या सर्व गोष्टींचा विचार करत असताना, कविताला आपल्या सुखी संसाराची कहाणी आठवू लागली.
संदीप मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. भाड्याच्या छोट्याश्या घरात कविता सुखाचा संसार करीत होती. पार्थच्या येण्याने संसाराचा आनंद द्विगुणीत झाला होता. कविता हुशार होती आणि महत्त्वाकांक्षीही होती. आपण आपल्या हुशारीचा व गुणांचा काहीतरी चांगला उपयोग करून संसाराला आर्थिक मदत करावी. असे तिला वाटत होते.
तिने लेडीज कपड्यांचे एक छोटेसे दुकान सुरू केले. तिच्या बोलण्याच्या कौशल्याने तिचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैसा मिळू लागला. सुखाची साधने घरात येऊ लागली.
तिने लेडीज कपड्यांचे एक छोटेसे दुकान सुरू केले. तिच्या बोलण्याच्या कौशल्याने तिचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैसा मिळू लागला. सुखाची साधने घरात येऊ लागली.
आपली बायको हुशार व मेहनती आहे. तिने घेतलेला निर्णय खरंच योग्य होता. माझ्या एकट्याच्या पगारावर हे सर्व सुख आपल्याला मिळालेच नसते. असे संदीपला वाटू लागले होते.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे जसा एखाद्या स्त्रीचा हात असतो.
असे म्हणतात.
तसेच इथे कवितासारख्या हुशार पत्नीला पाठिंबा देत संदीप तिला यशस्वी बनवत होता.
असे म्हणतात.
तसेच इथे कवितासारख्या हुशार पत्नीला पाठिंबा देत संदीप तिला यशस्वी बनवत होता.
पैशांची आवक वाढल्याने भाड्याचे घर सोडून ते स्वतःच्या घरात राहायला गेले. स्वतःच्या घराचे सुख काय असते? त्याचा आनंद घेऊ लागले. हळूहळू त्यांचा राहणीमानाचाही दर्जा उंचावू लागला.
कविताला तिच्या व्यवसायाचे चांगले ज्ञान होते आणि पैशांची मिळकत वाढली होती. त्यामुळे एका मोठ्या दुकानात पार्टनरशिप करत व्यवसाय वाढवला. पैशाचा ओघ सारखा वाढतच होता. कविताला आपल्या निर्णयाचा व हुशारीचा अभिमान वाटू लागला व दिवसेंदिवस तो अजून जास्त वाढू लागला. सुखाची अपेक्षा वाढत गेली. आहे त्यात समाधानी न राहता अजून प्रगती करावी, आहे त्यापेक्षा अजून चांगले जीवन जगावे. आपले जीवनमान उंचवावे. असे कविता व संदीप या दोघांना वाटत होते.
संदीप नोकरी सांभाळून व्यवसाय बघत होता.
कविता व संदीप यांना अजून मोठे दुकान घ्यायचे होते. ते इतर मार्गानेही पैसा कसा येईल? यासाठी कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत होते. शक्य होईल तेवढा पैसा कसा मिळवता येईल? हेच त्यांचे आयुष्याचे ध्येय झाले होते.
कविता खूप विचार करत होती.
संदीप नोकरी करून जेवढे पैसे कमवीत नाही, तेवढे आपण व्यवसायात कमवतो आहोत. आता संदीपने पूर्ण वेळ व्यवसायात लक्ष घातले तर आपला व्यवसाय वाढेल आणि म्हणून तिने संदीपला नोकरी सोडण्याचा निर्णय सांगितला. व्यवसायातून येणारा पैशाचा ओघ, आपली होणारी आर्थिक प्रगती आणि मिळणारे सुख हे सर्व पाहून अधिक सुखाच्या अपेक्षांनी संदीपने आपली नोकरी सोडली व पूर्ण वेळ व्यवसायात लक्ष देऊ लागला.
क्रमशः
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा