कथेचे नाव : नशिबचं!
कॅटेगिरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
सब कॅटेगिरी : काळ आला होता पण...
टीम : अमरावती
सलग तीन दिवस झाले, पाऊस पडत होता. सूर्यनारायणाचं तर दर्शनही होत नव्हतं. आभाळच फाटलं होतं जणू! न्यूजवर सतत पुराच्या बातम्या समोर येत होत्या. नद्या नाले ओसंडून वाहत होते. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुट्टी जाहीर झाली आणि ऑफिस मधील रमेश पटापट आवरून घरी यायला निघाला.
त्याने गाडीच्या काचांमधून बाहेर नजर टाकले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक चहाची टपरी आणि एक पानपट्टी तेवढी उघडी होती. पावसापासून आडोशाला आलेली माणसे त्या टपरीत उभी होती, चहा ,कॉफी ,नाश्ता... आज टपरीवाल्याच्या धंद्याला बरकत आलेली... गाडीत बसून होणाऱ्या घुसमटीला आणि एकटेपणाला वैतागलेल्या रमेशने त्या टपरीत जायचा विचार केला. एवढ्यात त्याच्या गाडीवर टकटक झाली.
"चेष्टा करता का राव? एवढ्या पावसात रस्त्या पल्याड कसं जायचं? काऊन बाबा गरीबाची मजा घेता?"रमेशने दिलेल्या चहाच्या निमंत्रणामुळे भांबावून गेलेला भाजीवाला त्याला बोलत होता .
"त्यात चेष्टा काय? पाऊस पडतोय, तुम्ही थंडीने कुडकुडत आहात, मी गाडीत बसून कंटाळलो आहे. रस्त्यापलीकडच्या टपरीवर जाऊ, चहा घेऊ, पाय मोकळे होतील. तसेही तुम्ही भिजलेले आहात."
नेमकं त्याचवेळी रमेश मनातल्या मनात विचार करत होता, "बरे झाले चहा पिण्याची बुद्धी सुचली.…"
"साहेब तुम्ही चहा प्यायचा आग्रह केला म्हणून मी आलो. गाडीतच बसून राहिलो असतो तर जागीच खतम झालो असतो." भाजीवाला गहिवरल्या आवाजात रमेश ला म्हणत होता.
"मी कोण रे तुला वाचवणार! आपल्या दोघांच्याही वाडवडिलांची पुण्याई म्हणायची. नेमकी त्याच वेळेला आपल्याला गाडीतून उतरायची सुबुद्धी झाली. तुझ्याही लक्षात आले व तू मला सूचना देत पळायला सांगितले. गड्या खरं सांगू का, आपला काळ आला होता पण वेळ आली नव्हती!"
"हे मात्र अगदी खरे! दोघेही शांत व्हा, देवाचे नाव घ्या, अन हा गरमागरम चहा प्या." टपरी वाल्याने त्या दोघांसमोर चहाचे ग्लास धरले होते......
लेखिका : सौ. आश्विनी गहाणकरी
टीम अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा