शमिकाच्या बाबांचा उतरलेला चेहरा पाहून शमिकाची आई आणि शमिका दोघीही चिंतीत झाल्या. शमिका सुद्धा मनातल्या मनात विचार करू लागली की , बाबांचे मित्र बरे असतील ना?
त्यांना काही झालं तर नसेल ना? असे अनेक नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये डोकावू लागली.
शमिकाची आई त्यांच्या बाजूला जाऊन बसली.
कपाळावर आलेला घाम पुसतच बाबा शमिकाला आणि तिच्या आईला म्हणाले तुम्ही दोघी जेवलात का? शमिकाची आई म्हणाली हो आम्ही दोघीही जेवलो. तुम्ही दोन घास खाऊन घ्या.
शमिकाचे बाबा म्हणाले "हो जातो थोड्यावेळाने . मला जरा पाच मिनिटं बसू दे सकाळपासून फक्त धावपळ होत होती."
"नक्की तुम्ही कोठे गेला होता? आणि कोणाची तब्येत बरी नव्हती ?
कातर झाला होता .बाबा म्हणाले "अगं तुला माहित आहे तो माझा शाळेतला मित्र सदा?"
बाबा म्हणाले " गेल्या महिन्यात त्याने मला फोन केला होता. किती वर्षानंतर त्याचा फोन आला होता.मी खूष झालो ;पण फोन केल्या केल्या तो खूप रडायला लागला . मी त्याला भेटायला गेलो. त्याला विचारले असता त्याने मला सांगितले " मित्रा इतके कष्ट करून ,मेहनत करून ,शेवटी आयुष्यात समाधानच नाही. त्याच्या अशा बोलण्यावर मी त्याला विचारले नक्की तुला काय झाले आहे? तुला काही प्रॉब्लेम आहे का तू असा का बोलतो आहेस?
तिने चिट्ठीत लिहिले होते."मी मनाने लग्न करते आहे..मला शोधण्याचा प्रयत्न करू नका
हे ऐकताच मलाही फारच आश्चर्य वाटलं कारण की ती असं कधी करेल असं वाटलं नव्हते . सदा पुढे बोलू लागला . एकच प्रश्न मनात येतो की, तिला मी काय कमी केलं ? माझ्याकडून सर्व सुखसोई दिल्या, शिक्षण दिलं , स्वतःच्या पायावर मी तिला उभं केलं. मग तिने असं का करावं ? जन्मदात्याना असे दिवस दाखवायची तिला गरजच काय पडली? तिने जे पण केलं ते फार चुकीचं केलं. जेव्हापासून ती गेली आहे, मन खूप अस्वस्थ झालं आहे बेचैन वाटतं. एकही दिवस असा जात नाही की दुःख होत नाही. माझ्या बायकोने तिच्यासाठी स्वतःची नोकरी सोडली . तिच्याकडे सर्व परीने लक्ष दिलं. मग का तिने असं करावं? घरच्यांचा जराही विचार करू नये का? मुलगी जरी असली तरी; पण मी तिला कधी बंधनात ठेवलं नाही. इतकी मोकळीक देऊन मग आमचा विश्वासघात केला तिने?"
सगळं बोलणं ऐकून मी सुद्धा अचंबित झालो होतो . मलाही तो धक्काच होता. सदा खूप रडत होता. अगदी लहान मुलाप्रमाणे तो रडत होता. फार वाईट वाटत होते आणि सकाळीच सदाच्या बायकोचा मला फोन आला आणि त्यांनी मला दवाखान्यात बोलावले तिथे गेलो त्याच्या नंतर कळले की, त्याला मायनर अटेक आलेला आहे आणि मी पुरता गोंधळून गेलो .सतत हसमुख असणारा माझा मित्र सदा आज त्याच्यावरती, त्याच्या मुलीमुळे ही वेळ आली . खरंच फार वाईट वाटत आहे.
आई म्हणाली :"आता कसे आहेत सदा भाऊजी"
बाबा म्हणाले " डॉक्टर म्हणाले , आम्ही ट्रीटमेंट करू थोड्या दिवसात डिस्चार्ज देऊ .
" बरं झालं ते सुखरूप आहेत"
शामिकाचे वडील म्हणाले "तुला माहित आहे का? आजही सदा मला पकडून किती रडला.मी सदाला ह्या अवस्थेत कधीच पाहिले नाही. नेहमीच हसतमुख असणाऱ्या सदाला आज ज्या अवस्थेत पाहिलं आणि माझेही हात पाय पार गळून गेले .
