जीवनाच्या तीन अवस्था
बालपण , तारुण्य , म्हातारपण
बालपण , तरुणपण तर सुखकर
पण म्हातारपण त्याही पेक्षा सुंदर .
संपले असते जबाबदारीचे ओझे
उरले आयुष्य मुक्तपणे जगावं
झोपाळ्यावर बागेमध्ये
तृप्तीत आता विसावावं .
आयुष्याच्या रात्रीला
धुंद भूतकाळ सोबती
याहून सुंदर ते काय ?
हीच वानप्रस्थाश्रमाची महती .