निसर्गा चे वाण

संक्रांतीच्या आदल्या दिवशी आज्जी पल्लवी ला तिळाच्या तेलाने मालिश करून न्हाऊ घालायची.जेवणात भोगी ची भाजी असायची, न आवडणार्या भाज्या ही त्यात छान लागतं."ही अशी मिश्र भाजी कां, ?" आज्जी चे उत्तर असायचे सगळंच आवडेल ते मिळत अस नसतं त्यात थोडे नावडते मिळाले तरी दोन्ही ‌चा स्वाद घ्यायचा.त्या वयात त्यांच्या अर्थ नसे समजत, पण भाजी छान लागायची.संक्रांतीच्या दिवशी आई व आज्जी,दोघी छान लुगडं नेसून,नाकांत नथ घालून, समोरच्या मंदिरात सुगडाच वाण ताटात घेऊन जायच्या. पल्लवी ही छान फ्रॉक घालून मिरवायची .
निसर्गा चे वाण
पल्लवी ऑफिस मधून घरी आली स्कूटर स्टॅन्ड ला लावून लिफ्ट कडे जाण्यास वळली, समोर देशपांडे काकूंच्या किचन च्या खिडकीतून खमंग तीळ भाजल्या चा सुवास पसरला होता.
ओ-- दोन दिवसावर संक्रांत आली आपली तर काहीच तयारी नाही अजून.
या नव्या मल्टि मध्ये येऊन पल्लवीला दोन महिने झाले होते. आत्ता कुठे घर नीट लागले होते जुन्या घरातून येताना कितीतरी जुन्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे तिने कामवालीला दिले .इथे आल्यावर नवीन घेतले .
सध्या संक्रांत आल्याने बाजार ही रंग बिरंगी प्लास्टिकच्या वाणांच्या वस्तूंनी भरलेला होता.

पल्लवीला लहानपणीचे आजीच्या हातचे तिळगुळाचे लाडू आठवले आज्जी खमंग तीळ भाजून खलबत्त्यात कुटून लाडू बनवायची.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी आज्जी पल्लवी ला तिळाच्या तेलाने मालिश करून न्हाऊ घालायची.जेवणात भोगी ची भाजी असायची, न आवडणार्या भाज्या ही त्यात छान लागतं.
"ही अशी मिश्र भाजी कां, ?" आज्जी चे उत्तर असायचे सगळंच आवडेल ते मिळत अस नसतं त्यात थोडे नावडते मिळाले तरी दोन्ही ‌चा स्वाद घ्यायचा.
त्या वयात त्यांच्या अर्थ नसे समजत, पण भाजी छान लागायची.
संक्रांतीच्या दिवशी आई व आज्जी,दोघी छान लुगडं नेसून,नाकांत नथ घालून, समोरच्या मंदिरात सुगडाच वाण ताटात घेऊन जायच्या. पल्लवी ही छान फ्रॉक घालून मिरवायची .
मंदिरात जाऊन एक मातीचा सुगड देवापुढे ठेवून मग पांच जणींना वाण द्यायच्या.
घरी येताना ताटात परत चार वाण असायचे, त्यावर असलेल्या लाडू वरून तिचे व ताई चे भांडण व्हायचे.
उन्हाळ्यात त्या मातीच्या सुगडात पाणी भरून \"आमचा छोटा माठ\" म्हणून जेवताना पल्लवी व ताई घेऊन बसत.
आज्जी गेल्या नंतर काही वर्षांनी बाबांनी नवीन ठिकाणी घर घेतले काही दिवस आई जुन्या कॉलनीत जायची पण मग हळूहळू नव्या कॉलनी सर्व जण रमले. आणि काही वर्षात जुन्या पद्धती ही बंद पडल्या.
आज ऑफिस मध्ये सुकन्या काळी साडी नेसून आली ते पाहून तिची पहिली संक्रांत आहे असे लक्षात आले मिसेज भट्टाचार्य विचारत होती\"काली साडी क्यों??
\"वो हमारे यहां पहले साल काली साडी --
"बापरे - काली"?
पल्लवीला काही उत्तर देता आले नाही.
रात्री आईशी बोलताना तिने हा प्रश्न केला ??
माहित नाही ग--- बाई आम्ही नाही विचार केला, आईने काहीतरी उत्तर देऊन विषय बदलला.
सकाळी सकाळी बाबांचा फोन आला त्यांनी तिच्या बर्याचशंकांचे समाधान केले.
बाबा म्हणाले प्लास्टिक पिशव्या, प्रकृती साठी विनाशकारी आहे म्हणून मातीची सुगड,तेवढीच कुंभाराची मदत.
पल्लवीने ऑफिसला निघता निघता सोसायटीचा सेक्रेटरी दामले काकांना फोन केला "आजच्या सुविचार च्या बोर्डावर मी काही लिहिले तर चालेल"??
"हो-हो-आवडेल.".

पल्लवीने बोर्डावर पतंगाचा एक चित्र काढून त्याच्या खाली मेसेज लिहला.
नमस्कार,,,?
तिळगुळ घ्या गोड बोला, आज मकर संक्रांत .सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश म्हणजेच संक्रमण म्हणून संक्रांत हा सण, त्याला गोड करायला स्नेहवर्धक तीळ आणि गुळाचा गोडवा म्हणून हा तिळगुळ खाण्याची पद्धत आहे .
काळा रंग हा उष्मा शोषक असल्याने थंडीमध्ये आलेल्या या सणाला नव्या सुनेला किंवा नव्या बाळाला नवे काळे वस्त्र देण्याची परंपरा सुरू झाली असावी. तसेच ही संक्रांत १४जानेवरी हा दिवस वीर मराठ्यांच्या पराक्रमाची आपल्यामातृभूमीच्या रक्षणासाठी लढून प्राणांची आहुती दिली त्याची ही आठवण करून देणारा आहे.
आनंद साजरा करताना आपण त्यांना ही शब्दरूपी श्रद्धासुमने वाहू या.,???
एक दिवस संध्याकाळी घरी येतायेता पल्लवी वाटते असलेल्या नर्सरी मधे जाऊन आली.
आॅफिस मधल्या नीनाची वहिनी शिवण काम करते, तिच्या कडून पतंगाच्या आकाराचे कापडी बटवे शिऊन घेतले.
रथसप्तमी च्या दिवशी पल्लवी ने हळदीकुंकू करायचं म्हणून आफिस मधून सुट्टी घेतली.
संध्याकाळी दारावर समोर सुंदर रांगोळी काढून घर सजवले.
छान लुगडं नेसून नथ घालून तय्यार झाली,
वा-- क्या बात है ?कौतुक करत
प्रशांत नी तिचे वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढले.

आलेल्या सर्व मैत्रिणींना हळदीकुंकू लावून, तिळगुळाचा लाडू व चटकदार भेळ खायचा दिली.
ओटी च्या खिचडी त बोर, मटारच्या शेंगा, घालून कापडी बटवे दिले
सर्व सख्यांना. वाण काय आहे ची उत्सुकता होती,
पल्लवीने, सुगडाच्या आकाराच्या,रोप लावलेल्या मातीच्या कुंड्या वाण म्हणून सर्वांना दिल्या.
त्या सुबक, फुललेल्या कुंड्या पाहून सर्वांनी कौतुक केले.
"वाssछान कल्पना आहे हं.आता एक उखाणा ही हवा हं".
बरं बरं घेते‌ ऐका,
मातीच्या कुंडीत लावून रोप प्रकृती च ठेवा भान,
प्रशांत च नांव घेतें ठेवून सर्वांचा मान.
सर्व सख्यांनी टाळ्या वाजवून वन्स मोअर म्हणताच पल्लवी ने बर--बर एका म्हणत एक उखाणा अजून घेतलं
मातिच्या कुंड्या वापरून प्लास्टिक ला करते टाटा,
प्रशांत चा पल्लवी च्या सुखात
सिंहाचा वाटा
सर्व सख्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
_----------------------------------------लेखन सौ.प्रतिभा परांजपे