शीर्षक:- प्रीतीसारंग
विषय:- मनाचे खेळ
भाग- ६ (अंतिम )
"सारंग आणि प्रीती हे त्याच्या कथेतील पात्र आहेत." संजय उभे राहत म्हणाले.
"काय ! कथेतील पात्रे. मग त्याचा काय संबंध त्याच्या जीवनाशी?" ती आश्चर्याने म्हणाली.
"कारण तो स्वतः उत्कृष्ठ लेखक आहे. त्याला त्यासाठी खूप बक्षीसेही मिळाली आहेत." संजय म्हणाले तसे तिला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला.
तो शायरी लिहितो हे तिला माहिती होते. पण तो लेखक आहे याची तिला कल्पना नव्हती.
"अच्छा ! काका त्याचा कधी अॅक्सिडेंट वगैरे झाला होता का? ज्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता. " तिने पुढचा प्रश्न केला.
"हो, तो काॅलेजच्या शेवटच्या वर्षात होता तेव्हा त्याचा अॅक्सिडेंट झाला होता. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तो बऱ्याच गोष्टी विसरला होता. आम्हाला आणि स्वतःलाही तो विसरला. तेव्हा डाॅक्टर म्हणाले होते की हळूहळू त्याच्यात सुधारणा होईलच. त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करू नका कारण ताण पडला की त्याचा मेंदूवर आघात होईल आणि त्याच्या जीवाला धोका होईल. म्हणून आम्हीही त्याला काहीच आठवण करून देत नव्हतो. त्याची डोक्याची जखम बरी झाली : पण तरी त्याच्या कल्पनेच्या दुनियेमध्ये तो वावरतोय. त्याची प्रीतीसारंग ही कथा खूप गाजली होती. त्यातील पात्र तो स्वतः जगत लिहिला होता. तो त्यात इतका रमून गेला होता की तो स्वतःला सारंग समजू लागला होता. त्याने ही कथा अॅक्सिडेंट पूर्वी लिहिली होती. तीच तेवढी त्याच्या आठवणीत आहे. त्याने ही कथा ऐकवली होती मला एकदा जेव्हा सारंग व प्रीती या दोघांमध्ये भांडण होते व ती त्याला सोडून निघून जाते. तो तिच्यामागे जातो. अशी ती कथा होती. त्याचे पुढचे पर्व तो लिहिणार होता पण नेमकं तेव्हाच त्याचा अॅक्सिडेंट झाला. त्याच्या मेंदूमधून सगळे पुसले गेले पण ती कथा मात्र पुसली गेली नाही. रोज रात्री झाली की तो स्वतःला सारंग समजून प्रीतीला शोधण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कसे बसे त्याची समजूत घालून त्याला झोपेची गोळी देऊन शांत करत होतो. या आजारावर इलाज करणारे इथे एक चांगले डाॅक्टर हे कळल्यावर आम्ही इकडे आलो. नेमकं इथे येईपर्यंत रात्री झाली आणि पाणी आणण्यासाठी मी हिला व त्याला सांगून गेलो. येऊन पाहतो तर तो हिचा हात सोडून निघून गेला होता. नशीब तो तुला सापडला." संजय सुस्कारा टाकत म्हणाले.
ते जसे जसे सांगत होते तसे कृतिकाला लक्षात आले की शिवसोबत नेमके काय झाले? तो स्वतःला सारंग का समजतो व ती प्रीती कोण आहे?
"काका, तुम्ही योग्य त्या ठिकाणी आला आहात. चिंता करू नका. आपला शिव लवकरच ठीक होईल. जरी नाही झाला तरी मी आयुष्यभर त्याची काळजी घेईन." तिने संजय व सुमन यांचा एक एक हात आपल्या हातात घेत दिलासा व धीर देत म्हणाली.
"म्हणजे आम्हाला काही कळलं नाही तुला नेमकं काय म्हणायचे आहे ते? म्हणजे तू ती डाॅक्टर आहेस पण आयुष्यभर का त्याची काळजी घेशील?" संजय तिच्या चेहऱ्याकडे पाहत प्रश्नांकित चेहऱ्याने म्हणाली.
