Login

फुकटचा 'घरगडी ' भाग -2

नवरा बायको संबंध
फुकटचा घरगडी
भाग -2

नीता तिच्या शेजारी नुकतीच घडलेली एक घटना त्या मैत्रिणींशी शेअर करत म्हणाली,
" आधी मी काय सांगते ते ऐकून घ्या नंतर ठरवा तुम्हाला काय काय बोलायचे ते. "

आजच्या पिढीतील मुलामुलींचे विचार. काही अपवाद असतील मी नाही म्हणत नाही पण प्रकर्षाने जाणवणारे चित्र,
आजकालच्या मुलींना सासू-सासरे तर जवळ नकोच असतात. नवरा दूरच्या शहरात किंवा फॉरेन असेल तर फारच चांगलं. तिथे
' हम दो हमारा एक' तोही नकोय आता.आमच्या दोघात तिसरा कोणीच नको.

आणि काही दिवसातच अशी वेळ येते की ते दोघेही एकमेकांना नकोसे वाटायला लागतात.

अशात ती कमावती असेल तर तिची धारणा पैशात सर्व काही विकत घेता येते. मग ती नवऱ्याला भाव देत नाही. आणि त्याला विचारातही घेत नाही. उलट त्याला दुरुत्तर करून सारखी डॉमिनेट करत राहते. मग सुरू होतात रोज कटाकटी.
एका घरातला असाच एक प्रसंग.

"अरे वीर! हा एकच मार्ग नाही आहे बेटा. अरे मरण्यासाठी हे एक कारण असेल पण जगण्यासाठी खूप काही आहे आपल्याकडे. हे चुकीचे विचार डोक्यातून काढून टाक बेटा आणि घरी निघून ये."

वीरने आपला मोठा भाऊ अमेयला जो की वकील आहे त्याला फोन केलेला. जेमतेम वर्ष झाले लग्नाला. नुकतीच पंधरा दिवसाच्या आधी फर्स्ट ॲनिवरसरी साजरी केली. आणि आज... आज म्हणतोय,
" कंटाळलो मी बायकोच्या त्रासाला. जीव द्यावासा वाटतोय. नाही राहायचं मला या जगात. कुणासाठी जगायचं?"

आई बाबांना त्रास होईल म्हणून वीर त्यांना काहीच सांगत नव्हता त्याचं सगळं बोलणं मोठा भाऊ अमेयशीच.
अमेय त्याला समजावत होता, "अरे निघेलच मार्ग."

अमेय वकील. त्यालाही माहीत होते सगळे कायदे महिलांच्याच बाजूने. पुरुषा साठी कायदेही कमी पडतात. आणि समाजही स्त्रीकडेच सहानुभूतीच्या नजरेने पाहतो. पुरुषालाच दोषी ठरवले जाते.

वीरचही अमेयला म्हणणं तेच होतं, 'माझं ऐकायला कोणीच नाही रे दादा.सगळे तिच्याच बाजूने आहेत"
तिचा भाऊ तर चक्क म्हणतोय सोडचिठ्ठी दे म्हणावं त्याला.

अमेय त्याला तेच समजून सांगत होता, "मी आहे ना तुझ्या बाजूने लढायला.आणि हो तिला सोडचिठ्ठी द्यायची की काय करायचे ते नंतर बघू.
पहिले तुझ्या मनातल्या या
'मला जीव द्यावासा वाटतोय'
या विचाराला सोडचिठ्ठी दे अगोदर.
नंतरचे नंतर बघू.
क्रमश:
बाकी पुढील भागात
भाग-3मधे वाचा
असे काय घडले त्या दोघांत की वीर या निर्णयाप्रत यावा.
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all