अगं अंजलीला त्याला भेटायच होत , म्हणून पटकन आलोत घरी , अरे अंजली कुठाय ? सोबत आत आलेल्या अंजलीला तिथून नदारत बघून आई , इकडे तिकडे बघत म्हणाल्या, आताच तर आम्ही सोबत आलोत ,
अग्गं आज्जी मी पप्पांना फोन लावते ,
मम्मीचा मोबाईल आणायला बेडरुम मधे गेले होते ,
अग्गं बाई गुणाची माझी बाळ , रमाबाई कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाल्या ,
तुला कस माहीत मोबाईल बेडरुम मधे होता म्हणून , भार्गवीने विचारले ,
मम्मी मीच तर मघाशी चार्जींगला लावला होता तुझा मोबाईल , अच्छा ! हो गं ,,,
बरं जेवतेस का ?
नाही थोड्या वेळाने आज्जीसोबत जेवणार !
बर बाबा ,, ठिक आहे ,
चला मी बाकी काम बघते , तू गेटच्या बाहेर जायचे नाही , पप्पांसोबत बोलून लगेच ठेवशील फोन , आणी हाॅलमधेच खेळत बस ,
बरं मम्मी , म्हणत तिने अवीला फोन लावला ,
पण त्याने फोन ऊचलला नाही ,
मग अंजलीने कपाटावर ठेवलेला तिचा मोठ्ठा टेडीबीयर जवळ घेतला आणि टिव्ही सुरु करुन सोफ्यावर बसली ,
भार्गवी आणी अंजली बोलत असताना रमाबाई आपल्या बेडरुम मधे गेल्या आणि तिथून त्यांनी भटजींना दुसर्या दिवशी पुजेसाठी बोलावले ,
सोबतच सुशीलाबाईंना फोन लावला ,
हॅलो,, सुशीला ,कशी आहेस ?
मी ठिक आहे गं , तू बोल , कशी आहेस ?
हो ग मी पण छानच !
काय नेहमी नेहमी कंम्बरेच गार्हाण सांगत बसायच ,
मजेतच आहोत म्हणायचे ! सुशीला बाई हसतच म्हणाल्या ,
हो बाई खरेच ,आता ते दुखण सांगायलाही बर वाटत नाही ,
बर तू कसा काय केला फोन ? घरी सगळ ठिक ना ? काळजीच्या सुरात सुशीलाबाई म्हणाल्या ,
हो सगळ ठिक आहे ,
ऊद्या तू अंजलीच्या वाढदिवसाला आलीस ,
की अजूनच ठिक वाटेल मग !
हसून रमाबाई म्हणाल्या ,
अरे हो , अंजलीचा वाढदिवस ऊद्या , येते हो ,
सुशीला सकाळीच ये , पुजा ठेवली आहे ,
बरं ठिक आहे , लवकरच येते मी , मग बोलू सविस्तर ,
चल मला स्वयंपाक करायचा आहे ,
बर ठिक आहे , ये मग , रमाबाईंनी फोन ठेवला ,
चला झालीत महत्त्वाचे दोन कामे ! आता जाते जेवायला !
ऐ अंजली चल जेवण करु , हो आज्जी ,सोफ्यावरुन खाली ऊतरत अंजली म्हणाली ,
बापरे , माझी बाई तर बरीच मोठी झाली ,
अगं भार्गवी ऐकतेस का ,
हो आई बोला ,
तुझी मुलगी आत्ता बातम्या बघत होती ,
हो का !
अहो तुम्हाला सांगायचच राहील ,
काल तर ही म्हणाली तिला आशा भोसलेंचा आवाज आवडतो आणि चक्क मोबाईल मधे ती आशाजींचे गाणे ऐकत होती , हसून भार्गवी म्हणाली , दोघी ही खुप कौतुकाने अंजलीकडे बघत होत्या ,
मग तिघींनीही जेवण केलं ,
थोड्या वेळाने अंजली , आज्जी सोबत बेडरुम मधे आराम करायला गेली , आणि भार्गवीने सगळा पसारा आवरायला सुरुवात केली , चला आता ऊद्या जेवायला काय काय करायच ? असे करते अंजलीच्या आवडीचेच पदार्थ बनवते ,
तिच्या काही मैत्रिणी बोलावते , कुणाला बोलवायचे बरे , शामल , मोयना , वैभवी , बरखा आणि ,,,, कोण ?
अरेच्चा एवढ्याच तर आहेत तिला आवडणार्या मैत्रिणी ,
ह्या पोरीला ना , मैत्री करायची हौसच नाही मुळी ,
बस पप्पा असले की झाली खुश ,
बरे झाले माझ्या मैत्रिणी इथेच असल्यामुळे त्यांच्या मुली हिच्या मैत्रिणी झाल्यात , वैभवी सोडली तर तिघी ही तिच्या मैत्रिणीच्याच मुली ,
असे करते त्यांना परिवारा सकट ऊद्या बोलावते ,
त्या निमीत्ताने भेटी होतील , मज्जा येईल ,
तेवढ्यात विमल बाई कामाला आल्या ,
अरे वा छानच झाल तुम्ही आल्यात लवकर ,
हसून भार्गवी म्हणाली ,
कशी नाही येणार ! तुम्ही बोलावल्यावर !
ही विमल बाई म्हणजे तिच्या आईकडे आधी पासून घर काम करायची , भार्गवीच्या आईचे विमल बाईशी छान पटायचे , बाईला भार्गवी तर आपली जवळचीच वाटायची , ती आई प्रमाणेच विमल बाईला नेहमीच अडीअडचणीत मदत करायची , म्हणूनच विमल बाई तिच्याशी मोकळे पणाने बोलायची , कॅन्सर ने आई गेल्यावर जवळची म्हणजे विमलच होती , तिच्यासाठी ! भार्गवीचेही वडील ती लहान असतानाच वारले होते , हे राहते घर भार्गवीचे वडीलो पार्जीत होते , ती एकुलती एक वारस असल्यामुळे , लग्नानंतर अवी तिथेच राहायला आला , त्याच जुन्या घराला त्यांनी काही सुधारणा करुन नवीन सुंदर बंगल्यात परावर्तीत केले , अवी रायगड हून पाच वर्षांपुर्वीच बदली घेऊन मायानगरीत आला , आणी आता त्याचा संसार सुरळीत सुरु होता , भार्गवी सारखी सुशील , शांत मुलगी त्याला बायको म्हणून लाभली होती , ती अवी सकट त्याच्या आईचीही देखभाल करायची चांगल्या तर्हेने एवढेच काय सुशीला बाईंची सुद्धा काळजी घ्यायची ती ,
बर , सांगा ताई काय करायच आता ,
आधी नेहमीचे काम तर करायचेच आहेत ,
त्याचबरोबर आताच तुम्ही सगळी जळमट काढायची ,
पंखे स्वच्छ करा , हे शो पीस वगैरे पुसून घ्या !
बरं ठिक आहे , तो फोटो पुसायचा का ?
क्रमशः