आपण वाचत आहात..
प्रेम.. तडजोड... नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका... प्रीती..!
( मागील भागात आपण बघितलं शालिनीची लग्नाला मागणी घातल्यामुळे मोहनची झालेली कोंडी..
आजच्या भागात अनुभवा त्यांच्या मनाची घालमेल....)
************
तुझी बायको बनण्याचा मी कधीच प्रयत्न करणार नाही... आपलं लग्न केवळ लोकांना दिसण्यासाठी असेल.. "
तिनं त्याला आश्वस्त केलं...
" आता जाते मी बाहेर... नाहीतर सगळ्यांना वाटेल की लग्नाची बोलणी झाल्याबरोबर मी तुझीच झाले..!"
हसून बोलत ती बाहेर जायला निघाली...
तसा त्यानं तिचा हात पकडला...
अन् एक घट्ट मिठी मारली...
ती शहारली...
" थॅंक यू.. शालिनी...! मला समजून घेतल्याबद्दल...!! "
तो म्हणाला.
"... अशी मिठी मारशील तर विचार बदलेल माझा..! "
त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली.
तसा तोही झटकन दूर झाला.
"... माफ कर गं..! भावनेच्या भरात कळलं नाही मला.."
आपली नजर चोरत मोहन म्हणाला.
"... अरे माफी कसली त्यात..?
एवढं समजू शकते मी..
आणि लक्षात ठेव... सोनियापासून तोडणार नाही मी तुला...
कधीच....!
एक मैत्रीण म्हणून सदैव तूझ्यासोबत असेन मी...!! "
ती म्हणाली.
" मैत्रीण म्हणतेस तर एकदा आईला मनव नं... मला एकदा मुंबईला जाऊन येण्याची परवानगी घे ना आईकडून... प्लीज... "
तो हतबलतेने म्हणाला.
" हो... करते मी प्रयत्न..
आता जाते मी... आणि तुही ये थोडयावेळाने आवरून...! "
.
.
.
".... आत्या जाऊन येऊ दे ना गं त्याला एकदा..! "
शालिनी आत्याला लोणी लावत म्हणाली....
"... नाही...!
हवं तर हट्ट समज माझा.. पण जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोवर मी मोहनला कुठेच जाऊ देणार नाही... "
त्याची आई म्हणाली.
"... आत्या... "
ती.
" शालू... तुझं ऐकते ना मी नेहमीच ...!
पण हे नाही ऐकणार...
तिच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.
तेवढ्यात पाणी प्यायला म्हणून मोहन तिथे आला.
"... आणि मदतीचं म्हणशील तर मोहन आहे ना तो करेल मला मदत.. हो ना रे..? "
त्याच्याकडे बघून ती.
" हो - हो.. करेल ना.. " - तो.
" लबाड... सासूसमोर नवऱ्याला कामाला लावतेस होय..?? "
तिचा गालगूच्चा घेत ती म्हणाली.
शालू - मोहन दोघांनीही बघितलं एकमेकांकडे..
आणि हसले मग...
कसंनुस....!
तिनं दोघांचे हात हातात घेतले आणि एकमेकांच्या हातात दिले..
"... आई.. चल बाहेर..! आराम कर.."
मोहन विषय बदलवून तिला छपरात घेऊन आला...
.
.
.
.
... शालूचा डोळा लागत नव्हता..मग ती हळूच दार उघडून बाहेर आलं. अंगणात शीतल चांदणं पडलं होतं. मंद मंद वारा सुरु होता.. आंब्याच्या झाडाआडून हळूच चंद्र डोकावत होता..
ती खुर्ची घेऊन अंगणात बसली... मनात विचारांचे काहूर माजले होते...
".. मी जे करत आहे.. ते बरोबर आहे ना..?"
एक मन विचारत होतं.
".. हो.. बरोबरच करतेयस तू.. आताच्या घडीला आत्याची प्रकृती बघता हेच योग्य आहे.. "
दुसरं मन.
"... पण मग मोहनचं काय..??"
पहिलं मन.
"... आत्या जास्त महत्वाची आहे या क्षणी..."
दुसरं मन.
"... आत्या बरी झाली की लगेच मी मोकळी करेल मोहनला.. त्याला असं तीळतीळ तुटतांना नाही बघू शकत मी..! "
" आणि तुझं काय..?? तुझंही प्रेम आहे ना मोहनवर.. त्याला सोडून कशी राहशील..?? "
"... आत्याने सगळ्या प्रेमाची आधीच भरपाई केलीय माझी.. आणि... मोहन चं म्हणशील तर त्याच्यावर जबरदस्ती तर नाही ना करू शकत मी...
पण.. आत्या मोहनला माझ्यासाठी नेहमीच गृहीत धरते का...?? "
तीचं मनात स्वतःशीच द्वन्द्व सुरु होतं....
गालावर ओघाळलेले थेंब तिने हळूच पुसले..
खांद्यावर एक थाप पडली तसं दचकून तिनं बाजूला पाहिलं...
एवढ्या रात्री काय करताय इथं.. झोप येत नाहीये का...?? "
" कुठं काय..?? काहीच तर नाही..."
ती म्हणाली.
" डोळ्यात पाणी का मग तूझ्या..?? "
तिचा हात हातात घेत ते म्हणाले..
"... बाबा..! आता लग्न ठरलंय ना माझं... मग तुम्हाला सोडून जाईन मी.. खूप आठवण येईल तुमची..! "
ती म्हणाली तसं तिचे बाबा मोठ्यानं हसायला लागले..
तिनं प्रश्नार्थक त्यांच्याकडे पाहिलं..
" हळू... केवढं मोठयाने हसताय ..? "
- ती.
"... काय करू मग..??
अगं दोन घरं ओलांडली की ताईचं घर येतं तरीही तुला माझी आठवण येईल..?? "
ते पुन्हा हसत म्हणाले.
"... आणि आलीच आठवण तर मीही येईलच की तूझ्या मागे मागे माझं बिऱ्हाड घेऊन ...!
तसही तूझ्या शिवाय आहेच कोण माझं..??
आणि मी तरी राहू शकेल का तुला सोडून...? "
डोळ्यांच्या कडा पुसत ते म्हणाले.
" बाबा..!"
म्हणत ती त्यांना बिलगली.
"... शालू...! खूप भाग्यवान आहेस तू..! एवढं प्रेम करणारं घर मिळालंय तुला. ताईचा खूप जीव आहे गं तुझ्यावर.. तिच्या स्वतःच्या मोहनपेक्षाही काकणभर जास्तच...! तिला दुःख होईल असं कधी वागू नको. एवढे दिवस तिनं सांभाळून घेतलं तुला. आता तू तिला सांभाळ... लेकीची माया दे...!! "
ते तिच्या डोकयावरून हात फिरवत होते...
तिचं केवळ हूं -हूं चाललं होतं..
मिटल्या डोळ्यासमोर फक्त मोहन उभा होता..
".. बाबा म्हणतात तशी खरंच भाग्यवान आहे का मी... ?"
ती स्वतःला विचारत होती.
" मी जर भाग्यवान तर मग मोहनच्या नशिबाचे काय...?? त्याची काय चूक...?? "
तिच्या मिटल्या नयनातून एक थेंब खाली निसटलाच...!
.
.
.
"... काय घडतंय माझ्या नशिबात..??
कसलं प्राक्तन भोगतोय मी हे..?
माझं लग्न म्हणजे सर्वांना लहानपणीचा भातुकलीचा खेळ वाटतोय का.. आईला..??
साधं कुणी मला विचारलंही नाही की मला शालूशी लग्न करायचेय का नाहीय ते..
का सगळ्यांनी मला गृहीत धरलंय..??
ह्यात बिचाऱ्या शालूची काहीच चूक नाहीये ना..
आणि माझ्या सोनियाची..? आमच्या बाळाची..??
चूक तर कुणाचीच नाहीये...
मग का मला निर्णय घेता येत नाहीये..? ह्या प्रवाहसोबत असाच वाहत जाऊ... की फिरू असाच परत... प्रवाहाच्या उलट्या दिशेने...?? "
त्याने आपली कूस बदलली.
निद्रादेवी त्याच्यादेखील डोळयांवर कुठे स्वार झाली होती...??
त्याच्या मिटल्या डोळ्यासमोर तिघीही उभ्या होत्या...
आई...
शालिनी...
आणि..
त्याची सोनिया....
.
.
.
क्रमश :
***********************
निर्णयाची वेळ आली आहे....
कोणाला निवडेल तो... वाचा पुढील भाग...
आणि तोवर हा भाग कसा वाटला... नक्की कमेंट करा..
Like करा... share करा... आणि मला folllow करा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा