स्वाभिमानाने जगू या
पडू नका कुणापुढेही कमजोर
जरी असेल अर्धी भाकर
तीच खाऊन पाणी प्या पोटभर
स्वतःला कमी लेखू नका
स्वतःची स्वत्वाची असुद्या जाणीव
स्वतःवर जर विश्वास असेल
तर भासणार नाही कशाची उणीव
आयुष्यात हवं ते मिळत नसतं
मिळाले तरी काही कमी असतं
म्हणूनच आत्मविश्वासाने जा प्रत्येक प्रश्नाला सामोरे
हेच तर जीवनाच्या यशाचे रहस्य खरे .