Login

सुख म्हणजे नक्की काय असतं ?(भाग ५)

सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुरेश रात्री कामावरून घरी आल्यानंतर. सुमनची बडबड सुरू होते. घरची काम करा बाहेरची कामे करा त्यापेक्षा गावाकडचे जीवन बरे होते.
खाण्यापिण्याची मुबलक सोय होती कोणत्याही गोष्टीसाठी कधीच तडजोड करावी लागली नाही.
इथे आल्यापासून मला प्रत्येक गोष्टीसाठी तडजोड करावी लागली आहे. ज्या सुखाच्या शोधात मी गावाहून मुंबईला आले ते सुख मला मुंबईमध्ये सापडलेच नाही.
मुंबईत आल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये बचत करा.
काटकसर करून आयुष्य जगा.
अशा जगण्याचा मला कंटाळा आलाय.
सुमनची बडबड ऐकून सुरेश सुमनला बोलतो.
सुमन आता तुझा आवाज बंद कर मुंबईला यायची इच्छा फक्त तुझी होती माझी नाही तुला सुखी जीवन जगायचे होते. मग तू आता कशाला बडबड करते. तू गावाला सुद्धा समाधानी नव्हतीस आणि तू आता इथेही समाधानी नाहीस.
सुमन, सुरेश माझं चुकलं आपण पुन्हा गावाला जाऊया?
मला आता समजलं गावी राहण्यातच खरं सुख आहे.

एवढा महिना झाला की आपण पुन्हा गावी जाऊ. सुरेश
आता सुमनला गावाकडची ओढ लागते.
गावी जाऊ कधी सर्वांना भेटते असे तिच्या मनी वाटू लागते.
संध्याकाळी ती आबांना फोन करते.
हॅलो आबा...
हा बोल सुमन बाळा काय म्हणतेस. मुंबईत सुखी आहेस ना?
सुमन, सुख म्हणजे नक्की काय असतं?
आबा,अगं बाळा सुख म्हणजे आपल्याला देवाने ज्या परिस्थिती ठेवले आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे यातच खरे सुख असते.
सुमन, पण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्याजवळ पैसा देखील असावा लागतो तोच नसेल तर आपण परिस्थितीशी कसे जुळवून घेणार.
आबा, पण तू गावाला होतीस त्यावेळी तुमच्याकडे मुबलक पैसा होता पण तुला गावाकडच्या परिस्थितीशी जुळवून घेताच आले नाही.
शहरात राहण्याचे वेड तुला लागले होते. शहरात राहायचे म्हणजे काटकसर आणि बचत करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
होय आबा माझे चुकले.
आबा मी पुढच्या महिन्यामध्ये गावी यायचा निर्णय घेतला आहे.

अरे वा! खूप छान बातमी दिलीस.
ही गोष्ट तुझ्या सासूबाईंना सांगितलीस की नाही?
नाही अजून सासूबाईंना फोन नाही केला.
महिन्याभरानंतर सुमन मुंबईहून कायमची गावाला राहण्यासाठी येते. गावाला आल्यानंतर सुमन सर्वांची माफी मागते. आपल्या माणसांमध्ये राहण्यात जे सुख असते ते सुख मुंबईतल्या गर्दीत मिळणं कठीणच.
सुमन बोलते आता मला खरी सुखाची व्याख्या कळाली आहे......
सुख असतं गावच्या मातीमध्ये
सुख असतं खळखळत्या नदीमध्ये
सुख असतं हंबरणाऱ्या गायीमध्ये
सुख असतं मोकळ्या हवेमध्ये
सुख असतं, हिरव्या माळरानामध्ये
सुख असतं आपल्या माणसांमध्ये
सुख असतं परिस्थितीशी जुळून घेण्यामध्ये....
आता कोणीही विचारू नका सुख म्हणजे नक्की काय असतं?