांनी मामांना दोन्ही गोष्टींनी पक्कं बांधून ठेवलं. मग जाधव म्हणाला, "मालक, आपण याला रेखाताईंच्या खोलीत वंद करून ठेऊ. मी तालुक्याच्या गावाला जाऊन पोलिसांना घेऊन येतो. " त्यावर सुहास म्हणाला, " अरे मी कसला मालक ? काहितरीच. " पण तो म्हणाला, " अवं तुमच्या मुळं तर मला माज्या कमळीबद्दल कळालं. आनी आता दुसरं कोन जितं हाय ? " . सुहास म्हणाला, " ते जाउ दे. तू याच्याकडे लक्ष ठेव. मीच पोलिस घेऊन येतो. तुला ते जमणार नाही. " मग त्याला नैनाची आठवण झाली. ती कुठे गायब झाली ? त्याने जाधवला नैनाबद्दल सांगितलं. त्याने मामांना एक वाजवली आणि विचारलं, " काय रे ए ... नैना कुठे आहे ? " ते तिला रेखाच्या खोलित ठेवल्याचं म्हणाले. रेखाच्या खोलीत नैना त्यांना हात पाय बांधलेल्या स्थितीत सापडली. ती रडतच म्हणाली, " मला आईकडे जायचयं. "तिला कशी तरी समजावली‌. सुहासने घड्याळ पाहिलं. दुपारचे तीन वाजत होते. म्हणजे दोन अडीच तासात सग्ळं घडलं तर. मग त्या दोघांनी मिळून मामांना रेखाच्या खोलीत नेऊन ठेवलं. बाहेरून कुलुप लावलं. सुहास नैनाला घेऊन निघणार तेवढ्यात जाधव म्हणाला, " मगाचच्या खोलीत ( "त्य " खोलीत ) एकदम कुजल्यासारखा वास मारतोय. पाह्यला हवं. " सुहास ने ते आपण आल्यावर पाहू असं म्हंटलं.

सुहास गेल्याचं पाहून मग मामांनी नाटक करण्याचं ठरवलं. जाधव मामांना बंद करून दिवाणखान्यात बसला होता. मामांनी विव्हळायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जाधव दाराशी आला आणि म्हणाला , " मामा , नाटक करू नकोस. आता सडत बस जेलमधे. पोलिस येतील आनी तुला घेउन जातील. मामा रडत रडत म्हणाले, " अरे बाबा , मला तहान लागल्ये, पाणी तरी पाज . " जाधवने मग पाणी आणू दरवाजाच्या फटीतून आत फेकलं. त्ते त्यांच्या तोंडावर पडलं. आणि तो परत दिवाणखान्यात जाऊन बसला. मामांनी सरकत सरकत , खोलीच्या कोपरा गाठला, जिथे एक सोटा पडला होता. त्यांनी मागे बांधलेल्या हातांतून आधी आपलं बूड आणि नंतर पाय बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यश आले. हात बांधलेले असले तरी ते आता पुढे होते. थोडा जोर लावून दोरखंड फाकवले आणि सोटा कसातरी दोन्ही हातात धरून उचलला. ते धडपडले. पण दरवाजाच्या कोपऱ्यात एका भिंतीच्या आधाराने उभे राहिले. जाधव परत बघायला येणार असा त्यांचा अंदाज होता. आणि तसच झालं. बराच वेळ मामांचा आवाज न आल्याने जाधव दरवाजाशी येऊन कानोसा घेऊ लागला. त्याला काही हालचाल जाणवली नाही. हा मेला तर नाही ? असं वाटून त्याने किल्लीने कुलुप उघडलं. मामांना पाशवी आनंद झाला. आता त्यांनी मोठ्या कष्टाने हातातील सोटा उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर धरला आणि दार उघडण्याची वाट पाहू लागले,. अपेक्षेप्रमाणे जाधवने अडसर दूर केला आणि अगदी सावधपणे तो आत शिरला. मामा दिसेनात म्हणून त्याचे कुतुहल वाढलं आणि तो दोन पावलं पुढे गेला आणि इथेच चुकला. मामांनी खांद्यात येणारी कळ कशी तरी दाबत वर केलेला सोटा जाधवच्या डोक्यात सर्व बळ एकवटून हाणला. .. जाधव ओरडून खाली पडला. त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. मग मात्र मामांनी उशीर न करता जवळच असलेला पेटारा सरकवला. पेटाऱ्या खाली तळघरात जाण्याचा जिना होता . त्यांनी प्रथम दरवाजा आतून लावून घेतला. आणि ते हळू हळू तळघरात उतरू लागले. ते आत गेले आणि प्रथम हाताचा दोरखंड तिथल्याच एका बंद खिडकीच्या गजाला घासाय्ला सुरवात केली. हळू हळू दोरखंडाची ताकत कमी झाली आणि दोन्ही हातांना बांधणारा दोरखंडाचा दुवा एकदाचा तुटला. मग त्यांनी स्वतःचे हात पाय सोडवून घेतले. तळघर बऱ्यापैकी मोठं होतं. एका कोपऱ्यात मामांनी एक शिल्प आणलेलं ठेवलेलं होतं. तो एक पक्षी होता. ज्याच्या चोचीत दात होते आणि पंखांना नख्या होत्या. लाल डोळ्याचा पक्षी मोठा विचित्र दिसत होता. मामा कदाचित त्याची आराधना करीत असावेत. त्याच्या बाजूला दोन तलवारी होत्या. त्या घेऊन ते सुहास आणि इतर लोकांशी सामना करणार होते. गेटजवळ जीप थांवलेली त्यांना ऐकू आलं नाही. ते थोडावेळ थांबून तळघरातून वर येउ लागले.

