मालती ताई दुपारच्या वेळी निवांतपणे बाल्कनीत झुल्यात बसून not without my daughter हे पुस्तक वाचत होत्या, तर मधुकरराव मंद आवाजात जुनी गाणी ऐकत होते, तितक्या त्यांना सुनील आणि माधुरी ,त्यांचा मुलगा आणि सुन यांच्या भांडणाचा आवाज कानावर पडला. तशी दोनही नातवंड कावरीबावरी होऊन आजीआजोबा जवळ येऊन बसली.
आज सुनीलने अगदीच टिपेचा सूर लावला होता, तर माधुरी त्याला हर तऱ्हेने समजावून सांगत होती. खरं तर सुनील आणि माधुरी तसं एकदम समंजस जोडपं होतं, छोट्या मोठ्या कुरबुरी सोडल्या तर कधी फारसं मोठं भांडण किंवा वितंडवाद त्याच्या 14 वर्षांच्या वैवाहिक जीवनात घडला नव्हता. आणि अगदीच कधी मध्यस्ती ची वेळ आली तर मधुकरराव निरक्षीर विवेक बुद्धीने योग्य त्या व्यक्तीच्या पारड्यात मत टाकत.त्या मुळे सगळं काही सुरळीत चालू होतं.
मध्यंतरी सुनील पाच वर्षांसाठी अमेरिकेत जाऊन मागच्याच वर्षी परतला होता आणि मुलं भारतात स्थिरावल्यावर माधुरीने एका इंग्लिश मिडीयम शाळेत नौकरी धरली होती. तिचा एकंदरीत वावर पाहुन शाळेने सहाच महिन्यात तिला बढती देत coordinator ची पोस्ट दिली होती. नवीन जबाबदारी माधुरी खूप मेहनतीने व इमानदारीने पार पाडत होती. तशी ती खूप महत्वकांक्षी किंवा करियर च्या मागे धावणाऱ्या पैकी मुळीच नाही, पण अनायसे संधी मिळाली आहे म्हणून ती आनंदाने करत होती आणि हिच नौकरी आजच्या भांडणाचे मुळ कारण बनली होती.
तर झालं असं की, माधुरीच्या शाळेने शहराबाहेर पुनवळे येथे नवीन शाखा काढायला घेतली होती आणि मधुरीच्या कामाची दखल घेत संस्थेच्या वतीने तिला नवीन शाखेच्या उभारणी पासूनची सर्व जबाबदारी देत,तिथली प्रिंसिपल म्हणून नियुक्ती केली होती. परंतु माधुरीने त्वरित ही पदन्नोती न स्वीकारता विचार करण्यासाठी थोडा अवधी मागितला होता.कारण शहराबाहेर शाळा सुरू होणार म्हणजे तिला तिकडे शिफ्ट होणं क्रमप्राप्त होतं आणि शहरातील मध्यवर्ती भागात राहणारं तिचं कुटुंब तिच्या साठी तिकडे शिफ्ट होणं कितपत शक्य होईल याची तिला खात्री नव्हती. पण शाळेने केवळ एक वर्षासाठीच जावे लागेल असे सांगितले होते म्हणून तिच्या अशा थोड्या पल्लवीत झाल्या होत्या. सुनीलने एक वर्ष मला साथ दिली तर खूप बरे होईल. माझंही करियर माझ्या मनाप्रमाणे घडेल असं तिला वाटत होतं. आणि त्यासाठी ती सुनीलला हे हरप्रकारे समजून सांगत होती. परंतु सुनील आईबाबा, मुलं यांची करणं देत होता, खरे पाहता त्याची शहराबाहेर राहण्याची तयारी नव्हती. कारण पाच वर्षांच्या ब्रेक नंतर त्याचं सगळं मित्रमंडळ पुन्हा भेटलं होतं. इथुन लांब गेलो की त्यांची सहज भेट होणार नाही आणि आपण पुन्हा एकदा सोशल लाईफला मुकून जाऊ याची जास्त खंत होती. त्यापेक्षा माधुरीनेच नौकरी मध्ये बढती नाकारली तर बसलेली घडी विस्कळीत होणार नव्हती.
आणि आज याच दोन भिन्न विचारांमुळे उभयतांमध्ये भांडण लागले होते.
आज कधी नव्हे ते या दोघांतील भांडण सासू सासऱ्यां समोर आले होते, आणि दोघेही तसे जिद्दीला पेटले होते.माधुरीने मधुकररावांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले, की ते नक्कीच योग्य त्या व्यक्तीची साथ करतील म्हणून. पण यावेळी मधुकरराव पहिल्यांदा मौनात बसले आणि मालतीताई देखील काहीच बोलल्या नाही. या सगळ्या प्रकारामुळे नकळतपणे सुनीलच्या चेहऱ्यावर विजयी हसू उमटले तर, माधुरीच्या मनात आपण पराभूत झाल्याची भावना निर्माण झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. काही केल्या या दोघांमधील कोंडी फुटायला तयार नव्हती. शेवटी मालती ताईंनी दोघांना बोलवून सांगितले, आज कसंही करून काही तरी निर्णय घ्या,मुलं कावरीबावरी होतायत ह्या रोजच्या कटकटी मुळे, आज आम्ही दोघं मुलांना घेऊन बाहेर जातो तुम्ही तुमचा निर्णय तयार ठेवा. असं म्हणून मालतीताई आणि मधुकरराव मुलांना घेऊन बाहेर पडले. माधुरीला कळुन चुकले होते की आता माघार घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये.
इकडे संध्याकाळी आजीआजोबा आणि नातवंड घरी परत आली परंतु एकंदरीत अंदाज पहाता दोघांमध्ये अजूनही सुसंवाद घडला नव्हता हे स्पष्ट जाणवत होते.
रात्री जेवणाच्या टेबलवर पुन्हा एकदा हा विषय चर्चेला निघाला, यावेळी मधुकररावांनी विषयाला हात घातला, त्यांनी स्पष्टपणे सुनीलला विचारले तुझे माधुरीसाठी घर बदलण्याच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? यांवर सुनीलने अत्यंत ठाम शब्दांत विरोध दर्शविला. त्यावर मधुकरराव आणि मालती ताईंनी त्यांची मतं मांडण्याचं ठरवलं, त्यांनी माधुरीला सांगितले की आज सकाळपासून त्या दोघांनी शाळेच्या साईटच्या जवळपास बरीच घरं बघितली. त्यांतील दोन तीन घरं त्यांना आणि मुलांना आवडली देखील आहेत. माधुरी तू उद्या जाऊन त्यातील तुला आवडेल ते घर नक्की कर, आणि सगळे सोपस्कार पूर्ण कर, आणि शाळेला कळव की तु ही ऑफर स्वीकारते आहेस. आणि सुनील तू इथेच याच घरात राहशील, आणि यापुढे जेंव्हा जेंव्हा तुला परदेशात राहण्याची गरज पडेल तेव्हा तेव्हा तु एकटाच जाशील, माधुरी तुझ्यासाठी ऍडजस्ट करणार नाही.
आणि जेवणानंतर मालती ताईंनी उरलेले पुस्तक वाचण्यासाठी हातात घेतलं.
©®सौ. सुषमा दडके.
मध्यंतरी सुनील पाच वर्षांसाठी अमेरिकेत जाऊन मागच्याच वर्षी परतला होता आणि मुलं भारतात स्थिरावल्यावर माधुरीने एका इंग्लिश मिडीयम शाळेत नौकरी धरली होती. तिचा एकंदरीत वावर पाहुन शाळेने सहाच महिन्यात तिला बढती देत coordinator ची पोस्ट दिली होती. नवीन जबाबदारी माधुरी खूप मेहनतीने व इमानदारीने पार पाडत होती. तशी ती खूप महत्वकांक्षी किंवा करियर च्या मागे धावणाऱ्या पैकी मुळीच नाही, पण अनायसे संधी मिळाली आहे म्हणून ती आनंदाने करत होती आणि हिच नौकरी आजच्या भांडणाचे मुळ कारण बनली होती.
