Login

प्रतिक्षा फक्त तूझीच अंतिम भाग

शेवटी मंगलाष्टक झाली आणि आंतरपाट दूर झाला. समोरच त्याला त्याचसाठी सजलेली त्याची अश्विनी दिसली. गुरुजींनी सांगण्याच्या अधोच नीरज अश्विनीच्या गळ्यात वरमला टाकून मोकळा झाला. तसा तिथे चांगलच हशा पिकला.
मागील भागात.

अश्विनीला जवळ आलेलं बघून नीरजने पटकन तिला जवळ ओढून घेतले आणि तिला त्याचा खाली आणत तो तिच्यावर ओणवा झाला. त्याच्या हातांनी दोघांमध्ये अंतर ठेवलं होत.

“हे काय?” अश्विनीने आठ्या पाडून विचारलं.

“शिक्षा,” नीरज “माझ्या अश्विनीला लांब पाठवल्याबद्दल.”

अश्विनीने लाजून तिची मान बाजूला वळवून घेतली. तस त्याने लगेच तिची मान धरून सरळ केली आणि तिच्या चेहऱ्यावर तो झुकू लागला. अश्विनीनेही तिचे डोळे मिटून घेतले. थोड्याचवेळात ओलसर ओठांचा स्पर्श झाला. जिथे स्पर्श झाला तिथे लगेच आठ्याही जमा झाल्या.

आता पूढे.

तिने लगेच डोळे उघडून त्याच्याकडे गोंधळून पाहिलं. कारण त्याने तिच्या कपाळावर किस केल होत.

“तुला काय वाटलं?” नीरज खट्याळ होत बोलला.

तस तिने त्याला तिच्या अंगावरून ढकलून दिल आणि सरळ खोलीच्या दारात गेली. त्या दाराच्या लॉकला हात लावत बोलली.

“त्या अश्विनीला मिळवणं एवढं सोप नाही.” अश्विनी गालातच हसत सरळ लॉक उघडून बाहेर निघून गेली.

तसा नीरज ही हलकाच हसत बाहेरच्या खोलीत आला. दोघांचा खुललेला चेहरा बघून दोन्ही कुटुंबाना समाधान वाटल.

अश्या भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी करून मगच नीरज आणि त्यांच कुटुंब तिथून बाहेर पडल. इकडे विशाखाने अश्विनीला ते दोघे काय काय बोलले? हे विचारून विचारून हैराण केल होत. थोड्यावेळाने ती देखील तिच्या घरी निघून गेली.

ते गेल्यानंतर अश्विनी तिच्या आईकडे, कांता मावशीकडे रोखून बघायला लागली. पण त्या दोघी नाटक तर अश्या करत होत्या काम करण्याच की अश्विनीला त्यांना काही बोलताच येत नव्हत. शेवटी तिला पण हसायला आल. तेव्हा कुठे त्या दोघी अश्विनीजवळ गेल्या. त्या आपल्या आईच्या डोळ्यातला आनंद बघून अश्विनीलाही समाधान वाटल.

तर तिकडे घरी जाता जाता नीरजला त्याच्या घरच्यांना काही बोलता आल नव्हत. कारण तो तर त्याच्या गाडीत आला होता. सुहास हे त्यांच्या गाडीने सरळ त्यांच्या घरी निघून गेले. घरी पोहोचल्यावर मात्र त्यानेही घरच्यांवर लटका राग दाखवला. खरा दाखवला असता तर सरळ अश्विनीला त्याच नाव सांगण्याची धमकी मिळाली असती. एकतर ती आधीच कामाच्यानिमित्ताने विकास आणि सुहास यांच्या खूपच जवळची झाली होती. मग काय? तोही नंतर त्यांच्यात समील झाला.

दुसऱ्या दिवशीपासून सगळेच अश्विनीला आदराने बोलावू लागले आणि हेच अश्विनीला नको होत. तिला तिची ओळख स्वतः कमवायची होती. पण आता तिला भावी मालकीण म्हणून सगळेच मान देत होते. मग काय? आज दुपारीच जेवणाच्या वेळेस नीरजला तिच्या त्या जुन्या स्वभावाला सामोरे जाव लागलं होत. पण जे काही झाल ते अश्विनीने त्या दोघांमध्येच ठेवलं. बाकीच्यांना त्याची खबरही लागू दिली नाही. शेवटी ती उद्या त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाची सून होणार होती.

काही दिवसांनी मुंबईच्या मुख्य ऑफीसला अश्विनीची वाशी ब्रांचच्या मूख्य मॅनेजर पोस्टवर तिच प्रमोशन झाल्याच ऑफीशियल अनाऊन्समेंट करण्यात आली. आधीचे मुख्य मॅनेजर यांचा पण सन्मानपूर्वक निरोप समारंभ करण्यात आला.

