आपणही तेच आहोत ,
पाहणारे चेहरेही तेच आहेत ,
बदलली आहे फक्त नजर ,
गैरसमजाच्या चक्रव्यूहात अडकलेली ....
प्रत्येकजण आपापल्या मनाचे..
संदर्भ घेतात ,
संशयाच्या राक्षसाला...
मनात थारा देतात...
अरे या समोरासमोर..
साधा संवाद एकमेकांबरोबर..
काढून टाका मनातले गढूळ विचार...
कुठवरं आंबट तोंड अन् लांबट चेहरा करून राहणार ..
इगो/अहंकाराला ठेवा बाजूला...
सहा पावलं आम्ही चालतो...
चार पावलं तुम्ही चला...
पण एकदा तरी मनातलं बोला...
एकमेकांनी एकमेकांबद्दल...
आपुलकी ,दया , प्रेम , जिव्हाळा...
या शाश्वत भावना ठेवा...
आणि या सर्वांवर फ्री मिळणारा निस्सीम आनंद अनुभवा .