"कारण तो माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. मी त्याला आतापर्यंत शोधत होते, तो या अवस्थेत भेटेल असे वाटले नव्हते." ती भावूक होत म्हणाली.
संजय व सुमन दोघेही विस्मित होऊन तिच्याकडे पाहू लागले.
तिने डोळे मिचकावत होकारार्थी मान डोलावली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवला जाग आली तेव्हा तो आनंदाने उठून बसला व म्हणाला,"प्रीती तू आलीस मला खूप आनंद झाला. आता मला सोडून कोठेही जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी अधुरा आहे गं. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर."
त्याने आनंदाने तिला मिठीत घेतले व नंतर कपाळावर अतीव प्रेमाने ओठ टेकवले.
"नाही जाणार सारंग, कधीच जाणार नाही तुला सोडून. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू." तीही त्याला घट्ट बिलगून म्हणाली.
रूमबाहेर उभे असलेल्या संजय व सुमन यांचे डोळे आनंदाने भरून आले. ते डोळे पुसत तिथून निघून गेले.
आदल्या दिवशी रात्री:-
संजयशी बोलून कृतिकाने प्रीतीचे वर्णन जाणून घातले व त्याच प्रमाणे तयार होऊन शिवसमोर जाण्याचे ठरवले. त्याला बरे करण्याचा हा पहिला उपाय होता. हळूहळू ती त्याला वास्तवात आणणार होती. विविध थेरेपी, औषधेही देणार होती. त्याप्रमाणे तिने सकाळी ती उठायच्या आधी ती प्रीती बनून त्याच्यासमोर आली. तोही तिला प्रीती समजला.
वर्तमानात-
चार- पाच वर्षाच्या उपचाराने शिव ठीक झाला. कृतिकाने त्याला मनाचे खेळ व वास्तव यात फरक पटवून दिला. यासाठी तिला त्याच्या कलाने जावे लागले. त्यासाठी ती स्वतःचे व्यक्तीमत्व सोडून दुसऱ्या व्यक्तीमत्वात वावरली. तेही तिने त्याच्यावरील प्रेमाखातर केलं. तिने त्याच्याशी लग्न केले. तो बरा झाला, तरीही अधूनमधून तो सारंग होतो. तेव्हा कृतिका त्याची प्रीती होते.
आपके प्यार ने पागल से
बना दिया हमे इन्सान
शुक्रिया तेरा ये हमदम
कैसे चुकाऊँ तेरा एहसान
बना दिया हमे इन्सान
शुक्रिया तेरा ये हमदम
कैसे चुकाऊँ तेरा एहसान
अगर मैं भूल भी जाऊँ तो
ताउम्र तुम देना मेरा साथ
तुम करना हमें याद हमेशा
जीवन के हर सफर में
थाम लेना मेरा हाथ..
ताउम्र तुम देना मेरा साथ
तुम करना हमें याद हमेशा
जीवन के हर सफर में
थाम लेना मेरा हाथ..
शिव वास्तवात असल्यावर तिला शायरी ऐकवत त्याचे जीवन सावरून साथ देण्यासाठी तिचे मनापासून कौतुक करत तिचे आभार मानत नेहमी साथ देण्यास म्हणायचा. अशी प्रेम करणारी जीवनसाथी मिळाली यासाठी तो नेहमीच देवाचे आभार मानायचा.
समाप्त-
मनाचे खेळात वास्तव दुनियेपेक्षा कल्पनेचे जग जास्त खरे वाटते. तेच जग खरे वाटून त्यातच रमायला चांगले वाटते.
एखादी कथा जो लेखक स्वतः लिहितो त्या तो इतका गुंतून जातो की त्याला प्रत्यक्षात तेच खरे वाटू लागते. असेच इथे शिवचे झाले. इथे कृतिकाचे प्रेम त्याला पुन्हा परत वास्तवात आणले.
हा मानसिक आजार हा वेडेपणा नाही. तो मनाचा खेळ असतो. वेळीच उपचार व आपल्या मायेच्या व्यक्तीचे प्रेम मिळाले तर ते ठीक होऊ शकतात.
©️ जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा