विषय: सुख म्हणजे नक्की काय असतं... ( स्पर्धा )
"तुझे ऐकले नसते तर बरे झाले असते. निदान आज माझी नोकरी तरी राहिली असती."
संदीप आपल्या बायकोला कविताला रागाने व जोराने ओरडून बोलत होता.
"मी चांगल्यासाठीच सांगितले होते ना? आजपर्यंतचे माझे निर्णय कधी चुकीचे ठरले आहे का? मी घेतलेल्या निर्णयांमुळे आपले चांगलेच होत गेले ना? तुम्हांलाही माझे निर्णय प्रत्येक वेळी चांगले वाटले. तुम्हांलाही ते पटत गेले म्हणून तर तुम्ही होकार देत गेले. तुम्ही कधी विरोध केलाच नाही."
कविताही जरा रागातच संदीपला म्हणाली.
" हो, आता कळते आहे की, मी खूप मोठी चूक करत होतो. पहिल्यांदाच तुझे ऐकले नसते तर पुढे एवढे मोठे निर्णय घेण्याची तुझी हिम्मत झाली नसती आणि मी पण तुझ्या निर्णयाला संमती दिली नसती. म्हणजे आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती."
संदीप अगदी वैतागून बोलत होता.
"तुमचं हे बरं आहे. जेव्हा माझ्या सांगितल्यामुळे, माझ्या निर्णयांमुळे चांगले झाले तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. प्रत्येक सुखाचा उपभोग घेतला. तेव्हा तुम्हांला सर्व चांगले वाटत होते. आणि आता तुम्ही मला दोष देत आहात? मी चूक केली असे तुम्हांला वाटत असेल तर तुम्हीही तुमची चूक मान्य करा."
कविताही संदीपला तितक्याच रागाने बोलत होती.
पुढे काहीही न बोलता,
संदीप रागानेच बेडरूममध्ये गेला व त्याने दरवाजा आतून लावून घेतला.
कविताही रागातच घरातून निघाली व घराजवळच्या बागेत एका बेंचवर जाऊन बसली. तिच्या मनात खूप सारे विचार व टेन्शन होते. त्या विचारात ती बेंचवर बसलेली होती. तेवढ्यात वाऱ्याची एक मंद झुळूक तिला स्पर्शून गेली. त्या स्पर्शाने तिला खूप बरे वाटले.
गर्मीमुळे तापलेल्या शरीराला व रागाने तप्त असलेल्या मनाला ती वाऱ्याची झुळूक थोडासा गारवा देऊन गेली. थोडा क्षण का असेना, कविताला बरे वाटले.
एक वेगळाच आनंद... एक वेगळंच सुख तिला मिळालं होतं. या सुखासाठी तर तिने काही कष्टही घेतले नव्हते. तरीही तिला हे सुख मिळाले होते.
'सुख म्हणजे नक्की काय असतं...'
गर्मीमुळे तापलेल्या शरीराला व रागाने तप्त असलेल्या मनाला ती वाऱ्याची झुळूक थोडासा गारवा देऊन गेली. थोडा क्षण का असेना, कविताला बरे वाटले.
एक वेगळाच आनंद... एक वेगळंच सुख तिला मिळालं होतं. या सुखासाठी तर तिने काही कष्टही घेतले नव्हते. तरीही तिला हे सुख मिळाले होते.
'सुख म्हणजे नक्की काय असतं...'
याचा थोडासा अनुभव कविता अनुभवत होती.
'आपल्याला निसर्ग, झाडे, वेली, निळे आकाश...हे सर्व किती आवडायचे! लग्नाच्या अगोदर या सर्व गोष्टींचा आपण किती मनसोक्त आनंद घेत होतो! छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधत होतो. आणि आता कुठे गेले ते सुख? कुठे गेला तो आनंद?'
कविता मनाशीच विचार करत बसली होती.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा