नातं
नातं असतं दोन मनांचं ,एकत्र आलेल्या क्षणांचं
ते क्षण पुरेसे असतात ,दोन मनांना जोडायला
अन एकत्र ते राहतात ,आयुष्य घालवायला
कधी कधी -
आपण मानलेले नातं
दुसऱ्याला नको असतं
त्याला नको असतो आपण
नको असते आपले अस्तित्व
अन आपणाला हवा असतो फक्त तोच
दुसरा- तिसरा नको फक्त तोच
अशावेळी
हे नातं नातं नसतं
असतं फक्त एक ओझं
आपल्याला कळत असून
उचलत असतो ते बोझं
तोडायचे ते नातं असतं
पण दुसरं मन तयार नसतं
होतं अशा वेळी असह्य जगणे
वाईट आहे हे असं नातं निर्माण होणं
© शीतल महामुनी माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा