पुढचं पाऊल...
पर्व दुसरे भाग 7
आधीच्या भागात,
माधवी आणि अभिनव चा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो त्यात श्रीकांत चालबाजी करतो पण त्याचा प्लॅन सक्सेस होत नाही पण माधवीच्या आईला काळजी लागलेली असते....
आता पुढे,
सहा महिन्यानंतर ची लग्नाची तारीख ठरवली गेली ...या सहा महिन्यात माधवी आणि श्रीकांतची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली, शेवटी दोघेही वेगळे झालेच... घटस्फोट झाल्यानंतर लग्नाला एक महिन्याचा अवधी होता या एक महिन्यात लग्नाची खरेदी इतर कामे झाली.... लग्नाचा दिवस उजळला, माधवी आणि अभिनव खूप खुश होते आज माधवीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस होता.... लग्न विधी पार पडले ,माधवी ची पाठवणी झाली... आज माधवी नवीन घराचा उंबरठा ओलांडणार होती.... तिने तिच्या जीवनाची नवीन सुरुवात केली... नवीन आयुष्यात पुन्हा एकदा पुढच पाऊल टाकलं....
मोना श्रीकांतला नेहमी साठी सोडून गेली, श्रीकांतला स्वतःची चूक समजली पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता जिच्यासाठी त्यांनी माधवीला सोडलं ,तीच त्याला सोडून गेली , "तेलही गेले ,तूपही गेले ,हाती आले धुपाटणे", अशी गत श्रीकांतची झाली...
माधवीची मात्र जीवनाची नवीन सुरुवात झाली...
समाप्त....