पहिल्या भागाचा सारांश: राघवला त्याचे नातेवाईक शोधायचे असतात, त्यासाठी तो त्याच्या बाबांची मदत घेतो पण बाबांनाही त्यांच्या भाऊ बहिणी कुठे आहेत याची कल्पना नसते. राघव सोशल मीडियाची मदत घ्यायची ठरवतो.
राघव एक कागद आणि पेन घेतो, त्यावर त्याच्या परिवाराची ट्री डायग्राम काढतो. सर्वात वरती त्याचे आजोबा म्हणजेच विनायक देशमुख आणि आजी मंदा देशमुख असे लिहितो, त्याखाली त्याचे बाबा आनंद देशमुख व आई सरिता देशमुख असे लिहितो आणि त्याखाली स्वतःचे राघव देशमुख हे नाव लिहितो.
बाबा--- राघव तु हे काय काढत आहेस?
राघव--- बाबा ही देशमुख परिवाराची ट्री डायग्राम आहे, आता मला तुम्ही तुमच्या भावंडांची नावे सांगा.
बाबा--- माझ्या भावांची नावे राजेंद्र व संजय आणि बहिणी सुशीला व सुजाता.
राघव--- तुमच्यानंतर राजेंद्र देशमुख, संजय देशमुख, सुशीला देशमुख आणि सुजाता देशमुख असच ना.
बाबा--- हो बरोबर
राघव--- आता बघा, बाबा आत्त्यांची लग्नानंतर नावे बदलली असतील तर त्यांना शोधणे कठीण जाईल पण राजेंद्र व संजय काका जर सोशल मीडियावर असतील तर ते सापडतील.
बाबा--- राघव सहजासहजी सापडत असतील तर बघ नाहीतर जाऊदेत, जे ते आपल्या घरी सुखी असतील म्हणजे झालं.
राघव--- नाही बाबा, काही झालं तरी मला आपल्या देशमुख परिवाराची ट्री डायग्राम पूर्ण करायची आहे. लॉकडाउन मध्ये मला माझे नातेवाईक सापडले तर माझी सुट्टी कुठे तरी मार्गी लागली असे म्हणता येईल. आपली एवढी मोठी फॅमिली असून आपण असे एकटे असल्यासारखे जगत आहोत. मला चुलत बहीण भाऊही असतील, मला त्यांना एकदातरी भेटायचं आहे.
आई--- अहो तुम्हाला माहीतच आहे ना, आपला राघव लहानपणापासून किती शोधक वृत्तीचा आहे, काही झालं तरी तो सर्वांचा शोध लावेल, त्याला त्याचे प्रयत्न करू देत.
बाबा--- अगं मी कुठे नाही म्हणतोय, माझे बहीण भाऊ सापडले तर मलाही आनंदच होईल.
राघव--- बाबा तुमच्याकडे त्यांचे फोटो आहेत का?
बाबा--- राघव माझ्याकडे त्यांचे फोटो कसे असणार? आम्ही लहानपणी फोटो काढले होते पण ते घरी असतील.
राघव--- बाबा मग सोशल मीडियावर त्यांना शोधणं कठीण आहे, कारण त्यांच्या नावाचे एकसारखे खूप अकाउंट्स असतील आपण कसे शोधायच की हे तेच आहेत म्हणून, एकतर आपल्याकडे त्यांचे फोटो नाहीत, त्यांच शिक्षण माहीत नाही किंवा त्यांच गावही माहीत नाही.
आई--- तुझ्या बाबांसारखे दिसत असतील.
बाबा--- नाही रे, आम्ही सगळे वेगवेगळे दिसायला होतो, तुझ्या आईच काहीच ऐकू नको.
राघव---आई बाबा मीच आता काहीतरी करतो , तुम्ही तुमच्या गप्पा चालू ठेवा.
राघव त्याच्या रुम मध्ये जाऊन बसतो, लॅपटॉप वर तो सगळ्यांचे नाव टाकतो पण त्याला कोणीच सापडत नाही, खूप वेळ डोकं लावून सुद्धा त्याला कोणाचाच शोध लागत नाही. राघव हताश होऊन हॉल मध्ये येऊन बसतो, राघवची आई किचन मध्ये स्वयंपाक करत असते.
राघव--- आई मला एक कप कॉफी मिळेल का?
आई--- हो देते ना, काय झालं, कोणाचा शोध लागला की नाही?
राघव--- नाही ना, सोशल मीडियावर काहीच शोध लागत नाहीये, काहीच कॉमन लिंक सापडत नाहीये.
आई--- अरे तुझ्या बाबांचीच भावंड, त्यांच्या सारखीच असणार, त्यांना कुठे सोशल मीडिया आवडते, ते आपले पुस्तकात रममाण झालेले असतात.
