शक्ती -11

ajay is near to solve case ...one person who is arrested gives many details and now aAay wants to see Vijay son of Sarpanch ......

https://irablogging.com/blog/shakti--10

दुसऱ्या दिवशी सकाळी अजय पोलीस स्टेशनला पोहचला . त्याने पकडून आणलेल्या माणसाला बघितले आणि त्याला चौकशी साठी उभं केलं 

"काय रे, नाव काय तुझं ?"-अजय 

"साहेब , मी रमाकांत ...."-तो माणूस 

"कधी पासून ह्या धंधा चालवतो ."-अजय 

"नाही साहेब, मी कोणताही  धंदा चालवत नाही ....ह्या साहेबाना मी आधीच सांगितलं कि जो तुम्ही म्हणताय तो धंदा मी चालवत नाही .."-रमाकांत 

"असं ,मग तू इथे ह्या गावात त्या बंगल्यात काय करत होतास ?"-अजय 

"साहेब, मी ह्या गावात पहिल्यांदाच आलोय ..माळ काही माहित नाही .."-रमाकांत 

अजय सबनीस ला बाजूला घेऊन विचारतात ,सबनीस हा तोच माणूस आहे जो संजू ने सांगितलं आहे ..

"हो साहेब, मी संजू ला पण बोलावले आहे येईलच तो इतक्यात .."-सबनीस 

"ठीक आहे तर मग तो येऊन गेल्यावरच ह्याला बोलता करू .."-अजय 

संजू तिथे येतो ..रमाकांत ची  ओळख परेड होते ..त्याला ओळखला  जात ..रमाकांत संजू कडे नीट बघत नाही .नजर खाली घालून उभा असतो ."साहेब हाच तो मला ह्याला पहिल्यासारखा वाटतंय .."-संजू 

"ठीक आहे ,तू जाऊ शकतोस .... गरज लागली तर पुन्हा बोलावू .."-अजय .

संजू निघून जातो आणि अजय आता रमाकांत कडे वळतो . "काय मग ,त्याला ओळखलं का ?"-अजय 

"नाही साहेब ,"-रमाकांत 

अजय त्याला एक बुक्की मारतो .  दोन तीन चपराक कानाखाली लागवतो .मग परत विचारतो "आता ओळखलं का ?"-अजय 

"साहेब ,मारू  नका ,सांगतो ...त्याला मी ओळखतो .एकदा दिसला होता कुठेतरी पण आठवत नाही आता ."-रमाकांत 

"असं ,आता आठवेल तुला ..सबनीस ह्याला घ्या रिमांड रूम मध्ये .."-अजय .अजय तिथून बाहेर जातो .

"नाही साहेब नको ...मी सांगितले ना ...मला नाही माहित .."-रमाकांत ओरडतो .

"तू सगळं सांग नाही तर आज काही खरं  नाही तुझं ...त्या मुलींना कुठे विकलं ?कधीपासून हा धंदा सुरु केलाय तुम्ही ?"-सबनीस 

"सांगतो साहेब,सगळं सांगतो .."-रमाकांत .अजय पण  येतो .

"खरं म्हणजे मी हे सगळं करत नाही ...मी फक्त गरीब मुली ,भिकाऱ्या मुली ह्यांच्यावर नजर ठेवून असतो ...कोणी दिसली तर आमच्या लीडर ला सांगतो ...पुढचं मग तेच बघतात ..एकदा असाच काही मुलींना आम्ही आणलं ..आणि ह्या गावात  बंद बंगल्यात ठेवलं .त्यातील एक मुलगी एक दोनदा बाहेर पडली आणि त्या मुलाच्या नजरेस पडली ..ती दिसायला सुंदर होती . आम्ही बरेचदा इथे मुली आणायचो ..हा बांगला शापित आहे ,तिथे वाईट शक्ती आहे असं समज इथे पसरला होता म्हणून तिकडे कोणी कधी फिरकालच नाही .पण त्या मुलीमुळे ह्या पोराला जरा कुणकुण लागली .मग तो एकदा तिच्या मागावर आला .आम्ही त्याला बेशुद्ध केलं आणि तिथेच ठेवलं ."-रमाकांत 

"पुढे काय झालं ? ड्रग्स चा पण व्यापार करता का ? तुमचा लीडर कोण आहे ?कुठे आहे ?"-अजय 