इकडे सुहासने मग नैनाला उचललं आणि तालुक्याला जाणाऱ्या बससाठी तो स्टँड वर आला. बस एकच असल्याने तिच्या फेऱ्या मार्यादित होत्या. तसच ती उशिरा यायची आणि वेळही नक्की नव्हती. मग बस आता चार वाजल्याशिवाय नसल्याचे समजले. त्याने समोरील हॉटेल मध्ये नैनाला घेऊन जेवण केलं. चारच्या सुमारास बस आली. तसा अर्धा तास लागायचा , पण चालत एखाद तास नक्कीच लागला असता. आणि उन्हाची वेळ असल्याने नैनाला घेऊन जाण कठिण होतं. तालुक्याच्या बस स्टॉप समोरच पोलिस स्टेशन होतं. तो आत शिरला आणि पाहिलं तर आज बरीच गर्दी दिसली. एक हवालदार दरवाजाजवळच बसला होता. त्याला विचारल्यावर कळलं की आतल्या साहेबांना भेटल्याशिवाय तक्रार नोंदवता येत नाही. म्हणून तो बसून राहिला. पाचच्या सुमारास त्याला आतून बोलावलं.तो "गुड आफ्टरनून " म्हणून तो आत शिरला. काही कारणाने खुर्चित वळलेले साहेब समोर आले आणि त्यांना बघितल्यावर ते पाचारणे काका असल्याचं दिसलं. तेही ओळखीचं हसू हसले, म्हणाले, " बस ना . (नैना कडे पाहून )तू लग्न कधी केलस ? इथे काय काम काढलस ? " त्यांना पाहून त्याला जरा धीर आला. मग त्याने त्यांना सगळीच कहाणी सांगितली. त्यावर ते म्हणाले, " अरे, हा प्रभा मामा मला माहित आहे. चोरीचा माल विकत घेतो आणि विकतो. पण इतकी काळजी त्यानी घेतली की त्याच्याविरुद्ध आमच्याकडे एकही पुरावा नाही. आधी आपण एफ आय आर वगैरे नोंदवून घेऊ आणि निघू. " मग त्यांनी स्टाफला सुचना देऊन निघण्याची तयारी केली. दोन कॉन्स्टेबल, दोन शिपाई घेऊन मग ते निघाले . वाटेत सुहासने त्यांना बरीच माहिती दिली . त्यावर ते म्हणाले, "अरे, या तुझ्या मामाचा आमच्या खात्याला पहिल्यापासून संशय. पण गावातल्या लोकाना आणि आमच्या खात्यातल्या काही लोकांना त्यांनी मिंध करून ठेवलय. म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणी तक्रार नोंदवायला तयार होत नाही " अर्ध्या पाऊण तासात जीप वाड्याच्या लोखंडी गेट पुढे उभी राहिली. ........

इन्स्पे. पाचारणे, चार पोलिस शिपाई आणि सुहास घाईगर्दीने घरात शिरले. जाधवला हाक मारूनही सुहासला तो दिसला नाही . त्याने प्रथम रेखाच्य खोली कडे पाहिलं, कुलुप नव्हतं. त्याने पाचारणे काकांना याची कल्पना दिली. मग त्या चौघांनी मिळून दरवाजा ढकलून पाहिला. पण तो आतून ब्ंद होता...... मामांनी जाधवचं काय केलं ? आतून बंद असलेला जाडजूड दरवाजा लवकर उघडेना. आत मध्ये मामा दोन्ही हातात तलवारी घेऊन वर येत होते. त्यांनी दारावरच्या धडका ऐकल्या आणि ते स्वतःशिच हसले. मारा लेको , धडका मारित बसा. आणि एकवार पडलेल्या जाधव कडे तुच्छतेने पाहात ते समोरच्या भिंतीतला जिना चढू लागले. आस्ते आस्ते दाराची जिद्द संपली आणि ते कोलमडून पडलं. मामा जिन्यावरून पळून गेले. नक्की कोणत्या खोलीत गेले कोणास ठाऊक . आत शिरल्या शिरल्या शिरल्या पाचारणेना जाधव पडलेला दिसला. त्याच्याकडे पाहण्यासाठी सुहास ला सांगून ते जिन्याने एकाहातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात पिस्तूल घेउन ते निघाले. त्यांनी आणखी दोघांना बाजूच्या खोल्या उघडण्यासाठी सांगून त्यातील ज्जिन्यांची नाकेबंदी करायला सांगितलं. अर्थातच कुलुपं गोळ्या घालूनच तोडली गेली. दर आवाजाला नैना मात्र जोरजोरात ओरडत असे. तिला गप्प करणं कठीण जात होतं. शेवटी एकदाची जाधवला शुद्ध आली. मग त्याने सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला हे सगळेच जिने आणि खोल्या आतून एकमेकांना जोडले आहेत. पाचारणे वरच्या खोल्यां मधून शिपायांसहित पळत होते. मग त्यांनी निर्वाणिचं शस्त्र उपसलं. साधारणपणे प्रत्येक गुन्हेगार ज्या युक्तीला बळी पडतो. अधून मधून मामा पाचारणेना चिडवीत होते. " अरे तुम्ही काय मला शोधणार ? आता बसा फिरत चक्रव्यूहात. " असं म्हणून ते पळत होते. शेवटी मामा म्हणाले, " इन्स्पेकट्र मला मुकाट्यानं वाड्याबाहेर जाऊ द्या, नाहीतर खून खराबा होईल. तुमच्या हातातलं पिस्तूल खाली टाका. तुमच्या माणसांना बाजूला व्हायला सांगा . मी कुठून जाईन ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. " पाचारने म्हणाले, " ठिक आहे मामा , हे टाकलं पिस्तूल. " म्हणून त्यांनी जवळच असलेलं एक जुनं पुराणं भांड होतं ते भिरकावलं. मामांना ते कळलं नाही. त्यांच्या डोक्यात इथून जिव्ंत बाहेर पडणं हा एकच विचार होता. मग पाचारने म्हणाले, " मामा , आम्ही जातो. मग आप ण मांडवली करू. तुम्ही स्टेशनला या. बघू काय ते. " असं म्हणून त्यांनी जिथे आहेत तिथेच आपले बूट वाजवले. खात्री करून घेण्यासाठी मामांनी हातातली एक तलवार फेकली. ती खणखणत खाली आली. मग मामा जिना उतरू लागले. ते इतके मूर्ख असतिल असं पाचारणेना वाटलं नाही . हळू हळू उजव्या हातातली तलवार समोर धरीत ते त्याच जिन्याने खाली उतरले. जिथे पाचारणे उभे होते. ते पाचारणे उभे होते त्या पायरीजवळून गेले आणि पाचारण्यांनी त्याच्या मानेवर हाताने विळखा घातला आणि हात पिळून त्यांच्या हातातली तलवार काढून घेतली. मामा जेरबंद झाले. मग त्यांना बेड्या ठोकून सगळेच जण माळावर गेले. मामांना पक्के धरून ठेवले होते. सुहास ने मग कमळीचं थडगं दाखवल. त्यातील सांगाडा पाहून जाधवला फार वाईट वाटलं. तो मामांच्या तोंडावर थुकला आणि म्हणाला, " अरे , मामा हरामखोरा, नरकात सुद्धा तुला कोणी जागा देणार नाहि. मग पंचनामा करून पाचारण्यांनी कमळिचा देह चादर घालून झाकून ठेवला. ते सुहासला म्हणाले. " तू म्हणतोस, रेखा या दलदलीत बुडाली, पण सगळी यंत्रणा आणून तिलाबाहेर काढायला बेळ लागेल. तो पर्यंत मामांना आपण पो. कस्टडीत ठेवू. मामा आता यापुढचे पाहुणचार तिथेच झोडतील. काय मामा, बरोबर आहे ना ? " उत्तरादाखल मामा फक्त गुरकावले.