राघव--- हो ते आहेच, एकतर त्यांच्या मुलांची नावे पण माहीत नाही, ते नक्कीच सोशल मीडियावर असणार.
आई--- आता पुढे काय करायचं ठरवलं आहे.
राघव--- बघू, लॉक डाउन उठेपर्यंत काहीच शोध नाही लागला तर गावी जाऊन बघावं लागेल.
आई--- नाराज नको होऊस, नक्कीच काही तरी मार्ग सापडेल.
राघवच्या डोक्यात मात्र टिकटिक चालूच असते की आता सर्वांना शोधायच तरी कसं? राघव पूर्ण सोशल मीडिया पालथी घालतो पण त्याला कोणाचाच शोध लागत नाही. राघवच्या डोक्यात अचानक एक कल्पना सुचते, राघव देव्हाऱ्यात असलेली गणपतीची मूर्ती घेतो तिला सर्व बाजूने न्याहाळत बसतो पण त्या मूर्तीवर त्याला काहीच clue सापडत नाही. राघव त्या मूर्तीचा फोटो काढत असतो तेवढ्यात त्याला त्याचा मित्र अमोल चा फोन येतो,
अमोल--- हॅलो राघव, कसा आहेस?
राघव--- मी मजेत, तु काय म्हणतोस?
अमोल--- तुला तर काय आमची आठवण येत नाही, म्हटलं चला आपणच फोन करावा.
राघव--- घरी बसून जाम बोअर झालंय.
अमोल--- अरे मी तर इकडे गावाला अडकलोय, एका नातेवाईकाच्या लग्नाला आलो होतो आणि लॉक डाउन झाला, मग काय इकडेच रहावं लागलं, गावाकडच आयुष्य अनुभवतो आहे, आम्ही सगळे भावंड एकत्र आहोत म्हणून बोअर नाही होत.
राघव--- मज्जा आहे बाबा तुझी, मी माझ्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करतोय पण तेही सापडत नाहीये.
अमोल--- म्हणजे मला समजलं नाही
राघव अमोलला सर्व इतंभूत कहाणी सांगतो.
अमोल--- तुला खात्री आहे का की तुझ्या बाबांकडे जो गणपती आहे तसाच गणपती त्यांच्या सर्व भावंडांकडे असेल.
राघव--- असू शकेल, बाबा म्हणतायेत की त्यांच्या बाबांनी सर्व भावंडांना एकसारखे गणपती दिले होते आणि ते शेवटपर्यंत जपून ठेवायला लावले होते.
अमोल--- अरे मग एक काम कर, त्या गणपतीच्या मूर्तीचा एक फोटो काढ आणि सोशल मीडियावर टाक, तुझे आत्या, काका जरी सोशल मीडियावर नसतील तरी त्यांची मुले असतीलच ना, त्यांच्या घरात तशीच गणपतीची मूर्ती असेल तर ते तुला संपर्क साधतील.
राघव--- तुझी आयडिया छान आहे पण तश्याच डिजाईन च्या गणपतीच्या मुर्त्या बाजारात आलेल्या असतील तर त्या भरपूर जणांकडे असतील मग काय करायच आणि शिवाय तुला माहीतच आहे की सोशल मीडिया जेवढी चांगली तेवढीच वाईट पण आहे, सोशल मीडियावर खूप सारे फेक अकाउंट्स असतात मग आपण कसं ओळखायचे, कोण खरे आहे नी कोण खोटे?
अमोल--- तुझ्या बाबांनी तुला गणपती सोबत काही टॅग लाईन सांगितली होती ना
राघव--- हो,ही गणपतीची मूर्ती म्हणजे हेच तुझं अस्तित्व आहे, तुझा उगम आहे.
अमोल--- सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना ही टॅग लाईन टाक, ज्यांना ती ओळखीची वाटतेय ते तुला संपर्क करतील.
राघव--- अमोल तु खरच खूप स्मार्ट आहेस, मी असच करतो.
अमोल--- काही रिप्लाय आल्यावर मला कळवं
राघव--- हो नक्कीच
अमोलशी बोलून झाल्यावर राघव गणपतीच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर टाकतो आणि खाली कॅपशन लिहितो, "गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व आहे, तुझा उगम आहे"
राघव त्याच्या आईला व बाबांना त्याने काय केलंय याची कल्पना देतो.
आई--- राघव तो गणपती बाप्पाच तुझ्या प्रयत्नांना यश देईल. आपल्याला नक्की कोणी तरी सापडेल.
राघव--- हो ना आई, यातून एक जण जरी सापडला ना तर बाकीचेही आपोआप सापडतील. गणपती बाप्पा तूच काहीतरी कृपा कर.
©®Dr Supriya Dighe