तशी भार्गवी म्हणाली , माझ्यासोबत बोलायला वेळ नाही अवीला पण न चुकता मावशीची भेट घेतो , काळजी करतो तिची , हो,,,हे काय गं तुझ्या नशीबात ,
तू ना खुपच शांत आहेस , काही बोलत नाही ह्यांना म्हणून तर त्यांची चुक त्यांना कळत नाही ,
बोलून काय करते गं , एक आई होती मला , ती ही तीन वर्षां पुर्वी वारली , आता हेच आहेत माझ्या साठी , रागावून कुठे जाते सांग बरं , दुःखी अंतकरणाने भार्गवी म्हणाली ,
हो पण वाईटच गं , सगळ ऐश्वर्य असून ही नवराच जर जीवाभावाचा नाहीये तर काय फायदा ? विभा हळहळत म्हणाली , बर तू एकदा अवी सोबत स्वतःहून बोल बर ह्या विषयावर ,
अगं विभा काय बोलू ग त्याला , मी कपडे म्हंटले की कपडे घेऊन देतो , वाढदिवसाला एखादा दागीना आणतो , वर्षातून एकदा सगळ्यांना आम्हाला फिरायला नेतो , घरात मी जे म्हणेल तेच होतं , मग काय बोलू त्याला ? हा फोटो का लावला ? मावशीला भेटू नको ? एवढी कोत्या मनाची बनू का त्याच्या नजरेत ? थोडी रागानेच भार्गवी बोलली ,
तश्या थोड्या चपापून चौघी एकमेकींकडे बघायला लागल्या , बरं मग मला सांग हा तर लतिकाच्या प्रेमात अजूनही दिसतो , मग अंजली कुठून आली ? विभा खट्याळपणे तिला कोपराने ढुशी देत म्हणाली , तशी रडता रडता थोडी हसूनच भार्गवी म्हणाली ,
वो अंदर की बात है , मै क्यो बताऊ ?
बरं आता रडू नको आणि आमच्या कडून साॅरी ,
ह्या नंतर आम्ही ह्या विषयावर काहीच बोलणार नाही ,
हो ना मैत्रिणींनों ! yess म्हणत सगळ्यांनी तिला झप्पी दिली , बर चला मुलांना जेवणाच विचारु आणि चपात्या , पुर्या राहील्यात त्या करुन घेऊ ,
मग सगळ्या किचनमधे आल्यात , बाई ने हाॅल आवरला होता , टेबल वर प्लेट ठेवतच होत्या बाई ,
आम्ही चपात्या करतो तुम्ही भांडी घासा आता ,
ढिग पडला आहे बाई , विमल बाई हो म्हणून भांडी घासायला गेल्या , इकडे सुशीलाबाई म्हणाल्या आज मला लतिकाची खुप आठवण येत आहे , अंजली वेगळी दिसते पण , का कोण जाणे , तिला भेटले की लतिकाला भेटल्याचा आभास होतो आणि त्या रडायला लागल्या ,
रमाबाईंच्याही डोळ्यात पाणी आले , सात वर्षे झालेत लतिका जाऊन , पण आजही खरेच माझ्या नजरे समोरुन हलत नाही गं ! माझी ही हालत तर ,
तू तिची आई , तुला किती त्रास होत असेल ! कळत मला , आणी त्यांनी सुशीला बाईला जवळ घेतले ,
अगं भार्गवी आहे ना ! खुप छान सुन आहे गं ,
सगळ कस निमुटपणे करते , खुपच शांत आहे ,
तुला पण खुप जीव लावते , नेहमी आठवण काढते ,
माझ्याही आधी , अवीला तुझ्या भेटी साठी जायला सांगते ,
हो गं माहीत आहे मला , ती पण मला लतिका सारखीच आहे , चल काय आजच्या दिवशी रडगाण घेऊन बसलो ,
बाहेर जाऊ , दोघीही ऊठून बाहेर आल्यात , भार्गवीने रमाबाईना म्हंटले , आई सगळ्यांना जेवायला बोलवा बरं , ताट वाढतच आहे मी , ठिक आहे म्हणत ,आई बाहेर आल्या ,
इकडे अवी , राजेश , सुरेश , प्रदीप आणि अशोक सोबत गप्पा करत होता , राजकारणावर जोरदार बहस सुरु होती त्यांची , तेव्हढ्यात आईने त्यांना म्हंटले चला या जेवायला , ताट वाढलेत , हो हो आई आलोच म्हणत सगळे ऊठून आत आलेत , सुशीला बाईंनी मुलींना पण बोलावले , सगळ्या खेळण सोडून जेवायला आल्या , भार्गवी अंजली कडे बघून म्हणाली , आज एका मुलीच्या आवडीचे पदार्थ बनले आहेत बाबा ! बघा बर काय काय बनवल ते !
बटर पनीर , बटाट्याची सुकी भाजी , छोले , गुलाबजामुन , मठ्ठा , व्हेज पुलाव , पुरी , चपाती , मूग वडे , सलाद , पापड ! वा वा एवढ सगळं , आनंदाने अंजलीने टाळ्या वाजवल्यात , अचानक सुशीलाबाई म्हणाल्या ,
माझ्या लतिकाला हे सगळे पदार्थ खुपच आवडायचे ! सगळ्यांनी चमकुन त्यांच्याकडे बघीतले ,
तशी भार्गवी म्हणाली , हो ना ! म्हणून तर बनवलेत पदार्थ ,
मग सगळेच गुपचुप जेवायला बसलेत , कुणी डायनिंग टेबलवर कुणी खाली , मग हसत बोलत जेवण आटोपले , तेवढ्यात काहीस आठवून अंजलीची मैत्रिण वैभवी म्हणाली , अगं आपण तुझा केक तर कापलाच नाही ,
हो गं वैभवी मला आठवण आहे , पण मी रात्रीच केक कापते , दुपारी नाही आवडत मला केक कापणे ,
मग आम्हाला संध्याकाळीच बोलवायच असतं ना !
वैभवी म्हणाली , हो तुम्ही सगळे थांबा ना संध्याकाळ पर्यंत , केक खाऊनच जा परत , मग सगळे एकसुरात म्हणाले ठिक आहे आज अंजलीच्या मनाने , जाऊ आरामात घरी ,
इकडे अंजलीच्या त्या वाक्याने अवी भूतकाळात हरवला , लतिकाचा वाढदिवस होता , तिला सरप्राईज द्यायच म्हणून अवी केक घेऊन तिला भेटायला गेला आॅफीसमधे ,
तर खुश व्हायच्या ऐवजी ती त्याला रागावली ,
तू आत्ता का घेऊन आलास केक , मला रात्री मेणबत्ती च्या प्रकाशात केक कापायला आवडतो , मी आता केक कापणार नाही , तू असाच घेऊन जा आणि संध्याकाळी घरी ये केक घेऊन , तिने काहीच ऐकुण घेतल नव्हत त्याच ,
शेवटी केक त्याला परत न्यावा लागला होता ,
तिची आठवण येऊन हलकेच हसू ऊमटल त्याच्या ओठांवर .
पुन्हा सगळे गप्पा करत बसलेत ,
तसे अंजली अवी जवळ बसली गप्पा ऐकत ,
तिच्या मैत्रिणिंनी तिला खेळायला विचारले तर ती नाही म्हणाली , दोघीतर जेवल्यावर झोपल्याच , नाईलाजाने मग वैभवी आणि मोयना मोबाईल मधे गेम खेळायला लागल्या ,
क्रमशः