नणंद सखी भाग ३
विषय - संसारातील नणंदेची भूमिका
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, मनोजरावांनी आपल्या दोन बहिणी व पत्नी तिघींसाठी अंगठ्या आणल्या आहेत. आता पुढे...
भाऊबीजेदिवशी सकाळी लवकर उठून शलाकाने पुरणावरणाचा स्वयंपाक करायला घेतला. एकेक करुन मनिषा, नलिनी तसेच मनोजरावांच्या तीन आत्या भाऊबीजेनिमित्त हजर झाल्या.
सासुबाईंनी मुलींसमोर तिन्ही अंगठ्या ठेवून पसंत करायला सांगितले. पाडव्याची ओवाळणी म्हणून आणलेली अंगठी वहिनीला का दिली नाहीस म्हणून दोघीजणी आपल्या आईला रागावू लागल्या. यावर त्या म्हणाल्या,
" तुमच्या वहिनीला पसंत कर म्हणून सांगितले होते. तीच म्हणाली, आधी दोघी ताईंनी पसंत करु देत. मग राहिलेली मी घेईन."
" तुमच्या वहिनीला पसंत कर म्हणून सांगितले होते. तीच म्हणाली, आधी दोघी ताईंनी पसंत करु देत. मग राहिलेली मी घेईन."
हे ऐकून दोघीही वहिनीच्या गळ्यात पडल्या. दोघींनी अंगठ्या पाहून जी जास्त चांगली वाटली ती अंगठी वहिनीकडे सरकवली. शलाकाला पण तीच अंगठी जास्त आवडली होती, पण तिने त्यावर मन दाखवले नव्हते. भाऊबीजेला जरी भावाला ओवाळले असले तरी भावजयीशी अतूट असे प्रेमाचे नाते गुंफले गेले आहे याचा आनंद त्या दोघी लेकींच्या डोळ्यांत सामावला होता.
संक्रांतीचा सण झाला आणि मनोजरावांना पोलिस लाईनमध्ये रुम मिळाली. तिची पाठवणी करण्यासाठी दोघी नणंदा माहेरी आल्या होत्या. दोघीही सांगत होत्या,
" वहिनी, काहीही झाले तरी दिवाळीला दरवर्षी घरी यायचे. दादाला जमले नाही तर तो नाही आला तरी चालेल. तू मात्र नक्की यायचे." हे ऐकून तिने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर प्रत्येक वर्षी ती दिवाळीला न चुकता सासरी यायची. नणंदा, त्यांची मुले यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे तिलाही आवडायचे.
" वहिनी, काहीही झाले तरी दिवाळीला दरवर्षी घरी यायचे. दादाला जमले नाही तर तो नाही आला तरी चालेल. तू मात्र नक्की यायचे." हे ऐकून तिने होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर प्रत्येक वर्षी ती दिवाळीला न चुकता सासरी यायची. नणंदा, त्यांची मुले यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे तिलाही आवडायचे.
पुढे मुले झाली, त्यांचे शिक्षण सुरू झाले ; तरीही तिने दिवाळीत गावी येण्याचा प्रघात मोडला नाही.
मुले जे बघतात तेच शिकतात. आपले आईवडील कसे वागतात हे मुले बघत असतात. नकळतेपणाने हे संस्कार होत असतात. त्यामुळे तिच्या मुलांवरही तसेच संस्कार घडले. घरातील सर्वांविषयी आपुलकी, प्रेम तसेच त्याग हे गुण त्यांच्यात आले.
आज ती सासुबाईच्या भूमिकेत होती. तिची लग्न न झालेली मुलगी
वहिनीशी ज्या आपलेपणाने आणि प्रेमाने वागतेय ते पाहून तिला समाधान वाटले. इतके प्रेम मिळत असताना समोरची व्यक्ती ते नाकारू शकत नाही. समोरचा माणूस त्याला आलेल्या अनुभवानुसार वागत असतो.
वहिनीशी ज्या आपलेपणाने आणि प्रेमाने वागतेय ते पाहून तिला समाधान वाटले. इतके प्रेम मिळत असताना समोरची व्यक्ती ते नाकारू शकत नाही. समोरचा माणूस त्याला आलेल्या अनुभवानुसार वागत असतो.