"आम्ही ड्रग्स वापरतो मुलींना बेशुद्ध करण्यासाठी , व्यापार नाही करत ... आमचं लीडर मुंबईत असतो ..मोठा व्यापार आहे त्याचा हॉटेलचा त्यातच हा धंदा चालतो ... त्या दिवशी अजूनही काही मुलं आम्हला दिसली होती त्या रस्त्यावर ..आम्हला वाटले कि , आता ह्यांना सगळं कळून चुकेल म्हणून  आम्ही आमची गाडी काढली आणि तिथून निसटलो ..जाताजाता त्या मुलालाही सोबत घेतलं त्याला सोडलं असत तर त्याने सगळ्यांना सांगितलं असता ,आमच्या सोबत असणाऱ्या  एका ला अजून एक गोष्ट  सुचली  किडनी विकण्याचा ,म्हणून त्यानं त्या मुलाला त्याची  किडनी विकण्यासाठी म्हणून सोबत घेतले ... पण रस्त्यात कसा काय कोण जाणे तो निसटून गेला .."-रमाकांत 

"त्या मुली कुठे आहेत ?किती दिवसापासून करताय हा धंदा ?"-अजय 

"साहेब मी ह्यात नवीन आहे ,पण त्या मुलींना एका जागी ठेवण्यात येत नाही ..जोपर्यंत त्यांची किंमत चांगली मिळत नाही तोपर्यंत त्यांना ड्रग्स देऊन सोबत ठेवले जाते .मुंबईत ठेवले जाते ..मग त्यांचा हवा तेवढा वापर झालं कि त्यांना बाजूला केलं जाते ..."रमाकांत .

"ह्याला ओळखतो का ?हा असतो का तुमच्यासोबत  ?"-अजय ने विजय चा फोटो दाखवत विचारले .

"नाही साहेब ,हा आमच्यासोबत नसतो .मी ह्याला पाहिलेलं नाही पण आमच्या सोबत असणाऱ्या एकाने ,म्हणजे नंदू ने ह्या बदल सांगितले होते कि त्यानेच हा बांगला नंदूला दाखवला होता ..ते तिथे एकदा आले होते पण मग नंतर तो मुलगा कधीच तिथे आला नाही आणि भेटला नाही ,तो वेद झालं म्हणे ...शहरात उपचार सुरु आहे त्याच्यावर ..."-रमाकांत 

"कुठे उपचार सुरु आहेत ? नंदू कुठे सापडेल ?"-अजय 

रमाकांत नंदूचा पत्ता देतो . नंदू आणि विजय दोघे एकमेकांना ओळखत असतात .मित्र असतात .नंदू त्यांच्या जवळच्या गावात राहत असतो अशी माहिती रमाकांत कडून समजते .अजय आणि सबनीस  रमाकांतला पकडून पुढची  कारवाई करतात.अजय आता परत क्रम लावायला सुरवात करतो आणि मग सरपंचांच्या घरी जातो .

"सरपंच आहेत का?"-अजय .तेवढ्यात सरपंच बाहेर येतात .

"काय म्हणता साहेब ,परत इकडची वाट कशी काय चुकली ?"-सरपंच  

"काय करावं ,तुम्ही काही मदत करत नाही मग यावं लागत आम्हाला ...तुमचा मुलगा कसा  आहे ?बरा आहे ना आता  ?"-अजय 

"म्हणजे ,काय झालाय माझ्या मुलाला ?काय म्हणायचंय तुमहाला ?"-सरपंच 

"हे बघा, सरपंच मला हे माहित आहे कि, त्याच्या हातून गुन्हा घडला आहे ..आणि म्हणून तुम्ही त्याला लपवताय ... तुम्ही जर खरं सांगितलं तर मी तुमची मदत करू शकेन नाही तर, मला तुमची मदत करता येणार नाही ..तुम्ही ठरवा काय ते ? एकच सांगतो  मी त्याला पकडून आणलं तर त्याला कोणीही सोडवू शकणार नाही ..त्यामुळे तुम्हीच  त्याला आमच्यासमोर आणा  आणि खरं काय ते सांगा... आणि हो मला माहित आहे कि तुम्ही दिलेला पत्ता खोटा आहे कारण खरा पत्ता  माझ्याकडे आहे ..उद्यापर्यंत जर विजय आला नाही तर मी त्याला पकडून आणेन ..शेवटचं सांगतो .."-अजय 

एवढा बोलून अजय तिथून निघतो .अजय ला थोडीफार माहिती असते पण पूर्ण नसते तो आपला खडा टाकून बघतो आणि त्याचा खडा अचूक लागतो ...सरपंचाने चांगलाच घाम फुटलेलं असतो .. 

(विजय उद्या येईल का? त्याच काय रहस्य आहे ? अजय नंदूला कसा पकडतो ?पाहूया पुढच्या भागात ..)

🎭 Series Post

View all