नाते मनाचे
माधवीताईंची आज सकाळपासून फारच गडबड सुरू होती,त्याला कारणही तसेच होते.त्यांचा मुलगा समीर आणि सून सारिका अमेरिकेला जाणार होते .समीरच्या आँफीसने एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती.किमान दोन वर्षे तरी समीरला अमेरिकेत रहावं लागणार होत काय देऊ नि काय नाही असं माधवीताईंना झालं होत
महेशराव आणि माधवीताईंचा समीर एकुलता एक मुलगा होता. महेशराव L.I.C.मध्ये मोठ्या हुद्यावर कार्यरत होते.सहा महिन्यापूर्वीच Ritayard झाले ,आता ऊरलेलं आयुष्य आपल्या कुटुंबीयांनसोबत मजेत घालवायच असं दोघांनी ठरवले.
राजेश हा समीरचा बालपणापासूनचा खूप जवळचा मित्र,राजेशच्या घरची परिस्थिती बेताचीच .तो लहान असतांनाच वडील वारले,आई लोणची,पापड,मसाले करून विकत असे.राजेश अभ्यासात खूप हुशार होता.काही दिवसांत राजेशच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले.राजेश पोरका झाला,पण समीरच्या आईबाबांनी राजेशला आपल्या घरी ठेवून घेतले.त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.राजेश त्यांचा मानसपुत्रच झाला. बघताबघता दोघांचेही काँलेज शिक्षण पूर्ण होऊन दोघेही नोकरी करू लागले.समीर कंपनीच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेला.दरम्यानच्या काळात राजेशचे पण लग्न झाले.रेवती राजेशची बायको खूप लाघवी आणि सुस्वभावी होती.
ईकडे समीर अमेरिकेत चांगलाच रुळला.तिथेच स्थायिक झाला.आईबाबांना पण तिकडे येण्याचा आग्रह केला,पण कायमस्वरूपी तिकडे राहणे त्यांना रुचत नव्हते.
राजेंश ,रेवती आईबाबांची खूप काळजी घेत होते . दोघांनाही खूप जपत होते.समीरची ऊणीव त्यांना भासू नये ह्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते.महेशरावांना बी.पी ,शुगरचा त्रास असल्याने त्यांचे जेवण,औषधपाणी ह्याकडे दोघेही जातीने लक्ष घालीत होते.
त्यादिवशी रेवती सर्व कामं आटोपून तिच्या रुममध्ये निवांत बसली होती अचानक तिला कसला तरी आवाज आला,बघते तर काय माधवीताई बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्या.तिने कसेबसे त्यांना ऊचलून बेडवर बसवले. महेशराव रेवती ताबडतोब त्यांना हाँस्पीटला घेऊन गेले.राजेशपण आँफीसमधून लगेच आला.डॉक्टरांनी पाय फ्रँक्चर असल्याचे सांगितले.रेवती माधवीताईंची खूप काळजी घेत होती त्यांना हवं नको सर्व बघत होती.राजेशने समीरला फोन करून कळविले,पण सध्या येणे शक्य नाही म्हणाला. रेवतीची होणारी धावपळ बघून माधवीताईंना फार वाईट वाटत असे,पण रेवतीच्या चेहऱ्यावर कधीही त्रासिकपणा नसायचा. त्यांनी जरा कुठे ऊठायचा प्रयत्न केला तरी रेवती त्यांना ऊठू देत नसे.राजेश व रेवतीचा आपल्याप्रती असलेला एवढा आदर आणि प्रेम बघून महेशराव आणि माधवीताईंना अगदी गहिवरून येई. त्या दोघांनाही सारखे हेच वाटायचे की राजेशचे आणि आपले रक्ताचे नाते नाही पण आता हाच आपला आधार आहे.समीरचे तर आता फोन येणेही कमी झाले,आईबाबांना भेटायला पण आला नाही.म्हणूनच राजेश आणि रेवतीला
आपल्याबद्यल असलेले प्रेम आस्था बघून दोघेही सुखावून जात होते. राजेश रेवतीशी रक्ताचे नाते नाही पण मनाचे मनाशी जुळलेले नाते लाखमोलाचे आहे
ज्योत्स्ना सावरकर
9892937731