तर झालं असं की, माधुरीच्या शाळेने शहराबाहेर पुनवळे येथे नवीन शाखा काढायला घेतली होती आणि मधुरीच्या कामाची दखल घेत संस्थेच्या वतीने तिला नवीन शाखेच्या उभारणी पासूनची सर्व जबाबदारी देत,तिथली प्रिंसिपल म्हणून नियुक्ती केली होती. परंतु माधुरीने त्वरित ही पदन्नोती न स्वीकारता विचार करण्यासाठी थोडा अवधी मागितला होता.कारण शहराबाहेर शाळा सुरू होणार म्हणजे तिला तिकडे शिफ्ट होणं क्रमप्राप्त होतं आणि शहरातील मध्यवर्ती भागात राहणारं तिचं कुटुंब तिच्या साठी तिकडे शिफ्ट होणं कितपत शक्य होईल याची तिला खात्री नव्हती. पण शाळेने केवळ एक वर्षासाठीच जावे लागेल असे सांगितले होते म्हणून तिच्या अशा थोड्या पल्लवीत झाल्या होत्या. सुनीलने एक वर्ष मला साथ दिली तर खूप बरे होईल. माझंही करियर माझ्या मनाप्रमाणे घडेल असं तिला वाटत होतं. आणि त्यासाठी ती सुनीलला हे हरप्रकारे समजून सांगत होती. परंतु सुनील आईबाबा, मुलं यांची करणं देत होता, खरे पाहता त्याची शहराबाहेर राहण्याची तयारी नव्हती. कारण पाच वर्षांच्या ब्रेक नंतर त्याचं सगळं मित्रमंडळ पुन्हा भेटलं होतं. इथुन लांब गेलो की त्यांची सहज भेट होणार नाही आणि आपण पुन्हा एकदा सोशल लाईफला मुकून जाऊ याची जास्त खंत होती. त्यापेक्षा माधुरीनेच नौकरी मध्ये बढती नाकारली तर बसलेली घडी विस्कळीत होणार नव्हती.
आणि आज याच दोन भिन्न विचारांमुळे उभयतांमध्ये भांडण लागले होते.
आज कधी नव्हे ते या दोघांतील भांडण सासू सासऱ्यां समोर आले होते, आणि दोघेही तसे जिद्दीला पेटले होते.माधुरीने मधुकररावांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले, की ते नक्कीच योग्य त्या व्यक्तीची साथ करतील म्हणून. पण यावेळी मधुकरराव पहिल्यांदा मौनात बसले आणि मालतीताई देखील काहीच बोलल्या नाही. या सगळ्या प्रकारामुळे नकळतपणे सुनीलच्या चेहऱ्यावर विजयी हसू उमटले तर, माधुरीच्या मनात आपण पराभूत झाल्याची भावना निर्माण झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. काही केल्या या दोघांमधील कोंडी फुटायला तयार नव्हती. शेवटी मालती ताईंनी दोघांना बोलवून सांगितले, आज कसंही करून काही तरी निर्णय घ्या,मुलं कावरीबावरी होतायत ह्या रोजच्या कटकटी मुळे, आज आम्ही दोघं मुलांना घेऊन बाहेर जातो तुम्ही तुमचा निर्णय तयार ठेवा. असं म्हणून मालतीताई आणि मधुकरराव मुलांना घेऊन बाहेर पडले. माधुरीला कळुन चुकले होते की आता माघार घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये.
इकडे संध्याकाळी आजीआजोबा आणि नातवंड घरी परत आली परंतु एकंदरीत अंदाज पहाता दोघांमध्ये अजूनही सुसंवाद घडला नव्हता हे स्पष्ट जाणवत होते.
रात्री जेवणाच्या टेबलवर पुन्हा एकदा हा विषय चर्चेला निघाला, यावेळी मधुकररावांनी विषयाला हात घातला, त्यांनी स्पष्टपणे सुनीलला विचारले तुझे माधुरीसाठी घर बदलण्याच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? यांवर सुनीलने अत्यंत ठाम शब्दांत विरोध दर्शविला. त्यावर मधुकरराव आणि मालती ताईंनी त्यांची मतं मांडण्याचं ठरवलं, त्यांनी माधुरीला सांगितले की आज सकाळपासून त्या दोघांनी शाळेच्या साईटच्या जवळपास बरीच घरं बघितली. त्यांतील दोन तीन घरं त्यांना आणि मुलांना आवडली देखील आहेत. माधुरी तू उद्या जाऊन त्यातील तुला आवडेल ते घर नक्की कर, आणि सगळे सोपस्कार पूर्ण कर, आणि शाळेला कळव की तु ही ऑफर स्वीकारते आहेस. आणि सुनील तू इथेच याच घरात राहशील, आणि यापुढे जेंव्हा जेंव्हा तुला परदेशात राहण्याची गरज पडेल तेव्हा तेव्हा तु एकटाच जाशील, माधुरी तुझ्यासाठी ऍडजस्ट करणार नाही.
आणि जेवणानंतर मालती ताईंनी उरलेले पुस्तक वाचण्यासाठी हातात घेतलं.
©®सौ. सुषमा दडके.