सुहास ने मग ज्या खोलीत वास मारत होता. तिथे इन्स्पे. ना नेले. सर्वानाच नाकाला रुमाल लावावा लागत होता. टॉर्चच्या प्रकाशात भिंतितला जिना चढून ते सगळेच वर गेले . तिथे खाटेवर सदाचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडलेलं दिसलं. जवळच एक दोन तीन दिवसांपूर्वी वाढलेलं ताट दिसलं. सगळ्याच ठिकाणी किडे वळवळत होते. मग शववाहिका मागवली ती सात सव्वा सात वाजता आली. आणि दोन्ही बॉडिज घेऊन गेली. मामाना पण पुढील रात्री कस्टडीत काढण्यासाठि इन्स्पे. साहेबांनी बांधून नेले. जाताना मामा अतिशय तिरस्काराने सुहासला म्हणाले, " तू मंदीचा मुलगा. तिच्यावर माझा जास्त जीव . मी तुमच्यावर प्रेम केलं. चांगले पांग फेडलेस, मामाला तुरुंगात पाठवून. सुहास काहीच बोलला नाही. फक्त "जा आता " एवढच बोलला. सर्व प्रकारात नैनाचे प्रश्न चालुच होते. तिला शेवटी त्याने सांगितलं, की तुझीआई नदीवर कपडे धुवायला गेली होती ती घसरून पडली. रात्री दहाच्या सुमारास जिल्ह्याच्या गावाहून पोलिसांच्ं आणखी एक पथक आलं . त्यांच्याकडे दलदलीतून बॉडी काढण्याची सर्व यंत्रणा होती. इन्स्पे. पाचारणे पंचांसहीत आले. अर्ध्या पाऊण तासात रेखाची बॉडी बाहेर काढली गेली . आणि खडकावर ठेवली. तिचा चेहरा अर्धवट दिसत होता. जाधवने एक बालदी भर पाणी आणून तिच्या अंगावर ओतले. तेव्हा दलदलिची घाण बाजूला झाली. जीव एखाद तासात गेला असावा असं पाचारणे साहेबांचं म्हणणं होतं. रेखा हकनाक बळी गेली होती. केवळ परिस्थिती वाईट असल्याने तिला अशा कपटी मामाचा आश्रय घ्यावा लागला.

आता मामांविरुद्ध तीन माणसांचा जीव जायला जबाबदार असल्याचे गुन्हे नोंदले जातील असं सुहासच्या मनात आलं. पण रेखाची आठवण मात्र काही केल्या जाईना. दुसऱ्याच दिवशी वाडा सोडून तो जायला निघाला. तेव्हा जाधव म्हणाला, " आता कधी येनार तुमी वाड्यावर राहायला ? " त्यावर तो म्हणाला, " वाड्यावर राहायला? मी इथे येईन अस्ं वाटत तुला ? मी आता हा वाडा विकणार . पण इथे राहणार नाही. वाडा विकून जे पसे येतिल त्यातली काही रक्कम मी तुला देईन , पाहिजे तर शेती विकत घे. बघ काय ते. त्याने एकदा वाड्याकडे पाहिलं. आणि मागे न पाहता तो नैनासहित निघून गेला.

(संपूर्ण)


🎭 Series Post

View all