शमिकाचे बाबा म्हणाले
"मी सदाला सांगितलं ,आता जे झालं ते विसरून पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझी बायको ,तुम्ही एकमेकांना साथ देऊन रहा."
"खूप कठीण आहे हे सर्व आम्हा दोघांसाठी, तुला माहित आहे गणेश मी चांगला मुलगा बघून लग्न जमवलं होतं .तेव्हासुद्धा एका शब्दाने काहीही म्हणाली नाही. लग्नाची सगळी तयारी केली होती. पंधरा दिवसावर लग्न येऊन ठेपले होते, ज्या घरातून मुलीची मी पाठवणी करणार होतो, किती आम्ही स्वप्न पाहिली होती; पण अचानकपणे काही असे करेल वाटलंच नव्हते. इतकं सगळं होऊन आता विश्वासच उडाला.
माझी काय चुक झाली गणेश? वडील म्हणून मी माझी सर्व जबाबदारी पार पाडली? तिला चांगलं शिक्षण दिलं. तिला स्वतःच्या पायावर उभी केलं. तिच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या. तिला काय हवं नको ते पाहिलं. ती मुलगी म्हणून कधीच कोणतीही बंधनं लादली नाही. नेहमी तिला चांगले संस्कार दिले; मग कुठे माझं चुकलं?
बरं तिला लग्नच नव्हतं करायचं तर मग ती मला स्पष्टपणे बोलली का नाही? जर तिच्यामध्ये पळून जाण्यासाठी धाडस आहे तर मग आई-वडिलांशी बोलण्याचं धाडस का नाही ?का तिने असं करावं? तिला जराही वाटू नये की, मी हे पाऊल उचललं तर माझ्या आई-वडिलांचे काय होईल? एकदाही तिने विचार केला नसेल का? आम्ही दिलेलं प्रेम हे प्रेम नव्हतच का? म्हणजे तिच्या आयुष्यात आमचं स्थान काहीच नव्हतं? जिच्यासाठी आम्ही आमच्या अनेक स्वप्नांना कडेलोट केले, त्या गोष्टीचे काहीच तिला वाटलं नाही का? मी कोणाकडे जाऊ या प्रश्नाचे उत्तर मागायला? ती कुठे गेली ? काय करत असेल ह्याची मला जरा पण कल्पना नाहीये. आई-वडील म्हणून आम्हाला फार त्रास झाला,रागही आला आहे; पण आता या रागाची जागा चिंतेने घेतली आहे. तिची फार काळजी वाटते.
इतकं सगळं होऊन असं वाटतं की, तिने ज्या मुलाला निवडलं असेल त्याने तिला व्यवस्थित ठेवावे. "
शामिकाचे वडील तिच्या आईला जेही सांगत होते ते ऐकून शमिकाची आईसुद्धा बैचेन होत होती.
"सदाने माझा हात पकडला आणि अगदी व्याकुळ होऊन पुन्हा तोच प्रश्न विचारू लागला"
सदा म्हणाला "गणेश मूल असं का करतात?
किती छान स्वागत केलं होतं मी माझ्या मुलीचे. ती आली आणि आमच्या घरामध्ये भरभराट झाली. मुलीला लक्ष्मीचं रूप मानतात आणि खरंच तिचे पहिलं पाऊल खूप काही देऊन गेलं; पण कधी असं वाटलं नव्हते तिची पाऊलं ह्या दिशेने जातील.
प्रेमापोटी जर हे तिने पाऊल उचललं तर मग त्या प्रेमाचं काय तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच दिलं? एकदाही विचार करू नये? शमिका स्वतःच्या रूममध्ये निघून गेली.
वडील म्हणाले
शमिका सुद्धा रूम वर जाऊन बसली तिने पुन्हा देवाकडे हात जोडले आणि म्हणाली " देवा तू सदा काकांचा जीव वाचवला, त्यासाठी आभार. आता तू त्यांना आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती दे .
शमिकाला त्यादिवशी नीट झोप लागली नाही..
शमीकाने त्यादिवशी एक शपथच घेतली.
पुढच्याला ठेच मागचा शहाणा.
सदा काकांची अगतिकता पाहून ती अस्वस्थ झाली होती.आपलं चुकीचे पाऊल आई वडिलांना किती अस्वस्थ करतं, किती त्रास देते हे ती समजून चुकली होती.तिचे आई बाबा तिच्यासाठी खूप प्रिय होते म्हणून तर तिने स्वतःच्या मनाला आताच ठणकावून सांगितले होते. पुढे काहीही झाले तरी आई बाबांना वाईट वाटेल असे कधीच वागणार नाही.
क्रमश.