भाषण क्रमांक 1 दहावीच्या निरोप समारंभाचे भाषण
व्यासपीठावरील आदरणीय मुख्याध्यापक आणि आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्र- मैत्रिणींनो! मी …… तुम्ही सगळे तर मला ओळखताच. हा आपला निरोप समारंभ! पुन्हा आपण कधी असे एकत्र येऊ माहीत नाही. खरं तर आजच्या दिवशी काय बोलावे हा प्रश्नच आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या संमिश्र भावना दाटून येत आहेत. कारण एकीकडे एक नवीन विश्व आपल्याला खुणावत असताना मागे एक सुंदर विश्व सोडून आपण जात आहोत. ही भावना खूप विचित्र आहे. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू अशी परिस्थिती माझी झाली आहे.
शाळा नावाच्या सुंदर वृक्षावरची
आपण सगळे सुंदर पाखरे!
या वृक्षावरून उडून जाताना
मन माझे झाले कावरे बावरे!
आपण सगळे सुंदर पाखरे!
या वृक्षावरून उडून जाताना
मन माझे झाले कावरे बावरे!
अशी काहीशी स्थिती माझी झाली आहे. मला अजून ही आठवतो शाळेचा पहिला दिवस. घर नावाच्या सुरक्षित जगातून मी एका नवीन विश्वात पाऊल ठेवले. सगळे माझ्याच वयाचे आणि सगळ्यांनी भोकाड पसरले होते. मला आईने बाईच्या हवाली केले आणि ती देखील जड पावलांनी घरी निघून गेली. सगळे रडत होते मी मात्र शांत एका कोपऱ्यात बसून होतो. थोडा घाबरलेला आणि बावरलेला मी! कधी मला आपल्या शाळेने आपलेसे केले आणि मी कधी शाळेत रमलो मला देखील कळलं नाही. गेली दहा वर्षे शाळा, शिक्षक, मित्र - मैत्रिणी माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले मला कळलेच नाही. मी पहिल्या इयत्तेपासून इयत्तांची एक एक पायरी चढत गेलो आणि कधी दहावीच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचलो मला ही कळले नाही.
कधी शिक्षकांनी मला रागावले तर आधी प्रेमानी समजावून सांगितले तर आधी कौतुकाची थाप मिळाली. कधी झोकून देऊन अभ्यास केला तर कधी मित्रांबरोबर खोड्या काढल्या. कधी दंगा तर कधी शांतता. इथल्या वर्गांतल्या भिंतींवर, बाकांवर अनेक आठवणी अजून तशाच कोरल्या गेल्या आहेत. इथंच मला जिवलग मित्र मिळाले. इथेच तर माझ्या आयुष्याला वळण लागले. मी इथं कधी हसलो तर कधी रडलो पण सगळं मला हवंहवंस होतं.
नवीन जग मिळणार, नवीन शिकायला मिळणार, नवीन मित्र -मैत्रिणी मिळणार याचा आनंद आहेच पण कुठे तरी आता या सगळ्याची साथ सुटणार याचे दुःख ही आहे! इथं उपस्थित असणारे माझे मित्र- मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या वाटेणे निघून जाणार. कोण कला, शास्त्र तर वाणिज्य शाखा निवडणार! म्हणजेच सगळ्यांची ताटातूट होणार आता आपण पुन्हा कधी असे एकत्र येऊ ते आपल्याला ही माहीत नाही पण तरी आनंद ही आहे कारण आपण सगळेच महाविद्यालय नावाच्या नवीन विश्वात पदार्पण करणार आहोत.
निरोप घेताना भावनांचे तरंग उठती.
सुख-दुःखच्या संमिश्र रंग मनात सजती.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद!
★★★★
भाषण क्रमांक 2 12 वी निरोप समारंभ
जय हिंद!
★★★★
भाषण क्रमांक 2 12 वी निरोप समारंभ
आदरणीय प्राचार्य आणि आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्र- मैत्रिणींनो! मी …… तुम्ही सगळे मला ओळखता. आज आपण इथं निरोप समारंभासाठी जमलो आहोत. खरं तर ही दोन वर्षे कशी पाखरांचे पंख लावून उडून गेली कळलेच नाही. शाळेतून इथं कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला. शाळेपेक्षा इथं खुल वातावरण मिळाले. आपण नवीन विश्वात आलो आहोत आता शाळकरी मुलगा न राहता कॉलेज कुमार झालो आहोत. याचा आनंद तर होताच पण एक भीती आणि हुरहूर देखील होती की आपल्याला हे नवीन जग सामावून घेईल का? आपल्याला इथं नवीन वातावरणात जमवून घेता येईल का? इथं शाळेत होते तसे मित्र मैत्रिणी आणि शिक्षक आपल्याला भेटतील का? मला अजून ही कॉलेजमधला पहिला दिवस आठवतो. त्या दिवशी मी गप्प- गप्प होतो पण मलाच काय पण सगळ्या वर्गातील मुला-मुलींना ओळख परेडच्या निमित्ताने .. …..सरांनी बोलतं केलं आणि सगळ्यांचेच संकोचाचे पाश कळून पडले आणि सगळेच नवीन वातावरणात विरघळून गेले.
आधी वाटणारी भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि इथं पुन्हा नवीन मित्र-मैत्रिणी भेटले. पुन्हा त्यांच्या संगतीने अभ्यास, खोड्या काढणे सुरू झाले. आणि दोन वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही. आता पुन्हा सगळ्यांची ताटातूट होणार प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाणार. कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला इंजिनीअर तर कोणाला वकील आपल्या पैकी प्रत्येक जण आपल्या ध्येयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकत आहे त्याचा आनंदच आहे. पुन्हा एक नवीन विश्व आपल्या सगळ्यांना खुणावत आहे पण हातातून पुन्हा काही निसटून जात आहे याची खंत देखील आहे.
दिवस हे कॉलेजचे कधी मोहरणारे तर कधी बावरणारे!
दिवस हे कॉलेजचे कधी रडवणारे तर कधी मनसोक्त हसवणारे!
दिवस हे कॉलेजचे कधी रडवणारे तर कधी मनसोक्त हसवणारे!
आपण सगळे पुन्हा कधी असे एकत्र येऊ माहीत नाही पण प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा कप्पा असतो त्या कप्प्यात आपण जगलेले हे सुंदर क्षण कायम जपून देवू.
आठवणींचा हा सुगंध
अत्तराची कुपी होई
जेंव्हा आपण उघडू ती
तेंव्हा सुगंधित आयुष्य होई!
अत्तराची कुपी होई
जेंव्हा आपण उघडू ती
तेंव्हा सुगंधित आयुष्य होई!
आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय महाराष्ट्र!
©स्वामिनी चौगुले
©स्वामिनी चौगुले