शलाकाची सुनबाई ईशिता या घरात जेव्हा आली तेव्हा जरा तुटकच वागत होती. मिहीरने तिला आधीच कल्पना दिली होती की;
" माझ्या दोन्ही आत्या, त्यांची मुले लग्नाचे सगळे विधी होईपर्यंत आपल्या घरीच राहतील. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत. तू तुझ्या घरी एकटीच आहेस, पण आपल्या माणसांसोबत रहाण्यात जी मजा आहे ती तूही अनुभवू शकशील जर मनमोकळेपणाने आमच्यात सहभागी होशील."
" माझ्या दोन्ही आत्या, त्यांची मुले लग्नाचे सगळे विधी होईपर्यंत आपल्या घरीच राहतील. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत. तू तुझ्या घरी एकटीच आहेस, पण आपल्या माणसांसोबत रहाण्यात जी मजा आहे ती तूही अनुभवू शकशील जर मनमोकळेपणाने आमच्यात सहभागी होशील."
ईशिता इतक्या माणसांना पाहून बावरुन गेली. तिच्या घरी असे वातावरण नव्हते. मी आणि फक्त माझे घर... यावेळी तिच्या मदतीला सिद्धी धावून गेली. बावरलेल्या वहिनीला चुचकारुन प्रेमाने समजावत तिने वेळ मारुन नेली. तरीही इशिता जरा अंतर ठेवूनच वागत होती. यावेळी सिद्धीने तिला मुद्दामहून बोलते केले. काहीतरी कारण काढून तिला सर्वांसोबत वेळ घालवण्यासाठी उद्युक्त केले.
सर्वजण एकमेकांशी ज्या आपुलकीने वागत होते तसेच चेष्टा मस्करी करण्यात जो आनंद मिळतो तो पुरेपूर उपभोगत होते ते पाहून आपणही त्यांच्यात सामील व्हावे असे तिला वाटले.
आजवर सर्वांसोबत वाटून खाणे अगर आपल्या आधी कुटुंबातील इतरा़ंचा विचार करणे या गोष्टी तिला माहीत नव्हत्या. ज्याच्या मनाला येईल तसे वागणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य अशी तिच्या कुटुंबाची धारणा होती. स्व बाजूला ठेवून इतरांचा आपल्या आधी विचार करण्यात आनंद असतो हे तिला समजले. त्यागातही सुख असते याचा तिला प्रत्यय आला. त्यामुळे आपोआपच तिचा तुटकपणा दूर झाला आणि ती आणि सिद्धी चांगल्या मैत्रिणी झाल्या. इतके की ईशिताचे आता सिद्धीशिवाय पान हलत नव्हते.
आजही दिवाळीला सगळेजण गावी जातात, त्या चार दिवसांत काय काय करायचे याचे सगळे नियोजन आता ईशिता करते. शलाकाच्या नणंदांची मुले, सुना आणि तिची मुले यांचा एक वेगळा वाॅटसअप गृप आहे आणि त्यावर त्यांचा धुडगूस सुरु असतो.
जेव्हा शलाका सासरी एकटीच रहात होती तेव्हा तिच्या नणंदांनी तिला जे अकृत्रिम प्रेम दिले त्यामुळे ती सर्वांसोबत त्या प्रेमाच्या धाग्यांनी बांधली गेली. तेच बंध आज पुढील पिढीलाही बांधून ठेवत आहेत याचे तिला समाधान वाटले.
विचारांच्या नादात आपण ठुशीवरुन कुठल्या कुठे पोहोचलो असे तिला वाटले. तिने ईशिताला आवाज दिला,
" अगं, तुझ्याकडे आहे का ठुशी? मला सापडत नाहीये..."
" हो आई. जरा थांबा, देते आणून." असे ईशिता म्हणाली आणि ठुशी सापडली म्हणून शलाकाला हायसे वाटले.
" अगं, तुझ्याकडे आहे का ठुशी? मला सापडत नाहीये..."
" हो आई. जरा थांबा, देते आणून." असे ईशिता म्हणाली आणि ठुशी सापडली म्हणून शलाकाला हायसे वाटले.
समाप्त.
©® सौ.हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा