फुकटचा घरगडी
भाग -3 अंतिम
वीर अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेलेला.
ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणचे प्रश्न, समस्या त्या वेगळ्या आणि घरात आल्यावर तरी शांतता असावी ना ....
पण घरात आलं की विजेताची वेगळीच कटकट.
तिने वीरला कधी समजूनच घेतले नाही.ती सतत आपलेच म्हणणे त्याच्यावर थोपवत राहिली.
सुरुवातीला तो ऐकत गेला पण आता ते त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेले होते.
तिला माहेरचं फार कौतुक होतं. पण वीरचा त्याला आक्षेपही नव्हता.
त्याचं म्हणणं होतं फक्त माझे नातेवाईक, माझे आई- बाबा, माझे भाऊ बहिणी यांचा आदर तर कर.
ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणचे प्रश्न, समस्या त्या वेगळ्या आणि घरात आल्यावर तरी शांतता असावी ना ....
पण घरात आलं की विजेताची वेगळीच कटकट.
तिने वीरला कधी समजूनच घेतले नाही.ती सतत आपलेच म्हणणे त्याच्यावर थोपवत राहिली.
सुरुवातीला तो ऐकत गेला पण आता ते त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेले होते.
तिला माहेरचं फार कौतुक होतं. पण वीरचा त्याला आक्षेपही नव्हता.
त्याचं म्हणणं होतं फक्त माझे नातेवाईक, माझे आई- बाबा, माझे भाऊ बहिणी यांचा आदर तर कर.
चल नको करू आदर, कमीत कमी त्यांच्याविषयी वाईट साईट तर बोलू नकोस. ती वीरचा पान उतारा करायला कमी करत नव्हती तर बाकीच्यांचे काय.
ती त्याचा मानसिक छळ करण्याची एकही संधी सोडत नव्हती.
तिला वीर चे नातेवाईक नकोच होते. त्यांच्याशी संबंध ठेवायचाच नव्हता.
एक दिवस वीर ची बहीण विशाखाच्या जाऊच्या मुलाचा वाढदिवस होता. पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे वीरला आमंत्रण आले होते. म्हणून वीर त्याच्यासाठी एक पुस्तक आणि खेळणे घेऊन आला होता. पण विजेताला ते पटले नाही. एवढे महागाचे कशाला आणले म्हणत तिने घर डोक्यावर घेतले. घेतले तर घेतले वरतून वीरला अद्वातद्वा बोलत त्याच्या गालफटात एक चापटही मारली.
असे क्षुल्लक प्रसंग तिच्यासाठी पुरेसे होते. ती कशावरूनही भांडण उकरून काढत होती आणि वीरला जीव नकोसा करून सोडत होती.
ती त्याचा मानसिक छळ करण्याची एकही संधी सोडत नव्हती.
तिला वीर चे नातेवाईक नकोच होते. त्यांच्याशी संबंध ठेवायचाच नव्हता.
एक दिवस वीर ची बहीण विशाखाच्या जाऊच्या मुलाचा वाढदिवस होता. पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे वीरला आमंत्रण आले होते. म्हणून वीर त्याच्यासाठी एक पुस्तक आणि खेळणे घेऊन आला होता. पण विजेताला ते पटले नाही. एवढे महागाचे कशाला आणले म्हणत तिने घर डोक्यावर घेतले. घेतले तर घेतले वरतून वीरला अद्वातद्वा बोलत त्याच्या गालफटात एक चापटही मारली.
असे क्षुल्लक प्रसंग तिच्यासाठी पुरेसे होते. ती कशावरूनही भांडण उकरून काढत होती आणि वीरला जीव नकोसा करून सोडत होती.
अमेय वीरला विचारत होता, "कशावरून भांडते ती? काही कारण तर असेल ना?"
वीरला विचार पडला, " काय सांगू कारण? कारण तर अगदी क्षुल्लक असतात. पण ती राईचा पर्वत करते.
बड्या बापाची बडी लेक. तरी बरे झाले नोकरी नाही. नोकरीवर असती तर माहित नाही तिने मला काय समजले असते.
ऑफिस मधून आल्यावर साधा चहाचा कपही हाती मिळत नाही. चहाही मीच करतो, भाजी मीच चिरतो,कुकर मी लावतो.
घरातली अर्ध्याच्या वरती कामे मीच करून जातो आणि उरलीसुरली कामे कामवाल्या बायका येऊन करतात.
घरातला नोकरच समजते ती मला.
वीरला विचार पडला, " काय सांगू कारण? कारण तर अगदी क्षुल्लक असतात. पण ती राईचा पर्वत करते.
बड्या बापाची बडी लेक. तरी बरे झाले नोकरी नाही. नोकरीवर असती तर माहित नाही तिने मला काय समजले असते.
ऑफिस मधून आल्यावर साधा चहाचा कपही हाती मिळत नाही. चहाही मीच करतो, भाजी मीच चिरतो,कुकर मी लावतो.
घरातली अर्ध्याच्या वरती कामे मीच करून जातो आणि उरलीसुरली कामे कामवाल्या बायका येऊन करतात.
घरातला नोकरच समजते ती मला.
वीरच्या वाढदिवसाला ऑफिस मधील सगळ्यांनीच त्याला बर्थडे गिफ्ट दिले. सगळेच एकमेकांच्या वाढदिवसाला देतात तसे. कुणी काही कुणी काही.
त्याच्या ऑफिस मधील मुलगी नेत्राने त्याला परफ्युम दिला. झाले तेवढ्या वरूनच विजेताने घर डोक्यावर घेतले ती तुला अशी कशी परफ्युम देऊ शकते? तुझे निश्चित तिच्याशी काहीतरी लफडे आहे.
सुतावरून स्वर्ग गाठणारी ही संशय स्त्री.
ना ती स्वतः आनंदाने जगत होती ना वीरला जगू देत होती.
शेवटी वीर आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता.
नीता मैत्रिणींना म्हणाली, "मैत्रिणींनो बघा विजेतात आपले प्रतिबिंब दिसू देऊ नका."
एक ठिणगी चांगलं घर भस्मसात करायला पुरेशी आहे.
एकमेकांचा आदर करायला शिका तो जर नसेल करता येत तर शांत रहा. घरात आग धुमसणार नाही आणि स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची होरपळ होणार नाही.
आपला जोडीदार कुठे कमी पडतो तिथे आपण उभे रहा.
फक्त अवगुणांवर,दोषांवर, कमीपणांवर बोट ठेवून, टोचण्या मारून संसार सुखाचे होत नसतात.
सह जीवनात संसाराची दोन चाके नवरा आणि बायको ही सोबतच धावायला हवी नाही का?
समाप्त.
तुम्हाला काय वाटतं?प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा हं.
©®शरयू महाजन
एक ठिणगी चांगलं घर भस्मसात करायला पुरेशी आहे.
एकमेकांचा आदर करायला शिका तो जर नसेल करता येत तर शांत रहा. घरात आग धुमसणार नाही आणि स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची होरपळ होणार नाही.
आपला जोडीदार कुठे कमी पडतो तिथे आपण उभे रहा.
फक्त अवगुणांवर,दोषांवर, कमीपणांवर बोट ठेवून, टोचण्या मारून संसार सुखाचे होत नसतात.
सह जीवनात संसाराची दोन चाके नवरा आणि बायको ही सोबतच धावायला हवी नाही का?
समाप्त.
तुम्हाला काय वाटतं?प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा हं.
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा