Login

सुख म्हणजे नक्की काय असतं...( भाग १)

सुख म्हणजे नक्की काय असतं?
"माझं मेलीच नशीबचं फुटक , आयुष्यात कधी माझ्या वाट्याला सुख येणार आहे की नाही काय माहिती?"सुमन शेतातली काम करत बडबडत होती.
वडिलांच्या घरी असताना मी आयुष्यात कधी शेतात पाय ठेवला नाही आणि आता मला दिवसभर शेतामध्ये राबाव लागत. सुमन भुईमूग उपटत उपटत सुरेशला बोलत होती.
सुरेश अग रोज तू मला  हेच बोलून दाखवणार आहेस का ?
सुमन रागातच बोलते हो . तुम्ही मुंबईची नोकरी सोडली नसती तर आपण मुंबईमध्ये आरामामध्ये जीवन जगलो असतो. आपलं लग्न झालं आणि तुम्ही शेती करण्याचा निर्णय घेतला. तिकडे सविता बघा, माझी बहीण मुंबईमध्ये कशी मस्त जीवन जगते . रोज नवीन कपडे घालून किती छान छान फोटो मोबाईल वरती टाकत असते आणि मी मात्र इथे शेतात राब राब राबते.
सुरेश , तुला किती वेळा सांगितलं आहे.कधी आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्या सोबत करायची नाही  आणि प्रश्न राहिला फोटोचा तर फोटोमध्ये आनंद दिसणारे सर्वच माणसं ही सुखी असतातच असे नाही.
सुमन तुम्ही काय माझ्या ऐकणार नाही तुम्ही शेवटी तुमच खरं करणार . सुमन रागानेच बोलते
शेतातील कामाची आवरा आवर करून सुमन आणि सुरेश दोघेही घराकडे जाण्यासाठी निघतात.
शेतातील कामे करून ती खूप थकून गेलेली असते. तरीसुद्धा घरी आल्यानंतर तिला पुन्हा सर्वांसाठी स्वयंपाक करणे भागच असते सर्व स्वयंपाकाआवरून भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ती आपल्या वडिलांना फोन करते...
हॅलो आबा...
मी उद्या माहेरी येणार आहे.
आबा म्हणतात हो चालेल की ये.
सुरेशला सुमन बोलते अहो मी उद्या माहेरी जाणार आहे.
अग पण शेतातली कामं अजून बाकी आहेत.
सुमन बोलते शेतातलं आणि घरच करून मी आता थकले आहे. काहीही झालं तरी मी माहेरी जाणार....
अखेर सुमन माहेरी निघून जाते.
सुमन माहेरी गेल्यामुळे मात्र घरातील सर्वांची तारांबळ उडते.
सुरेश, सुमन ला फोन करतो.
सुमन ,फोन उचलते
सुरेश बोलतो  कधी परत येणार आहेस.
सुमन बोलते मी आता परत येणार नाही जोपर्यंत तुम्ही मुंबईला नोकरी शोधत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही
सुरेश, काय हा वेडेपणा लावला आहे.
सुमन, तुम्ही वेडेपणा म्हणा नाहीतर काहीही..... मी येणार नाही म्हणजे नाही. मलाही सुखी जीवन जगायचं आहे.
सुरेश बोलतो कोणी सांगितलं तुला शहरात राहणारे माणसं सुखी असतात म्हणून.....
"शहरात राहणारी माणसं सुखी असतात की नसतात हे मला शहरात गेल्यानंतरच कळेल" म्हणून तुम्ही मुंबईमध्ये नोकरी शोधा एवढं बोलून सुमन फोन ठेवते.
सुरेश ला मात्र काय करावे काहीच सुचत नाही...