अभयवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
आजारपणात व दुःखाच्या प्रसंगात, प्रत्येकाच्या तोंडातून 'आई' हा शब्द येत असतो. अभय ही सारखा 'आई, आई...' म्हणत होता. आजारी असलेल्या अभयची परिस्थिती पाहून आणि त्याच्या तोंडातून 'आई' शब्द ऐकून सुमन दु:खी होत होती. ती त्याची खरी आई नव्हती;पण आरतीला जन्म देऊन तिनेही आईची माया काय असते? हे अनुभवलेले होते. अभयची खरी आई नसली तरी ती त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत होती.
कृष्णाला जन्म देणारी देवकी होती पण कृष्णावर यशोदाची ही माया होतीच ना!
या विचाराची सुमन होती.
सुमन अभयच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. त्याच्या 'आई' शब्दाला होकार देत होती.
'अभय मी तुझ्याजवळच आहे बेटा, तू लवकर बरा हो..'
असे त्याला सांगत होती.
अर्धवट शुद्धीत असलेल्या अभयला आपली खरी आईच आपल्याजवळ आहे व ती आपल्याशी बोलत आहे असे वाटत होते.
त्याला सुमनच्या हाताच्या स्पर्शात आपल्या आईचा स्पर्श जाणवत होता.
आरतीही आपल्या भावाची काळजी घेत होती.
डॉक्टरांच्या प्रयत्नांना अभय उत्तम प्रतिसाद देत होता.
आता त्याची तब्येत नॉर्मल होत होती.
त्याचे बाबाही हॉस्पिटलमध्ये आले होते.
आता त्याची तब्येत नॉर्मल होत होती.
त्याचे बाबाही हॉस्पिटलमध्ये आले होते.
'अभयने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष का केले? आपल्याला का सांगितले नाही? आणि कामामुळे आपली त्याच्याशी तीन-चार दिवसात भेटही झाली नाही. पण आता जे झाले ते झाले. यापुढे त्याने आपल्या तब्येतीकडे व अभ्यासाकडेही दुर्लक्ष करू नये. यासाठी त्याला समजावून सांगू आणि आपल्या घरीच रहा.
ये -जा करून शिक्षण कर असे सांगू. त्याने ऐकले तर बरे होईल.'
ये -जा करून शिक्षण कर असे सांगू. त्याने ऐकले तर बरे होईल.'
असा विचार अभयचे बाबा मनाशीच करत होते.
अभयला थोडे बरे वाटे लागल्यावर, डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला व घरी त्याची काळजी घेण्याविषयी सांगितले.
अभय घरी आल्यानंतर, त्याच्या बाबांनी, आईने व आरतीने त्याची खूप काळजी घेतली.
डॉक्टरांच्या उपचाराने तर अभयची तब्येत सुधारत होती पण आपल्या लोकांच्या प्रेमाने अजून लवकर चांगली होत होती.
आपल्या लोकांच्या सानिध्यात शरीराबरोबर त्याचे मनही सुखावत होते.
सावत्र आईत त्याला आपल्या आईचा भास होत होता. तिच्या स्पर्शात त्याला आईचा स्पर्श जाणवत होता. जन्म देणारी खरी आई सोडून गेली. तिचे प्रेम पुन्हा मिळणार नव्हते. पण तिच्या आठवणी व तिचे आशीर्वाद त्याला जगण्याची शक्ती देत होते.
आपल्या लोकांच्या सानिध्यात शरीराबरोबर त्याचे मनही सुखावत होते.
सावत्र आईत त्याला आपल्या आईचा भास होत होता. तिच्या स्पर्शात त्याला आईचा स्पर्श जाणवत होता. जन्म देणारी खरी आई सोडून गेली. तिचे प्रेम पुन्हा मिळणार नव्हते. पण तिच्या आठवणी व तिचे आशीर्वाद त्याला जगण्याची शक्ती देत होते.
सुमन त्याच्या आईची जागा कधीही घेऊ शकणार नव्हती; पण त्याच्या आईची सावली होऊन त्याच्यावर आईची माया नेहमीच करणार होती.
सावत्र आई विषयी अनेक घटना, प्रसंग व लोकांची मते ऐकली की, पहिल्यांदा तिच्याविषयी वाईटच विचार मनात येतात.
असेच अभयच्या बाबतीत झाले होते. त्यामुळे सुमनविषयी त्याच्या मनात कधी आपलेपणा त्याला जाणवला नाही. आपण तिच्याशी चांगले वागत नसलो तरी ती आपल्याशी चांगलीच वागली. ती आपल्यावर नि:स्वार्थ प्रेम करते. हे अभयला आतापर्यंतच्या अनुभवातून जाणवले होते. आणि त्याने आता मनापासून सुमनला आई म्हणून स्वीकारले होते.
त्याने सुमनला 'आई..' म्हणून हाक मारताच,
सुमनच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आरतीने ' दादा..' म्हणत अभयला घट्ट मिठी मारली. व हे सर्व पाहून अभयच्या बाबांच्या डोळ्यांत समाधान दिसत होते आणि भिंतीवरील फोटोतील अभयची आई समाधानाने हसत आहे. असे भासत होते.
समाप्त
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा