@नववर्षाच्या उंबरठ्यावर...

नकारात्मक विचारांना तिलांजली सकारात्मक विचारांची चाहूल लागली

सरत्या वर्षातील नकारात्मकते ला 

तिलांजली दिल्यावर.. 

सकारात्मक विचारांचे स्वागत होईल

नववर्षाच्या उंबरठ्यावर..

त्रास तर होणारच ना !

सतत नकारात्मक विचारांना

खतपाणी घातल्यावर..

म्हणूनच हवा तो आनंद तेव्हाच मिळेल,

झाले गेले विसरल्यावर..

हेवेदावे, द्वेष, गैरसमज खूप काही अनुभवायला मिळते

जीवन प्रवासाच्या प्रत्येक वळणावर..

काही नात्यांची किंमत कळते

ते दूर निघून गेल्यावर..

आनंद द्विगुणीत होतो

पुन्हा हरवलेले नाते गवसल्यावर..

नातं मैत्रीचं का असेना !

राज्य करते दोस्तांच्या मनावर..

म्हणूनच जुने रुसवे-फुगवे विसरून जावे

नवीन वर्षाचे स्वागत केल्यावर..