त्याच्या दुसर्‍याच दिवशी नीरज त्याच्या आई-वडीलांसोबत अश्विनीच्या घरी आला. आज त्यांच्या सोबतीला त्याच्या घरातली इतर वरिष्ठ मंडळी आणि नातेवाईक देखील होती. सोबत गुरुजीही देखील आले होते.

अश्विनीकडून तिची मावशी, काका आणि विशाखा होती. अश्विनीने बाकी कोणालाही बोलावलं नव्हत. ज्यांनी गरजेला तिला मदत केली आज सूखाच्या क्षणाचे सोबतीही तिने फक्त त्यांनाच केल होत. दोघांच्या नावाची सुपारी फोडण्यात आली. त्याच दिवशी साखरपुड्यासाठी पुढच्या आठवड्यातली तारीख काढून दोघांचा साखरपुडा उरकून घेण्यात आला. साखरपुड्याच्या दिवशी दोन महिन्यातच लग्नाची तारीख ठरवण्यात आली.

या दोन महीन्यात संतोषवर सोपवलेला प्रोजेक्ट लवकरात लवकर लाँच करायचा होता. संतोष ही अश्विनीप्रणाचेच कष्टाळु होता. पण तिच्या इतका तो खडूस तर नक्कीच नव्हता. त्याने प्रेमाने त्याच्या टीमची मन जिंकून घेतली होती. त्यावर अश्विनीही लक्ष देऊन होती आणि बाकी ब्रांचची सगळीच जबाबदारी आता तिच्यावर होती. त्यामुळे या दोन महीन्यात सगळीकडची काम तिने हातावेगळी करायला घेतली. नंतर किमान वीस दिवस तरी नीरज तिला काम करु देणार नव्हता. त्याने लग्नानंतर देवदर्शन झाल्यावर लगेचचं पंधरा दिवसांचा फिरायला जायचा प्लॅनही आधीच करुन ठेवला होता.

आता एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलासोबत तिच लग्न ठरलं होत. मग त्याची बातमी अश्विनीच्या मूळ घरी पोहोचायला वेळ लागला नाही. ती आता आपल्याला उभं देखील करणार नाही हे माहीती असूनसुद्धा ती लोक अश्विनीच्या घरी येऊन पोहोचली. अश्विनीने त्यांना काहीही एक न बोलता फक्त लग्नाच निमंत्रण दिल.

“आपल्या माणसांना आमंत्रण देतात बेटा.” अश्विनीची आई तिच्या घरच्यांना पाहून परत विरघळली होती.

“तो हक्क त्यांनी कधीच गमावला आहे आई.” अश्विनी कोरडेपणाने बोलली आणि सरळ तिच्या खोलीकडे चालली गेली.

मग तिच्या घरच्यांनीही जास्त काही न बोलता त्यांच्या घरी जाण पसंत केल. दिवसांनी त्यांचा वेग पकडला. जणू काही ते नीरजची एवढ्या वर्षांची प्रतिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करत होते.

ते म्हणतात ना की 'अगर किसी चिज को अगर दिल से चाहों तो पूरी कायनात उसे तूमसे मिलाने की कोशीश में जूट जाती है.' असच काहीस नीरजच झालं होत.

बघता बघता लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला.

दुपारपासून अश्विनीच्या घरात गडबड गोंधळ चालू होता. तिच्या हातात आज मेहंदी काढली जाणार होती. विशाखा तर तिलाच चिटकून होती. विशाखाची आई देखील आली होती. तिचा नवरा मात्र लग्नालाच येणार होता.

अश्विनीच्या पूर्ण हातावर मेहंदी सजली गेली. त्यात एका बाजूला नीरजचं नाव लिहीलं गेलं. आज नीरजने तिला व्हिडीओ कॉल केला. जो विशाखाने उचलला.

“हाय साली साहेबा.” नीरज हलकेच हसत बोलला. “तुमचेही आभार मानायचे राहीले की.”

“त्याची काही गरज नाही.” विशाखा “फक्त माझ्या मैत्रीणीला सुखात ठेवा. नाहीतर माझ्याकडे तुमचे सगळेच सिक्रेट्स माझ्याकडे शाबूत आहेत.” विशाखाचा स्वर बोलता बोलता भरुन आला. नंतर तिने तो मोबाईल अश्विनीसमोर धरला.

दोघांना आनंदात बघून विशाखाला खूप आनंद झाला. विशाखा समोर असल्याने त्या दोघांना जास्त काही बोलता आलं नव्हतं. पण डोळ्यांनी मात्र त्यांची ती कमी भरुन काढली.

दुसर्‍या दिवशी हळदीचा कार्यक्रम ही खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. हळदीच्या कार्यक्रमासाठी तर रेवा आणि संतोषही आले होते.

“आता तुम्ही आटपुन घ्या.” अश्विनीने दोघांना सुनावले. “तुम्हाला सारखं सारखं डिस्टर्ब करण एकतर आवडत नव्हतं मला.”

यावर रेवा चांगलीच लाजली. तर संतोषने उगाच हसून दाखवलं.

“मी तयार आहे. पण हिचेच नखरे खुप आहेत.” संतोष दिर्घ श्वास घेत बोलला. तस रेवाने त्याच्या पाठीवर चापट मारली.

तिकडे नीरजकडेही जोरदार हळदी झाली होती. तन्वी देखील तिच्या दादाला चीपकुनच बसली होती. तिच्या हातावरही मेहंदी चांगलीच काढली होती. आज हळदी खेळताना तन्वीने कोणालाच सोडलं नव्हत. अगदी सुहास, त्यांची बायको, मुल, नीरजचे मित्र, मैत्रीण, तिचे मित्र आणि मैत्रीण कोणालाच सोडलं नव्हतं. रक्षा आणि विकास यांना तर सर्वात आधी तिने हळदीने अंघोळ घातली होती. नीरजची उष्टी हळद घेऊन ती सुहास आणि त्यांच्या बायकोसोबत अश्विनीच्या घरी आले.

विशाखासोबत चांगलीच गट्टी झाल्याचा फायदा तर विशाखा घेणारच होती ना. जशी तिने हळदीच भांड अश्विनीच्या आईच्या हातात दिल. तस विशाखाने तिच्यावर सरळ पाण्याने भरलेली बदली उलटी केली. सुकून गेलेली तन्वी सगळी ओलीचिंब झाली. तिनेही लगेच आजूबाजूला पाहिलं. पण तिला काहीच मिळालं नव्हतं.

मागून कांता मावशी दोन पाण्याच्या बादल्या घेऊन चालल्या होत्या. ते तन्वीला दिसलं. तशी ती लागलीच त्यांच्याकडे धावली. त्यांच्या हातातून पटकन एक बदली घेतली आणि हसण्यात व्यस्त असणाऱ्या विशाखावर ती उलटी केली. तिला कल्पनाही नव्हती की तन्वीला पाणी मिळेल म्हणून. या नंतर त्या दोघींची जी मस्ती सुरु झाली ती चांगली अर्धा तास रंगली.

“पण तुला पाणी कसा मिळाल?” दमून भागून विशाखा बसली आणि तन्वीला विचारू लागली.

“ते त्या मावशी घेऊन चालल्या होत्या.” तन्वीने कांता मावशीकडे बोट दाखवून सांगितले.

अश्विनीच्या आईने तर एकाच पाण्याची बादली सांगितली होती. पण त्यांनी दोन बादल्या का आणल्या? ते आता विशाखाला समजल होत. तश्या त्याही लांबूनच हसायला लगल्या.

"मावशी आपण मुलीकडचे ना." विशाखा उगाच गाल फुगवून विचारू लागली. तश्या त्याही खळखळून हसत त्यांच्या दूस-या कामाला निघून गेल्या.

थोड्यावेळाने कपडे सुकल्यावर ते तिघेही त्यांच्या घरी निघून आले.

संध्याकाळ झाली तशी अश्विनीच्या ओळखीचे चेहरे तिथे येऊन पोहोचले. त्यांना पाहून अश्विनीला पहीले भरुन आलं. तिचा तो कॉलेजचा ग्रुप तिथे आला होता. विशाखाने त्यांना झाडून बोलावलं होत आणि ते हि तयारीतच आले होते. या ग्रुपनेही तिला भेटल्या भेटल्या पहिले तिचे कान पिळले. भावनांचा पूर ओसरल्यावर त्या ग्रुपने कामाचा सगळा ताबा त्यांच्या हातात घेतला.

आज हळदीचा विशाखा आणि त्यांच्या ग्रुपने खूप सार नाचून घेतलं. सोबत अश्विनीलाही नाचवलं. आताच्या अश्विनीला बघून कोणी सांगू पण शकतणार नव्हतं की ती हीच ऑफिसवरची खडून मॅनेजर होती. इतकी ती तिच्या मैत्रीत रंगेन नाचत होती.

नीरजला अश्विनीला नाचताना बघायचं होत. मग काय? आपल्या नूकत्याच भेटलेल्या मैत्रीण कम साली साहेबाला म्हणजेच विशाखाला ओ, व्हिडिओ कॉल लावून आनंदाने नाचणाऱ्या तिला त्याने मन भरून पाहून घेतलं. तसा तो ही तिकडे त्याच्या मित्रांसोबत जोशात नाचू लागला.

दोन्ही पक्षाकडील माणस रात्री उशीरापर्यंत नाचून दमुन झोपी गेले. नीरजला तर हे दोन दिवस कधी जातील अस झाल होत. एकतर उद्या लग्न होत. उद्या लवकर उठायचं तर होत पण त्याची रात्रीची झोपचं उडून गेली होती. अश्विनीच्या विचारात रात्री कधी त्याचे डोळे मिटले गेले? त्यालाच कळल नव्हतं.

सकाळपासून गडबड गोंधळ चालु झाला. काही राहील नाही ना? याची खात्री करत वरमंडळी वरात घेऊन अश्विनीच्या घरी निघाली. आज ऑफीसचा सगळाच स्टाफही सोबत होता.

अश्विनीच्या घरी देखील तसाच गोंधळ चालु होता. अश्विनीची मावशी, काका, विशाखा, तिची आई, तिचा नवरा, शेजारी. तिचा ग्रुप असे सगळेच सोबत असल्याने अश्विनी आणि तिच्या आईवर जास्त काही लोड आला नव्हता. त्यांच्या इमारतीच्या आवारात तर सगळा घाट घातला होता. मेरेज हॉलपेक्षा घरातून पाठवणी करण्याची इच्छा अश्विनीच्या आईने सांगितली होती. मग ती अश्विनी पूर्ण करणार नाही अस थोडीच होणार होत. मग तिथेच लग्नाचा मंडप सजला गेला.

वरात अश्विनीच्या घराच्या दारासमोर येऊन पोहोचली. वरातीच स्वागत अश्विनीची मावशी आणि तिच्या काकांनी केल. नीरजनेही अश्विनीच्या शालूला मॅचिंग अशी शेरवानी घातली होती. त्यात तो ही तितकाच राजबिंडा दिसत होता.

तर अश्विनीने आंबा रंगाचा शालु नेसलेला होता. समोरून येणाऱ्या अश्विनीला पाहून नीरज तर तिच्यातच हरवला. ती जवळ येऊन कधी त्याला स्टेजवर घेउन गेली हे त्यालाही समजलं नव्हत. स्टेजवर दोघांची जोडी चांगलीच शोभून दिसत होती. यथावकाश लग्नाचे विधी सुरु करायचे म्हणून दोघांमध्ये आंतरपाट धरण्यात आला. तेव्हा कुठे नीरज वास्तवात आला.

“वहिनी तुमचा लेक गेला कामातून.” सुहास रक्षाकडे बघून हसत बोलले. यावर सगळेच हसले. तर नीरज इकडे तिकडे बघायला लागला. यथावकाश विधी सुरु झाल. ते कधी पूर्ण होतात आणि मी तिच्या गळ्यात ही वरमला टाकतो अस नीरजला झालं होत.

शेवटी मंगलाष्टक झाली आणि आंतरपाट दूर झाला. समोरच त्याला त्याचसाठी सजलेली त्याची अश्विनी दिसली. गुरुजींनी सांगण्याच्या आधीच नीरज अश्विनीच्या गळ्यात वरमला टाकून मोकळा झाला. तसा तिथे चांगलाच हशा पिकला. तर अश्विनी त्याला डोळे वटारून बघू लगली. नंतर अश्विनीनेहि त्याच्या गळ्यात वरमला टाकली.

नंतर सप्तपदीचे विधी झाले. कन्यादानाला अश्विनीच्या आईने तिच्या बहिणीला बसण्याची विनंती केली. त्यांनीच तर वेळेला खंबीर साथ दिली होती.

पाठवणी करताना अश्विनीलाच काय? आता तर सगळ्यांनाच चांगलच भरुन आलं होत. तिने स्वतःच्या मेहनतीने सजवीलेल्या घरावर तिने प्रेमाने हात फिरवला. नंतर आई आणि मावशीची गळाभेट घेतली.

“जास्त रडु नकोस.” नीरज तिची मस्करी करत बोलला. “काहीच दिवस मग त्यादेखील आपल्या जवळच असतील.”

तशी अश्विनी तिची आसव पुसत हसली.

पुन्हा काही लपवलस तर मार खाशील. अशी विशाखा आणि तिच्या ग्रुपकडुन प्रेमळ धमकी ही तिने हसत घेतली आणि ती तिच्या सुंदर संसारासाठी तिच्या सासरी मार्गस्थ झाली.

कॉलेजपासून ती त्याच्या मनात बसली होती. योगायोगाने त्याच्याच ऑफीसला ती कामाला होती. तेव्हापासुनचा त्याचा विरह आज संपला होता. त्याने केलेल्या प्रतीक्षेचे गोड फळ त्याला आज मिळाले. त्याच्या त्या खऱ्या प्रेमाची परीक्षा तो पास झाला होता.

समाप्त.

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कशी वाटली कथा? कमेंट करुन नक्की सांगा.

©️®️ महेश गायकवाड.
कथेचे हक्क लेखकाकडे राखीव.

🎭 Series Post

View all